काल " मला काहीच प्रॉब्लेम नाही " बघितला . सिनेमा अजिबातच समजला नाही हाच आम्हाला प्रॉब्लेम झाला. नायक नायिका दोघंही आईवडिंलाच्या मनाविरुद्ध जाऊन कोर्टात लग्न करतात. दोन्ही पालकांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतात पण समजाऊ शकत नाहीत. मग काय लग्न करतात आणि स्वतःच घरकुल उभारतात . कष्ट चालूच असतात आणि काहीतरी बिनसतं अस नायिकेला जाणवत पण ते काय आहे ते प्रेक्षकांना समजतच नाही कारण काही प्रॉब्लेमच दाखवला नाहीये . बिनसण्याकरता काय प्रॉब्लेम असतो तो सशक्तपणे अधोरेखितच होत नाही . सगळं वरवरचं वाटत राहत. नायक सरळ मार्गी आहे . तो ऑफिस मध्ये काही अफरातफर/झोलझाल करत नाही .
ऐलान-ए-जंग या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा रिव्यू क्राउडसोर्सिंग सारखा लिहू. म्हणजे सर्वांना त्यात लिहीता येइल. गेल्या २-३ दिवसांत इतर बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.
इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका
फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याच्या इराद्याने " तुर्कमान गेट " या वस्तीवर बुलडोझर फिरवला जातो. वस्तीला आग लावली जाते /जाळपोळ केली जाते या सगळ्या गदारोळात आपली नायिका सापडते आणि अचानक तिला दोन लहान मुलं दिसतात. भेदरलेली/घाबरलेली . एकटीच . त्या जाळपोळीत त्यांचं रक्षण करण्यासाठी नायिका धावून जाते आणि त्या छोट्या मुलांच्या चक्रव्ह्यूहात जी काही अडकते आणि खऱ्या खुऱ्या चित्रपटाला सुरवात होते. नायिकेचा नवरा सरकारी ऑफिसर असतो . त्याने मुलांना घरात ठेऊन घेण्यासाठी नायिकेवर बंदी घालणं.
कालच जग्गा जासूस पाहिला. इथे आलेला रिव्ह्यू मुद्दामच वाचला नव्हता.
आता डिस्क्लेमर : मला रणबीर कपूर काही फार आवडत नाही, अरिजीत तर अजिबात आवडत नाही. प्रितम चाल ढाप्या असला तरी तो आवडतो.
बॉलिवूड मध्ये सतत आपण बघत आलो आहोत की हिरो हिरॉइनीचा पाठलाग करत असतो, तिला त्रास देत असतो, "ना का मतलब हा होता है" असे म्हणतो. आधीपासून हे सुरू आहेच पण ९० च्या दशकात "खुद को क्या समझती है" , "खंबे जैसी खडी है" वगैरे गाण्यांनी या गोष्टींना अधिकच हातभार लावला. आता खरं तर हे स्टॉकींग चूकीचे आहे. असे करायला नको. नो म्हणजे नो असे काही पिक्चर्स येत होते. पिंक सारख्या चांगल्या चित्रपटातून साध्या आणि स्पष्ट भाषेत हे समजवून सांगत होते.
कुठल्याही चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण याबरोबरच 'संवाद' हेही महत्वाचं अंग असतं.
काही चित्रपटांमधले निवडक quotes, किंवा आपल्या देशी भाषेत 'डायलॉग्स' हे त्या चित्रपटांइतकेच फेमस आहेत.
उदा.
'I made him an offer he couldn't refuse!'
'Play it again, Sam!'
किंवा अगदी आपल्या गवर्नरसाहेबांचा 'I'll be back!'
सध्या आमच्या गावात बायसिकल फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे. दररोज वेगवेगळे चित्रपट, डॉक्युमेंट्रीज, किंवा शॉर्ट फिल्म्स दाखवत आहेत. पण प्रत्येक गोष्ट ही सायकलशी संबंधित. त्यातून मिळणारे पैसे 'बाईक क्लब' या संस्थेला देणार आहेत की जी शाळेतल्या लहान मुलांना सायकल चालवायला शिकवते आणि त्यांना एक एक सायकलही देते. तर काल तिथे 'ब्रेकिंग अवे' असा चित्रपट असणार होता. आता अॅकॅडमी पुरस्कार मिळालेला चित्रपट आणि सायकलींगवर असणारा म्हटल्यावर सोनेपे सुहागा म्हणत आम्ही हजेरी लावली. चित्रपटाबद्दल तसे म्हटले तर फार काही माहिती नव्हती.
या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..
सध्या चालू असलेला गदारोळ बघुन राहावलं नाही म्हणुन हा धागाप्रपंच..
यावर्षीचा 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्या'चा पुरस्कार 'रुस्तम' या चित्रपटासाठी 'अक्षय कुमार' याला प्रदान करण्यात आला.. याबद्दल सगळ्यांच्या टोकाच्या प्रतिक्रिया पाहण्यात आल्या.
या विभागातील पुरस्कारकरिता असलेल्या ११ ज्युरींच्या टिमबद्दल सगळ्यांनी बेकार जुरी डिसीजन असे निकष काढलेले दिसत आहे. यात मुख्य असलेल्या 'प्रियदर्शन' ला सर्वांनी टारगेट करुन केवळ अक्षय कुमारला फेवर करायचा म्हणुन त्याला पुरस्कार दिला असे आरोप लोकं त्याच्यावर करत असलेले दिसताहेत.
झुकलेली नजर, ओठांवर मंद स्मित आणि एक लाजरा कटाक्ष…अगदी क्षणभरच.. पण त्या क्षणभरच्या नजरभेटीतूनही जी कुठल्याही पुरुषाला वेड लावू शकते, ओढ लावू शकते ती खरी गेइशा!!
स्पर्श नाही, अंगप्रदर्शन नाही किंवा सवंग हावभाव नाहीत...फक्त एक कटाक्ष.
'गेइशा'- जपानच्या इतिहासातले, त्याच्या संस्कृतिक जडणघडणीतले महत्त्वाचे अंग. सामाजिक जीवनाचा अभिमानास्पद नसला तरी एक अविभाज्य भाग.