काय ऐकताय?
कुठलं गाणं ऐकताय आत्ता? हिंदी, मराठी, इतर कुठल्या भाषेतली? कुठलं गाणं घोळतय मनात आणि वाजतय तुमच्या प्लेलिस्ट वर?
कुठलं गाणं ऐकताय आत्ता? हिंदी, मराठी, इतर कुठल्या भाषेतली? कुठलं गाणं घोळतय मनात आणि वाजतय तुमच्या प्लेलिस्ट वर?
लॉस एंजेलिस च्या जवळ समुद्रात वादळ होते व टोर्नेडोज तयार होतात. पाण्यातील मासे त्याबरोबर उचलले जातात व एलए वर शार्क्सचा पाऊस पडतो. शब्दशः खुदा जब देता है स्टाईल ने छप्पर फाडके मासे पडतात. मग आपले हीरो, त्याचे जवळचे लोक व इतर मिळून ते टोर्नेडोज व मासे यांना कसे हरवतात ही स्टोरी. आता हे मासे म्युटेटेड वगैरे नाहीत. माशांसारखे मासे, फक्त वादळामुळे आकाशात उडून परत खाली पडतात. या ब्याकग्राउंड वर हा चित्रपट पाहावा. म्हणजे प्रत्येक महान स्टोरीटेलिंग मधे सामान्य लोकांची असामान्य कामे असतात तसे सामान्य माशांनी केलेल्या असामान्य गोष्टी तुम्हाला कळतील.
झटपट उत्क्रांती -
बर्लिन महोत्सवात 'किल्ला' सर, ३७ वर्षांत प्रथमच मराठी सिनेमाची बाजी..
http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/killa-marathi-movie/mov...
---------------------------------------------------------------------------
Marathi film Killa wins Crystal Bear at Berlinale
Marathi-language film Killa directed by Avinash Arun won the Crystal Bear for the Best Film awarded by the Children’s Jury in Generation Kplus section at the 64th Berlin International Film Festival. The section caters to children and young audiences at the festival.
हंसी तो फंसी.....
तिच्याकडे "ऐश्वर्यासारखे" सौंदर्य नाही .. नाही तिच्याकडे "माधुरी" सारखे निखळ हास्य.. ती "बिपाशा" सारखी बोल्ड नाही .. दिपिका सारखी देखणी उंची पण नाही ..... तरी ही ती पडद्यावर असल्यावर एक क्षण देखील लक्ष तिच्यावरुन बाजुला जात नाही... "परिणिती चोप्रा" ने आपल्या अवखळ , अल्लड , सॉल्लिड अभिनयाने संपुर्ण चित्रपट खांद्यावर लिलया उचलला आहे...संपुर्ण चित्रपटात ती अक्षरश: "ड्रामाक्वीन" म्हणुनच वावरली आहे.. कधी काय करेल याचा भरोसाच नाही चित्रपटात..
भारतात चांगल्या कलाकृतींना जीवन नाही अस मला सतत वाटत असतं. इथल्या लोकांची कलागुणांची पारख कमी पडतेय कि मुळात कलागुणांची आवडंच नाही हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण असे आहे खरे …. आणि फिल्म च्या बाबतीत हे पूर्वीपासून घडत होते त्याहीपेक्षा आज ते त्याहीपलीकडे अजीजीने घडत आहे. म्हणुनच कदाचित 'The ship of theseus' सारख्या दर्जेदार फिल्म भारताच्याच निर्मात्यांना भारतात रिलीज करावा वाटत नाही. त्यासाठी कोणीतरी (किरण-आमिर खान) विशेष प्रयत्न घेऊन आपल्यासाठी म्हणून रिलीज करतात आणि इतकं होऊनही परदेशात गाजलेला सिनेमा त्याच्याच देशात भारतात चक्क आदळतो आणि वाईटटट आदळतो.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ज्या चित्रपटाची भरपूर हवा झाली आहे तो म्हणजे 'टाईमपास'. रवि जाधव यांचा हा चौथा चित्रपट. नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक सारखे उत्तम चित्रपट देणाऱ्या रवि जाधव यांनी त्याचा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केलाय आणि त्याला उत्तमरित्या प्रसिद्धी मिळवून दिल्याने जिकडे तिकडे 'टाईमपास'ची चर्चा आहे.