विरहिणी

शेवटची प्रेमकथा

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 24 January, 2017 - 06:50

आलम दुनिया दिशाहीन पळत होती; पण पळूनही फायदा काय? कुठंही गेलं तरी ऑक्सिजन नव्हताच. एका रात्रीतला हा बदल. झाडांनी बंड पुकारलं होतं.सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर बंद केलं होतं त्यांनी प्राणवायु बनवणं. प्रकाशसंश्लेषणाची अशी पद्धत शोधली होती त्यांनी, ज्यात ऑक्सिजन बाहेर पडत नाही.

दोन-तिन तास पुरला कसाबसा प्राणवायु. नंतर सगळेजण गुदमरु लागले; मिळेल त्या वाहनात बसून धावू लागले अज्ञाताकडे. पण प्राण नव्हता कुठंच. माणसं तडफडून मरु लागली. हॉस्पिटल मध्ये होते काही ऑक्सिजन सिलेंडर्स. तेसुद्धा डॉक्टरांनीच पळवले, ज्यांच्यात दम होता त्यांनी डॉक्टरांचा खून करून ते मिळवले.

पैल तो गे काऊ कोकताहे ।

Submitted by पुरंदरे शशांक on 27 July, 2014 - 23:15

पैल तो गे काऊ कोकताहे ।

लहानपणची गोष्ट. दारातल्या झाडावर बसलेला एखादा कावळा जोरजोरात ओरडू लागला की आई / आजी म्हणायची - आज कोणीतरी पाहुणा येणार रे ... मी विचारायचो - तुला काय माहित ? त्यावर उत्तर यायचे - हा काय कावळा ओरडतोय ना !! त्याला बरोबर ठाऊक असते कुठल्या घरी पाहुणा येणार ते.. तो बरोब्बर त्या घरापाशीच जाऊन ओरडणार मग ...
माझं बालमन आनंदून जायचं आणि पुढे काही काळ कोण बरं येणार आज पाहुणा ?? या विचारात छान मजेत जायचा ...

Subscribe to RSS - विरहिणी