होळीच्या दिवशी बाहेरही पडणं अशक्य असल्यानं वेळ घालवण्यासाठी काही ना काही ठरवावंच लागलं असेल. टीव्हीवरचे कार्यक्रम पाहात कुणी सुट्टी ‘विनाकारणी’ लावली असेल, तर कुणी गप्पाटप्पा करत वेळ घालवला असेल.. त्या दिवशी आदल्या दिवशीचं एक वर्तमानपत्र चाळताना दोन बातम्या पुन्हा डोळ्यासमोर नाचू लागल्या. एका बातमीत होळीच्या भक्तिरंगांची भपकेबाज उधळण होती, तर दुसरीत, ‘सक्तीच्या भक्ती’चे रंग विखुरले होते..
लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिले भेटतात ते काऊ, चिऊ, माऊ आणि भुभु. मग विठुविठु पोपट येतो. 'साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी' करत साळुंकी येते. रामाच्या देवळाला पाच फेर्या मारणारी घार भेटते. ससा, कासव भेटतात ...... हळूहळू हे संग्रहालय वाढायला लागतं.
पण या कोणाला अजून खास नावं आलेली नसतात. टिप्या, मोती अशी जेनेरिक नावं असली तरी त्यांना खास व्यक्तिमत्त्व आलेलं नसतं.
पण मग पुढच्या आयुष्यात एकसेएक सुप्रसिद्ध प्राणी-पक्षी भेटू लागतात. त्यांचं खास वैशिष्ट्य असतं, त्यांना व्यक्तिमत्व असतं आणि/किंवा त्यांनी एखादी लक्षात राहणारी भुमिका तरी बजावलेली असते.
बसमधून उतरता उतरता तो बोलला.
"सॉरी. माफ करा. जे काही झाले ते मुद्दाम नाही केले मी."
"सगळेच पुरुष सारखेच तुम्ही. बेशरम! बाई दिसले की आले लांडगे धावत!"
हे काल घडले.
"अहो सौभाग्यवती. लक्ष कुठे आहे तुमचे? इतक्या कुठे रमलात तुम्ही?" अजितने हलवून विचारले.
"काही नाही हो. असंच बसले होते शांत." मी उगाच म्हटले त्याला तसे आणि विषय टाळला.
आता यांना कसे सांगू की, माझ्या मनात काय चाललंय ते.समजून घेतील का ते?
'बायकोचा मित्र आणि नवऱ्याची मैत्रीण' हि दोन असून नसलेली नाती आहेत; ज्यांना कधीच समाज मान्य करत नाही. समाजच काय तर? आपणही कधी मान्य करत नाही; करणार नाही.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगरी जवळच एक आयटीपार्क नावाचं शहर होतं . शहर मोठ टूमदार . मोठ्या मोठ्या इमारती, सुंदर चौपदरी रस्ते. देशाच्या राजानेही या नगरीसाठी बरयाच सोयी-सुविधा मोफत दिल्या होते. करआकारणी सवलतीच्या दारात केली होती. कामगार कायदे पुरातन असल्याने या नगरीला त्यातून सुट देण्यात आली . ह्या नगरीचा विकास होण्यात एकंदर राजाही प्रयत्नशील होता. एकूणच सगळं ऐटीत चालल होतं . शहरातले लोक सुजाण , सुशिक्षित आणि कामसू होते. त्यांच कामही बौद्धिक आणि आवडीचे असे होते. रोज सकाळी शहरातली लोक आपल्या आपल्या संस्थेत जात. प्रत्येक संस्थेत त्यांना चांगली वागणूक मिळत असे.
आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का?
आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता मिळाली किंवा मिळाली नाही, तरीही पक्ष संघटनेत प्रचंड फेरबदल करण्याचा निर्णय काँग्रेस महासमितीच्या काही गुप्त बैठकांमध्ये झाला असून निवडणुकीनंतर राजसंन्यास घेण्याचे विद्यमान गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मनसुबे पक्षातूनच उधळून लावले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. शिंदे यांच्यावर सोपविल्या जाणाऱ्या एका अतिमहत्त्वाच्या जबाबदारीपूर्वी या जबाबदारीस ते पात्र आहेत किंवा नाहीत याची पडताळणी गेल्या काही महिन्यांपासून पक्षाचे अतिवरिष्ठ नेते अत्यंत गुप्तपणे करीत आहेत.