गद्यलेखन
लॉंग ड्राईव्ह
तो.... आणि ती... एका लॉंग ड्राईव्हवर जाताना...
रस्त्यावरती एकाचवेळी धावत असतं बरंच काही...
एक गाडी, चार चाकं, दोन मनं...
एक नशिब, लक्षावधी विचार अन्... काही अल्वार स्वप्नं...
तो.... आणि ती... एका लॉंग ड्राईव्हवर जाताना...
स्टिअरिंग व्हीलवर आवळलेली त्याची दणकट मूठ
आव्हान देतेसे वाटते समोर पसरलेल्या सगळ्याच वाटांना...
आणि उघड्या खिडकिच्या कडेवर विसावलेली तिची नाजूक बोटं
भूल घालत रहातात त्याच्या आकाशभर पसरू पहाणार्या वितभर कर्तृत्वाला
मध्येच पहातो तो तिच्या डोळ्यांत... शोधतो काहितरी... त्याला हवंसं...
पण तिची नजर लांब आभाळात... शोधत असते काही नवंसं...
धागा
गझले वरच्या गझला वाचुन आणि त्यातिल प्रतिसाद पाहुन एक फुटकळ काव्य सुचले ते इथे टाकत आहे. त्यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी हे डीलिट करुन टाकेन.
(आणि इथे ते सुट होत नसेल तर इतरत्र हलविन्यात येयिल)
एक टाइम पास प्रयत्न
कोणाचा हा धागा
कोणाचा हा त्रागा
कोण भरे रागा
कळेनाचि!!
गझलेच्या बागा
करुनिया रोगा
करमे ती भोगा
फळेनाचि!!!
सरांचा तो सोगा
देउनिया दगा
ओढण्याचा त्रागा
संपेनाचि!!
कोण म्हने उगा
फोडतो हा फुगा
कवटाळी खगा
रुचेनाचि!!
कोन इथे सगा
पांघरुनी झगा
देयीलही दगा
मीळेनाचि!!
दुःख
"मी दुःखात आहे." हे माणूस किती प्रामाणिकपणे. मनापासून आणि खरंतर कौतुकाने मान्य करतो! पण "मी सुखात आहे." हेही तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि मनापासून का मान्य केलं जात नाही? "मी सुखात आहे" म्हणणार्यांच्या स्वरात काहिसा विषाद किंवा डोळ्यांत सत्य लपवण्याच्या धडपडीसारखे भाव असायलाच हवेत का? का नाही तो छातीठोकपणे सागू शकत की "हो... मी सुखात आहे! मला असलंही दुःख नाही! मला कुणाकडून कसलीही तक्रार नाही! माझी जेवढी अपेक्षा होती, माझी जेवढी पात्रता होती, त्याहून कित्येक पटींनी जास्त मला आयुष्याकडून मिळालेलं आहे. त्यासाठी मी द्देवाचा ऋणी आहे. आभारी आहे. समाधानी आहे. सुखी आहे."
पत्र-कथा
पंधराशे हॅरिसन - चॅलेंज
ऋतुराज – वसंत
॥ श्री ॥
‘हा वसंत रंग भरीत जगती येतसे पहा
बहरल्या दिशा दहा!
कोकीळा ही उपवनात ! अमृतमधुर गीत गात!
रम्य दिवस चांदरात , फिरत फिरत भृंग हा ॥ ‘
ऋतुराज! म्हणजे वसंतऋतु ! दहा दिशांना बहरून टाकत येतो हा ऋतुंचा राजा ! याच्या आगमनाच्या आधीच सुगंधाच्या रूपाने ढोल नगारे वाजायला लागतात.आणि मोहोर-पानांची फळाफुलांची तोरणे सगळीकडे स्वागत करायला लागतात.
गीतेत विभूतीयोगाच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘ पृथ्वीवरचा ‘कुसुमाकर’म्हणजेच वसंतऋतु तो म्हणजे मीच !’
'परिचय'- बर्खूरदार खलनायकाचा !....’दादासाहेब फाळके ‘पुरस्काराचे निमित्ताने !
आज दादासाहेब फाळके पुरस्काराने एक असे व्यक्तिमत्व सन्मानित होत आहे कि ज्यामुळे सन्मानित व्यक्तिमत्व अधिक उजळून दिसणार आहे ? का त्या पुरस्काराचा सन्मान होतो आहे ? असा प्रश्न पडावा.
कारण १९६९ पासून गेली चव्वेचाळीस वर्षे दिला जाणारा हा भारत सरकारचा मानाचा पुरस्कार हा,दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून माहिती आणि नभोवाणी मंत्रालयामार्फत सुरु करण्यात आला.
तडकासे
"डोन्ट टच मी"
९३ वर्षांचे भाई, म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर, अंगात असेल नसेल ती ताकद एकवटून त्या गृहस्थाला ओरडून म्हणाले.
रिक्षावाला - ४ (अंतिम)
आधीचे भाग...
भाग १ - http://www.maayboli.com/node/42624
भाग २ - http://www.maayboli.com/node/42643
भाग ३ - http://www.maayboli.com/node/42647
तुषारने नीताकडे मोर्चा वळवला.
"तुम्ही... आय मीन... तू काहितरी बोल ना... ताई..."
नीताने एक थंड कटाक्ष तुषारकडे टाकला. इतका थंड की तुषारच्या अंगावर शहारा आला. पण लगेचच तिच्या डोळ्यात त्याला सामान्य भाव दिसले.
"मी? काय बोलू?"
"तुमच्या मिस्टरांचे युद्धातले काही अनुभव सांगा की."
नीताचं तोंड जरासं पडलं. "ते नसतात इथे. त्यांचे अनुभव सांगण्यापुरतेही."
"त्यांची खूप आठवण येते तुला?"
"...."
Pages
