मळभ सरले दाटलेले, आभाळाच्या अंगणी
बरसून झड गेली, लुकलुकली शुक्राची चांदणी
कोलाहल भावबंधनांचा, दूर मागे राहिला
सुटला रेशमी गुंता, कल्लोळ हृदयीचा थांबला
डोहात शांततेच्या खोल, सावकाश उठले तरंग
साद कानी ओमकाराची, जसा राउळीचा घंटानाद
विराट अन अथांग मनाचा, शुद्ध झाला आरसा
साठले ब्रह्मांड हृदयी, साक्षात्कार हा चिरंतनाचा
आज कित्येक दिवसांनी माझे वाण्याकडे जाणे झाले. निमित्त होते, १०० ग्राम अमूल बटरचे पाकिट, फक्त.
नाक्यावरचाच वाणी. माझ्या जन्मापासून बघत असलेले दुकान. एकमेकांच्या चेहर्याची छानपैकी ओळख. मी आत शिरताच गल्ल्यावर बसलेल्या त्या वाण्याने, वय वर्षे साधारण पन्नास, मला हात दाखवत "बोलो शेठ" म्हणत माझे स्वागत केले. असे कोणी वयस्कर माणसाने ‘शेठ वा साहेब’ पुकारले कि उगाच संकोचल्यासारखे वाटावे अश्या वयात मी असल्याने मला तसेच वाटणे अपेक्षित होते. पण आज मात्र गंमत वाटली. कदाचित आतून काहीतरी सुखावलेही गेले. पण असे वाटण्यामागे होता तो माझा भूतकाळ.
भक्त - सकाम आणि निष्काम - श्री ज्ञानेश्वरी अभ्यास भाग ११.
अन्तवत्तु फलं तेषां तद्भ्वत्यल्पमेधसाम् |
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ||अ. ७ - २३||
(अल्प बुद्धीमुळे त्यांस मिळे फळ अशाश्वत । देवांचे भक्त देवांस माझे ते मज पावती ॥ गीताई ॥)
देवाकडे कोण काय मागेल हे काही सांगता येत नाही. अगदी छोट्याशा गोष्टी मागणार्यांपासून ते मला तुझ्याशिवाय काहीही नको असे म्हणणारे - अशा विविध मंडळींबद्दल स्वतः भगवंत, माऊली काय म्हणाताहेत ते पाहूयात.
पैल तो गे काऊ कोकताहे ।
लहानपणची गोष्ट. दारातल्या झाडावर बसलेला एखादा कावळा जोरजोरात ओरडू लागला की आई / आजी म्हणायची - आज कोणीतरी पाहुणा येणार रे ... मी विचारायचो - तुला काय माहित ? त्यावर उत्तर यायचे - हा काय कावळा ओरडतोय ना !! त्याला बरोबर ठाऊक असते कुठल्या घरी पाहुणा येणार ते.. तो बरोब्बर त्या घरापाशीच जाऊन ओरडणार मग ...
माझं बालमन आनंदून जायचं आणि पुढे काही काळ कोण बरं येणार आज पाहुणा ?? या विचारात छान मजेत जायचा ...
गेल्या आठवड्याची गोष्ट. तो ट्रेनमध्ये सरपटत भीक मागत होता. फर्स्टक्लासचा डब्बा. खरे तर या डब्यात जास्त भीक मिळत नाही. आपल्या डब्यात भिकार्यांचा त्रास नको म्हणून फर्स्टक्लासची हुशार पब्लिक त्यांना भीक मिळायची सवय लावत नाही. अर्थात मी देखील दिली नाहीच. पुढचेच स्टेशन माझे होते. मी दारावर उभा राहिलो. तो सुद्धा सरपटत सरपटत दारावर आला. उतरणारे आणखी कोणीच नव्हते, तरीही मी बाजूला सरून त्याला जागा करून दिली. "तू उतर बाबा पहिला, उगाच उशीर झाला आणि गाडी चालू झाली तर माझे काय, मी आहे धडधाकट, मारेन आरामात उडी." आता हि दर्यादिली दाखवायचे आणखी एक कारण म्हणजे सतत सरपटल्याने त्याचे मळलेले कपडे.
सामान्य माणूस नास्तिक असू शकतो का ?
कारण मी नास्तिक आहे, असा माझा समज आहे. मी नास्तिक असण्याने इतरांना त्रास होतोय असं आजवरच्या वाटचालीवरून वाटलं नाही. पण मी नास्तिक का आहे याची कारणं मला माहीत असलीच पाहीजेत असा आजूबाजूच्यांचा आग्रह का ?
मग मिळेल ते वाचावं लागतं. म्हणजे असं वाटतं की आपण इतरांच्या कटकटीला वैतागून वाचतोय हे सर्व..
पण खरं म्हणजे
माझ्या नास्तिक असण्याशी माझा अंतर्गत झगडा चालू असतो. निरंतर.
मग सगळी तत्त्वज्ञानं थोडी थोडी, झेपेलशी चाळून मेंदू बधीर होतो. वाचनासाठी डोळे खोबणीतून बाहेर येतात आणि झोप न झाल्याने आता आत खेचले जाऊन मेंदूला चिकटतात.
भाग २ .
प्रस्तावना
धन्यभागी आहे...
नुकताच कोल्हपुरजवळच्या विपश्यनाध्यान शिबिरात साधना कोर्स करून आलो.
अहोभाग्यम कि मला चिन्मय, माझ्या मुलाने तेथे जायला आग्रह धरला. मित्र व नातलग शरदने मला याबाबत काही माहिती सांगितली. वृद्ध आईने माझ्याप्रकृतीची काळजी नको जरूर जा. असे म्हटले तर पत्निने आनंदाने जायला परवानगी दिली. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या प्रोत्साहनामुळे मला ही प्राचीन ध्यानसाधना करता येणे शक्य झाले. पुन्हा एकवार धन्यवाद....
शरीयतवर आधारीत काझी आणि त्यांचे फैसले याला कायद्याने मान्यता नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. असे निकाल किंवा फतवे मानण्याचे बंधन नाही असा निकालही सुप्रीम कोर्टाने दिला. परंतु अश्या न्यायप्रक्रियेवर मात्र बंदी घालायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
मराठी पेपरातल्या बातम्या किंवा दुरदर्शनवरच्या बातम्या अर्धवट होत्या म्हणुन जेव्हा इंटरनेटवर पाहिले तेव्हा हे वाचुन धक्काच बसला.
http://khabar.ibnlive.in.com/news/123214/1
पुस्तक परिचय – विज्ञानाच्यादृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म
फोटोत डावी कडून श्री. श्री श्री भट, शशिकांत ओक ओक, डॉप.वि. वर्तक आणि धनुर्धारीचे संपादक-मालक श्री सापळे
लेखक– प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक –०990200258
तू गेल्यावर पक्के घर नुसते कोसळते..
आधाराला कोणी नसले की मन छळते..!!
राहू दे ना हात घडीभर स्वप्नांभवती..
'अंगण झाडायाचे आहे' मजला कळते..!!
वापरतो तू कुठले अत्तर सांगत जा रे..
धरतीवर तू कोसळतांना जग दरवळते..!!
मी नसले की वार्यावरती लक्ष असू दे..
आठवणींच्या पानोपानी मी सळसळते..!!
बांधावरचे सुकले होते झाड जरासे..
त्याला कळले जमिनीमधले दुःख तरळते..!!
प्रत्येकाचे 'घर कौलारू' सुंदर नसते..
अंदर गेल्यावर कळते,छप्परही गळते..!!
आयुष्याची भाकर साला चन्द्र नसावा..
ते तर नक्की सुर्याइतके सत्य उजळते..!!