तत्त्वज्ञान

अभंगगाथा नव्हे झु़ंजगाथा ...

Submitted by पुरंदरे शशांक on 17 March, 2014 - 18:54

अभंगगाथा नव्हे झु़ंजगाथा ...

"तुकाराम बोल्होबा अंबिले" या नावाचा कोणी येक या सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील देहूग्रामी होऊन गेला.
सद्यकाळात हाच तुकाराम "संतश्रेष्ठ तुकाराम महाराज" यानावाने ओळखला जातो त्याच्याच जीवनझुंजीची गाथा समजून घेण्याचा हा एक अल्पसा, बालकवत प्रयत्न - या झुंजाचे वर्णन शब्दात करु शकणे हे जिथे अवघड तिथे या झुंजाची सखोलता कोणाच्या सहज ध्यानी येईल हे तर अजून अवघड - कारण ही झुंज अगदी जगावेगळीच होती, त्या झुंजीची महता सांगायची तर ती पार आकाशाहून थोर झालेली आहे एवढेच म्हणता येईल ......

नवपार्थहृद्गत : गीतेचा नव-आशयबोध

Submitted by भारती.. on 16 March, 2014 - 09:14

नवपार्थहृद्गत : गीतेचा नव-आशयबोध

दु:खकाळोखात चाचपलेलं,संदेह-आवर्तात झाकोळलेलं गीतेचं बांधकाम. ते प्रज्ञेच्या प्रकाशात पहाताना कसं वाटत असेल ? अन तेही समकालीन समवयीन प्रज्ञेच्या प्रकाशात ?

स्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच !

Submitted by शबाना on 7 March, 2014 - 06:55

महाभारताशी पहिली ओळख केव्हा, कशी हे सांगणे अवघडच. लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांतून, नंतर वाचलेल्या पुस्तकातून आणि नंतर चोप्रांच्या महाभारत मालिकेतून बराचसा कथाभाग समजलेला. सातवी आठवीत वाचलेल्या राधेय आणि मृत्युंजय मधल्या व्यक्तिरेखा अजूनही मनपटलावर कोरलेल्या. मग अनेक पुस्तकातून वेवेगळ्या अंगातून केलेले महाभारताचे, गीतेचे आणि कृष्णाबद्दलचे विवेचन- बरेचसे लक्षात राहिलेले पण विश्लेषण - विवेचन हे मुख्यतः भारतीय राजनीतीत घडणाऱ्या गेल्या दशकांच्या संदर्भातच.

भक्ति तों कठिण सुळावरील पोळी....

Submitted by पुरंदरे शशांक on 6 March, 2014 - 01:53

भक्ति तों कठिण सुळावरील पोळी....

"भक्ति" या विषयाचा आवाकाच इतका अवाढव्य आहे की त्यात नुसते डोकवायचे म्हटले तरीही ती फार फार अवघड गोष्ट आहे. आणि ही भक्ति आचरणात, अमलात आणण्याचे म्हटले तर फक्त संतमंडळीच ती करु जाणे. कारण जनसामान्यांच्या भक्तिच्या कल्पना आणि संतांना अभिप्रेत असलेली भक्ति यात जमीन-अस्मानाइतका फरक आहे.

सर्वांचा विनाश होणार: मोदींचे भाकीत

Submitted by Aseem Bhagwat on 2 March, 2014 - 16:36

गुजरातचे आदरणिय मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे प्रधानमत्रीपदाचे उमेदवार आणि स्टार प्रचारक यांनी काल उत्तर प्रदेशात बोलतांना सर्वांचा विनाश होणार आहे अशी भविष्यवाणी केली आहे. यापूर्वी विविध विषयातील त्यांच्या ज्ञानाने जनता दिपून गेलेली आहेच. आता या विषयातही त्यांना गती असून ते आधुनिक नॉस्त्रडॅमस असावेत असं वाटू लागलं आहे. मायन संस्कृतीच्या भविष्यवाणीनंतर आता नॉस्त्रडँमसच्याच भविष्याबद्दल उत्सुकता होती. ते कोडं मोदींनी उलगडलं आहे.

तुका म्हणे देह वाहिले विठ्ठली .....

Submitted by पुरंदरे शशांक on 2 March, 2014 - 10:19

तुका म्हणे देह वाहिले विठ्ठली .....

फाल्गुन महिना सुरु झाला की वेड्या मनाला एक ध्यास लागतो तो तुकोबांचा. इतरवेळेस त्यांचे भावभरले अभंग मनात रुंजी घालतच असतात पण फाल्गुन जसा जवळ येतो तसे त्यांचे इतर अभंग जास्त जवळचे वाटू लागतात - ज्यात त्यांची प्रखर विठ्ठलनिष्ठा अशी काही उफाळलेली दिसते की त्यापुढे त्यांना प्रपंच पार पार नकोसा वाटतो आहे.... - अशा त्या धुंदीतच ते एकटेच या लौकिकाकडे पाठ फिरवून त्या भामगिरी टेकडीवर जात असतील ..... आणि तिथे काय विठ्ठलाशी संवाद साधत असतील का आत्मसंवादात लीन होत असतील ??

काय करशील ?

Submitted by विजय देशमुख on 9 February, 2014 - 22:10

"काय करशील?"
पुन्हा एकदा त्याच्या तोंडुन तेच ऐकुन राज कंटाळला होता, पण त्याच्या अखंड बडबडीला त्याच्याकडे आता तरी काही उपाय दिसत नव्हता.
"बोल न बे.... आता काहुन चुप बसला...."
राजनं डायरी उघडली अन त्यात डोकं खुपसलं. १० बाय १० च्या खोपटात एका बल्बवर राजचा हिशोब चालु होता. नक्कीच बापुने पैसे काढले असावे, असा संशय त्याला आला.
"ए.... xxxxx तुझ्या बापाचं खात नाही लेका... समजलं ना.... मी .. मी कमावतो आणि पितो"

संत तुकाराम महाराजांचे परमशिष्य श्री निळोबाराय

Submitted by मी_आर्या on 6 February, 2014 - 07:02

नाशिक येथील श्री. नीळकंठ मोहिनीराज नांदुरकर यांनी अल्पशा संदर्भ सामग्रीवर संत निळोबाराय यांचं जीवनचरित्र लिहिलं आहे. त्यावरुनच निळोबांचा अल्पपरिचय करुन देते.

शब्दखुणा: 

विपश्यना - काही प्रश्न

Submitted by विजय देशमुख on 28 January, 2014 - 20:35

विपश्यना, या विषयावर अनेकदा हा आनंददायी अनुभव आहे, इतकच वाचल्या गेलं. पण एकदा तरी विपश्यना शिबिराला गेलं पाहिजे, असाही सल्ला बर्‍याच लोकांनी दिला आहे. त्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत.

१. ह्या शिबिराला वेगवेगळ्या केंद्रात (उपकेंद्रात) काही फरक आहे का? असल्यास कोणता.
२. या शिबिरात शिकवल्या जाणार्‍या ध्यान-पद्धती बाहेर सांगू नये, असे वाचले होते, ते बरोबर आहे का? असल्यास त्याचे काय कारण असावे?
३. या शिबिरासाठी काही पुर्वतयारी असावी का? असल्यास कोणती ? उदा. काही विशेष कपडे, जसे योगासनांसाठी वापरतात तसे, वगैरे...

मृत्युंजय

Submitted by व्यत्यय on 18 January, 2014 - 09:50

सर्व जगंच कसं नीट आखीव रेखीव आणि सुंदर होतं.
झोपडपट्ट्या नव्हत्या, गरीबी नव्हती. युद्ध नव्हती, कोणीही जन्मत: अधू किंवा अपंग नव्हतं. मनोरुग्णांचे कोंडवाडे नव्हते. वैज्ञानिक प्रगतीमुळे माणसाने सर्वच रोगांवर विजय मिळवलेला. अगदी म्हातारपणावर देखील. अपघातांमुळे होणारे तुरळक मृत्यू सोडले तर “मरण” हे काही कर्मठ विचारसरणीच्या लोकांचा दुराग्रह होता.

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान