एक पान... गळालेलं
" पहिल्यांदाच वेळेवर आलीयेस... बैस "
" हुं...महत्वाची वेळ निघून गेल्यावर, बाकी वेळांना महत्व उरतं कुठं?"
" माझा नंबर बरा आठवला तुला, इतक्या दिवसांनी?"
" विसरलेय कुठे मी अजून काही?"
"नीट बोलाणारेस का? तू बोलावलं म्हणून आलोय "
"काहीच नीट नाही राहिलं रे, मग बोलणं कुठून राहणार?"
"एनी वे, कशीयेस?"
"पाणी येत नाही हल्ली डोळ्यात, बाकी मस्त... तू ? "
"आहे तसाच"
"म्हणजे डामाडौल"
"कधीच नव्हतो"
"मग हात का सोडलास?"
..
"काही वेगळं बोलुयात?"
"हुं..."
"हे तळं वेगळंच वाटतंय न आता"
"पाणी... पाणी बदललंय, दोन पावसाळे गेले ना!"