अॅब्सोल्युट असं काही नाही. मानवी बुद्धीमत्ता अंतिम नाही असं वाटू लागणार्या काही घटना घडल्या कि आपण आपल्या मान्यतांबद्दल साशंक होऊ लागतो.
राजकीय मान्यता असलेले लोकही काही घटनांबाबत चिडीचूप राहतात. कारण आपल्याला सोयीच्या अशाच घटनांचा ते आपल्या मान्यतांसाठी स्विकार करून बसलेले असतात. सोयीच्या आकलनाला कवटाळून बसलेले असतात. त्यावर वादविवाद करत राहतात. पण निसरड्या रेषेवर पोहोचताच भांबावून जातात. इथे आपल्या मान्यतांबाबत अधिक सजग होऊन नव्या गोष्टी स्विकारण्याची मानसिक तयारी दिसत नाही.
पुरातनाच्या दंतकथांतून
सूक्त स्फुरावे
अनंत हे अज्ञान तरी
ज्ञॆयास भिडावे
चिरंतनाने क्षणभंगुरही
भाळी धरावे
अनाहताच्या अनु-नादातच
नीरव व्हावे
यक्षप्रश्न सुटताना उरी का
शल्य उरावे?
त्या पडद्याच्या पल्याड वसते
गूढ असे "ते "काही
(अंतर "त्या"च्या-माझ्या मधले
घटते, कळतही नाही)
भेट अटळ आहेच "त्या"ची मग
वाट कशाला पाहू?
(अस्तित्वाचा सूर्य ग्रासण्या
अविरत टपला राहू)
"अस्तित्वाच्या पूर्णविरामा-
-नंतर काहीच नसते"-
(माहित असले - तरी मानसी
उत्कंठा का वसते?)
त्या पडद्याचे धूसर दर्शन
अधुनी मधुनी घडते
("जाऊनी वरती, परतुनी आले"
ऐसी कुजबुज होते ) 

आपल्या दररोजच्या जेवणात असलेली "चपाती / पोळी / रोटी" चा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता का?
"चपाती आंदोलन" म्हणून ओळखली गेलेली हि चळवळ खरंच स्वातंत्र्य लढ्याचा भाग होती का?
१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा चपाती आंदोलन होती का?
आणि जर असेल तर हे आंदोलन एव्हढे दुर्लक्षित का राहिले?
गुरूजी शिकवत होते.
" कोणतीही गोष्ट सिद्ध झाल्याशिवाय विज्ञान त्यास मान्यता देत नाही"
हे वाक्य उच्चारतानाच त्यांच्या सराईत भिरभिरत्या नजरेने डाव्या कोपर्यातले रंगडपोश भुट्टा आणि खॅनकस झिग्गो टिपले. दोघे आपसात खुसुर फुसूर करत होते.
"रंगडपोश , खॅनकस हवेत उड"
दोघे अचंबित.
"गुरूजी आम्ही कसे काय उडू ?"
कट कट ..
मागे जाऊयात.
पाऊस-कविता झाली पाडून
विठुलाही वेठिस धरिले
जशी मागणी तसा पुरवठा
ब्रीदवाक्य कवि-झोळीतले
जरा स्वस्थ बैसेन तोवरी
दिन येईल स्वातंत्र्याचा
हस्तिदंती मम मनोऱ्यातुनी
शब्द तिरंगी लिहिण्याचा
दुरून मग खुणवेल दिवाळी
शब्दांची आतषबाजी-
-करण्यासाठी सज्ज होऊनी
लावीन "प्रतिभेची(?)" बाजी
"स्वांत:सुखाय सारी धडपड"
जरी हे जगास कथितो मी
शब्दांच्या पलिकडे वसे ते
सांग कधी का पाहीन मी? 
सत्ता बळकावण्यासाठी काय वाट्टेल ते करणे व त्याचे समर्थन चाणक्यनीती, ऑपरेशन लोटस वगैरे म्हणत करणे, या भाजपच्या निलाजर्या खोटारडेपणाचा आता लोकांना वीट आलेला आहे.
हेडलाईन मॅनेजमेंट नावाचा अजून एक प्रकार आहे.
म्हणजे 'विरोधी पक्षांचे कडबोळे भाजपाला पर्याय होईल का' वगैरे हेडींग देउन लेख पाडायचा. त्याखाली कितीही पुराव्यासकट तोंडावर पाडले तरी वरवर पहाणार्यांना भाजप के खिलाफ सब लोक असे फिलींग द्यायचे काम होऊन गेलेले असते.
काही त्रासदायक प्रश्नांना काय ऊत्तर द्यावे?
१) गावी गेल्यावर केव्हा आला? केव्हा जाणार? कूठे राहतो? असा प्रश्न भेटनारे १०० लोक तरी विचारतात. तेच तेच ऊत्तर देऊन फार त्रास नी कंटाळा येतो. एकवेळ अशा येते की ह्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी घराबाहेर पडायचीच भिती वाटते.
२) दोन दिवसांच्या कामाला दोन दिवसच लागनार. तरी दोन दिवस का लागताहेत असं येऊन अनेक अडानी विचारतात. त्यांच्या पासून कशी सूटका करावी किंवा काय करावे की ते पून्हा असले फालतू प्रश्न विचारनार नाहीत.