कळायला लागल्यानंतर जाणवलेली एक गोष्ट ती म्हणजे मला खिडकी कायम आवडते.खिडक्यांच हे माझ वेड खूप जून आहे.आमचं मुरूडच घर खूप जून आणि पारंपारिक कोकणी पद्धतीच आहे. त्या घराला कोनाडे,खुंट्या,अडसर आणि तश्याच जुन्या पद्धतीच्या ‘खिडक्या’ तर खिडक्यांच्या ह्या प्रवासातील पाहिलं ठिकाण म्हणजे त्या घरातील त्या खिडक्या. त्यातल्या एका खिडकीतून मी वाडीतल्या नारळ,सुपारीच्या बागा खूप पहिल्यात. मुळात दुपारी मी कधी झोपतच नाही आणि शाळेतल्या परीक्षाजवळ आल्या कि आई दुपारी अभ्यासाला बसवायची त्यावेळी मी असाच खिडकीवर बसून अभ्यास करत असे म्हणजे खिडकीतून बाहेर बघण्याचा अभ्यास चालू असे.
खड़तर हा मार्ग कधीचा अजूनही मी चालत आहे...
पाय जरी हे रक्ताळलेले वाट सर करत आहे...
दुखावलेले पाय बरे तरी होतील...
पण दुखावलेले इवलेसे मन कसे बरे होईल ???
कधी वाटे जीवनाचा प्रवास आता थांबवावा..
तोडून सारे बंधपाश मुक्त मी व्हावे...
पण प्रवास थांबवणे मज आता शक्य नाही....
सोनूली माझ्या कडेवर ही सुंदर प्रवासाचे स्वप्न पाही...
" विश्वास " हा आंतरमनाचा पाय आहे. शब्द जितका सोपा आहे, अनुभव घ्यायला तितकाच कठीण. याच विश्वासावर आपण अशक्यही शक्य करू शकतो. आजकाल देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी झाला आहे असे जाणवते. देव हा दगडात नसून ती एक अदृश्य मंगल शक्ती आहे, उर्जा आहे, जी चराचरात विद्यमान आहे. आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत की जिथे ईश्वरी शक्तींचा स्तोत आहे आणि तो अखंड प्रवाहीत आहे. या शक्तीचा म्हणजेच दिव्यत्वाचा प्रत्यक्ष प्रत्यय या अशा ठिकाणी जाऊनच घेता येतो. मन हे निसर्गतः चंचल आहे. ते एकाचवेळी दश दिशा फिरत असते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ते कधीही स्थिर होत नाही.
खूप काही अनाउन्समेंट कानावर पडतायत...
त्यात फेरीवाल्यांचे आवाज वेगळेच...
ट्रेनचा डबा तसा फारसा भरला नाहीये पण नजरेला कोणी भावत नाहीये ...खिडकीतून पाऊस दिसतोय .. ofcourse मला विंडो सिट यासाठी तर आवडते ...खूप दिवसांनी गावाला जातेय ..एक्साईटमेंट होती ..पण आता कमी होत चालली आहे कारण ट्रेन अर्धा तास झाला आहे तिथेच आहे ....
स्टेशन फारसं ओळखीचं नाहीये म्हणून खिडकीतून जमेल तेवढा जमेल तसा पाऊस जमा करतेय मग तो ओंजळीतून निसटताना चा असो की डोळ्यात भरून घेतानाचा ....
घडी बघून बघून डोळे थकले होते .. त्याचे काटे पुढे सरकत होते पण माझी ट्रेन नाही...
तेवढ्यात....
दुसर्या एका धाग्यावर विषय निघाला तेव्हा या विषयावर अनेक सुंदर व्हिडिओज, टिव्ही शोज वगैरे आहेत हे लक्षात आलं. या सगळ्यांची इथे नोंद करू.
भारत अथवा भारताबाहेरील विविध प्रेक्षणीय स्थळं, किल्ले, समुद्रकिनारे, प्राचीन शहरं, आधुनिक आणि नेहमीची लाडकी शहरं, म्युझियम्स, नद्या, जंगलं, हॉटेल्स, हटके ठिकाणं आणि हॉटेल्स ...... सर्व काही येऊ द्या.
सध्या काही काळापुरती तरी भटकंती फार फार मर्यादित असेल तर आपण घरीच बसून नेत्रसुख घेऊयात.
कमानीजवळ आम्हाला एक घर दिसले आणि चहाच्या आशेने आम्ही तिथे गेलो...
आता पुढे...
जाण्याच्या आधीच आम्ही भाऊश्याला "तिथं काहीच बोलू नकोस" असा दम भरला.
घराच्या बाहेरच एक व्यक्ती दिसली.
त्या व्यक्तीने आम्हाला हसतमुखाने "या भैय्या या " असं म्हणून बसायला खुर्च्या टाकल्या.
आधी पाणी देऊन,"नाश्ता करणार का जेवण?" असं आपुलकीने त्याने आम्हाला विचारले.जेवण करण्याचे आता कोणाचेच मन नव्हते.
"आम्हाला चहा मिळेल का ४ कप ?",असं विचारल्यावर "अक्के चहा टाक गं ४ कप " असा बाहेरूनच बोलून तो आमच्या शेजारी बसला.
धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!
सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!
बारी गावात पोहोचायला आम्हाला संध्याकाळचे ७:०० वाजले.
गाडीखाली उतरताच मला एक वेगळीच फीलिंग आली. असा छान वाऱ्याचा अनुभव कधीच आलेला नव्हता. असे वारे बहुतेक सह्याद्रीतच अनुभवायला भेटते. आम्हाला माहित नव्हते कि ह्या पुढील प्रत्येक ट्रेकला आम्हाला असं वारे लागणार आहे.
खाली उतरताच पोरांची चंगळमंगळ सुरु झाली. पोटातले कावळेही काहीतरी ग्रहण करण्याची request करत होते.
डबा... किती पॉवरफुल शब्द असतोना हा.
पहाटेच्या प्रकरणाने आता भाऊश्या निमूटपणे येणार हे आम्हाला माहितीच होते. त्यामुळे आम्ही दोघेही बिनधास्त होतो. त्याला काय आणायचे आहे आणि काय नाही आणायचे हे ब्रिफ करून हितेश पुन्हा झोपी गेला. दुपारी १ ला निघायचा असल्यामुळे सगळे निवांत होते. दुपारी १:०० ला मी आणि हितेश स्टॅन्ड वर भेटलो
२०११च्या मध्यात सिमला मनाली चंदिगड अशी टूर करण्याचा योग आला. आमची ही ग्रुप टूर पहिलीच! आत्तापर्यंतची भटकंती फक्त वैयक्तिक बुकिंग करूनच केली होती.
जायचे ठिकाण ठरल्यानंतर कोणत्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे जायचे हे ठरवण्यासाठी कमीत कमी चार पाच संस्थांमध्ये चौकशी केली. काहींचे दर खूपच महाग, तर काही ठिकाणी टूरची माहितीच इतकी उदासपणे देण्यात आली की आपली टूर हे किती उत्साहाने conduct करणार असा प्रश्न पडला.
या सर्वांमध्ये छाप पडली ती एका टूर कंपनीची. आमच्या प्रत्येक चौकशी भेटीमध्ये अतिशय आदरपूर्वक आणि उत्साही संवाद; याने अतिशय आत्मीयता वाटली. त्यात भर म्हणजे अतिशय वाजवी दर.