ऑगस्ट, २०१६. रिओ ऑलिंपिक्सचा उद्घाटन सोहळा. खेळाडूंचे लहान-मोठे चमू आपापल्या देशांच्या झेंड्यांसहित मैदानात येत होते. त्या-त्या देशांच्या नावांच्या उद्घोषणा होत होत्या. टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचं स्वागत होत होतं. त्या सगळ्यांमध्ये १० खेळाडूंचा एक लहानसा गट जरा वेगळा होता. ते सर्वजण ऑलिंपिक्सची खूण असलेल्या पाच वर्तुळांच्या झेंड्यामागून चालत होते. त्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताच समस्त प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. स्टेडियममध्ये उद्घोषणा झाली- ‘रेफ्युजी ऑलिंपिक टीम’...
"हे कपडे घालून त्या ठिकाणी जाणं बरं दिसेल का?" कुणीतरी कुणाला तरी टोकलं. कुणीतरी हाच प्रश्न आरशात बघत स्वतःशीच उच्चारला. कुणीतरी मॉलमधल्या रॅकवरचा कपडा अंगाला लावून दाखवत बरोबरच्या कुणालातरी विचारला. खूप खूप प्रकारे हाच प्रश्न अनेकांनी खेळवून बघितला. हे आजचं नाही. मानवाच्या इतिहासात अंगावर विविध गोष्टी वागवण्याची सुरुवात झाली तेव्हापासून लाखो करोडोवेळा प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक समूहाचा या प्रश्नाशी सामना झाला आहे.
नमस्कार. सध्याचा काळ हा असा आहे की कोणाशीही बोलताना आधी एक वाक्य बोलावं लागतं. आपण सर्व ठीक आहात ना? सर्व जण ठीक असतील आणि राहतील अशी आशा करतो आणि काही गोष्टी बोलतो. नुकताच दोन जवळच्या लहान मुलांच्या मस्ती मजा आणि भांडणाचा प्रसंग घडला. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना मुलं कशी प्रतिसाद देतात आणि कसे वागतात हे बघायला मिळालं. आणि त्या प्रसंगामुळे काही गोष्टींची जाणीवही झाली. त्यासंदर्भात काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करतो.
तो अवघड घाट उतरताना नेहाच्या मनात थोडीशी धाकधूक होती. पण ती ज्या निग्रहाने आणि कराराने निघाली होती तो त्याहून कैक पटींनी अधिक होता. सराईतासारखी बाईक चालवत ती अंतर काटत होती. रस्त्यावरचे इतर प्रवासी एकतर तिच्याकडे कुतुहलाने पाहत होते किंवा मग 'आजकालच्या पोरी, तुम्हाला सांगतो..' या मथळ्याखाली येणारा नैतिक निबंध वाचत पुढे जात होते. तिचं मात्र या कशाकडेच लक्ष नव्हतं. वार्यावर उडत असल्यासारखी ती गाडी चालवत होती. मध्येच एखादं मनोरम दृश्य पाहण्यासाठी म्हणून क्षणभर थांबुन त्या खोल दर्यांमधून घोंघावणारा रानवारा श्वासात भरून घेत त्याच्यासारखीच बेभान वाहत होती. सूर्य पश्चिमेकडे कलला होता.
सुशांत ,बाँलिवुड मधील एक उगवता तारा काही अपरिहार्य कारणामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या करतो आणि काल सत्तेत आणि आज विरोधात असलेल्या नेत्यांच्या हाती कोलित मिळते मीडियाला ब्रेकिंग न्युज सापडतात आणि मग एका आत्महत्येचे सुरु होता ते राजकारण आणि सुशांतची आत्महत्या की खुन हा प्रश्न निर्माण केला जातो आणि न्यायाची मागणी करतराजकारण सुरु होत तर सुशांतच्या सरणावर मीडिया टिआरपिची पोळी भाजुन घेतो चौकशीला अनेक फाटे फुटतात सुशांत ड्रग अँडीक्ट होता, सुशांत गांजेकस होता बेवडा होता चारचार पोरीफिरवत होता आणि शेवटी तो मनोरूग्ण होता हे मीडिया महिनाभर ब्रेकिंग न्युजच्या नावाखाली दाखवत असतो तर राजकारणी मतांच्या पो
माईंची एकसष्टी.
"मी आणि माझी छोटी बहीण अमृतवल्ली यांचं शिक्षण फार कष्टात झालं. आमच्या मोठ्या काकांनी आमची सगळी इस्टेट बळकावली आणि आम्हाला घराबाहेर काढलं. बाबा एका छोट्याश्या कंपनीत स्टोअर कीपर म्हणून काम करायचे. आम्ही लहानपणी बरेच हाल सोसले. आई इतरांच्याकडे स्वैपाक करायला जायची. अशा परिस्थितीत माझं शिक्षण झालं. इंग्रजी विषय घेऊन एम. ए. केलं आणि आणि नंतर शिमोगा इथल्या एका कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून मी नोकरीला सुरुवात केली. अमृतवल्लिने ही तेच केलं आणि त्यानंतर आमच्या घरात थोडीशी आर्थिक सुबत्ता आली."
सध्या महाराष्ट्रात जे पुजा चव्हाण हीच्या मरणा वर राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्र युपीच्या रांगेत उभा राहतोय की काय असे वाटण्याजोगे दुर्दैवी आहे. एक जीव गेलाय त्यावर राजकारणी त्यांची पोळी भाजत आहे. ज्या मंत्र्याचा या प्रकरणाशी संबंध आहे असे बोलले जातेय तो मंत्री बारा दिवस पसार काय होतो नंतर समाजापुढे येउन भाषण काय देतो हे सर्व लाजीरवाणे आहे.
"अरे दिपक ! हे आर ओ वॉटर प्युरीफायर कालपासून चालतच नाहीये. प्यायला पाणी कसे मिळणार ?"
"कंपनीच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून कंप्लेंट दे. ते सर्विस मॅन पाठवतील. त्याच्याकडून दुरुस्त करून घे." "हेल्पलाइन नंबर तुला माहित आहे का ?"
"नाही ग ! गुगलवर शोध ना .."
"अरे हो.. विसरलेच.." ज्योतीने लगेच गुगल वरून वॉटर प्युरीफायर कंपनीचा हेल्पलाइन नंबर शोधून कॉल केला आणि कम्प्लेंट दिली. सर्विस मॅनला दुपारी दोन वाजता पाठवतो, असे त्या हेल्पलाइन वर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले.
आज महात्मा गांधी पुण्यतिथी. महात्म्यांचा क्रुर खुन होउन ७२ वर्षे झालीत. खुन्यांना फासावर टांगले गेले.खुनी कुप्रसिद्ध झाले तर
महात्मा अमर झाला.
भारतात बुध्द व गांधीजी हे दोन महापुरुष होउन गेले. गौतम बुद्ध व गांधीचा देश म्हणुन जग भारताला ओळखते..
अश्या ह्या भारताच्या स्वातंत्र्य नायक असलेल्या महात्म्याचा आज स्म्रृतिदिन. महात्मा गांधीना भावपुर्ण श्रध्दांजली.
महात्मा गांधी हा विषय काही सहा सात ओळीत मांडण्यासारखा नाही. सहा वर्षापुर्वी त्यांच्यावर एक लेख लिहिला होता त्याची लिंक देत आहे.