अधल्या मधल्या नोंदी-२
तिचा वेग..
तिने गाडी मुख्य रस्त्यावर घेतली,
तेव्हा रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ होती....
तिचा वेग मर्यादितच होता.
नेहमी मर्यादित वेगानेच तर चालवायची ती गाडी....
वाहन चालवतांना, सगळी काळजी ती नेहमी घेतच होती...
तिचा वेग मर्यादित च होता, आपण सुरक्षित रहावं, आणी दुसऱ्यांनाही इजा होऊ नये म्हणून....
एक · गणपतीपुळे
अद्वैत त्याच्या आई आणि बाबांबरोबर गणपतीपुळ्याला आला होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत बाबांनी "गणपतीपुळ्याला जाऊयात" म्हटलं तेंव्हा त्याला खूप आनंद झाला कारण त्याला आता पहिल्यांदा समुद्र पाहाता येणार होता! तिथे जाईपर्यंत रोज रात्री झोपताना त्याच्या डोळ्यांसमोर फक्त लाटाच येत होत्या.
अयातुल्ला खामेनींचं वृत्त बड्या जागतिक वृत्तसंस्थांकडून आलेलं आहे. तसंच इराणच्या वृत्तसंस्थांनीही ते दिलं आहे.
मात्र सुरूवातीला इस्त्राएलच्या दाव्यानंतर इराणच्या प्रधानमंत्र्यांनी ते जिवंत असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर काही वेळाने दुसर्या नेत्याने ते मृत झाल्याची बातमी स्विकारली. पण त्यांच्या पार्थिवाचे चित्रण कुठेही दिसलेले नाही. अंत्यसंस्कारांचा पुरावा नाही.
३६ वर्षे एखाद्या देशावर राज्य करणारा नेता जर मारला गेला तर गोंधळाची स्थिती निर्माण होते. त्याचा फायदा घेऊन अमेरिकेसारखे देश तिथे आपला बाहुला बसवतात.
अॅब्सोल्युट असं काही नाही. मानवी बुद्धीमत्ता अंतिम नाही असं वाटू लागणार्या काही घटना घडल्या कि आपण आपल्या मान्यतांबद्दल साशंक होऊ लागतो.
राजकीय मान्यता असलेले लोकही काही घटनांबाबत चिडीचूप राहतात. कारण आपल्याला सोयीच्या अशाच घटनांचा ते आपल्या मान्यतांसाठी स्विकार करून बसलेले असतात. सोयीच्या आकलनाला कवटाळून बसलेले असतात. त्यावर वादविवाद करत राहतात. पण निसरड्या रेषेवर पोहोचताच भांबावून जातात. इथे आपल्या मान्यतांबाबत अधिक सजग होऊन नव्या गोष्टी स्विकारण्याची मानसिक तयारी दिसत नाही.
पुरातनाच्या दंतकथांतून
सूक्त स्फुरावे
अनंत हे अज्ञान तरी
ज्ञॆयास भिडावे
चिरंतनाने क्षणभंगुरही
भाळी धरावे
अनाहताच्या अनु-नादातच
नीरव व्हावे
यक्षप्रश्न सुटताना उरी का
शल्य उरावे?
त्या पडद्याच्या पल्याड वसते
गूढ असे "ते "काही
(अंतर "त्या"च्या-माझ्या मधले
घटते, कळतही नाही)
भेट अटळ आहेच "त्या"ची मग
वाट कशाला पाहू?
(अस्तित्वाचा सूर्य ग्रासण्या
अविरत टपला राहू)
"अस्तित्वाच्या पूर्णविरामा-
-नंतर काहीच नसते"-
(माहित असले - तरी मानसी
उत्कंठा का वसते?)
त्या पडद्याचे धूसर दर्शन
अधुनी मधुनी घडते
("जाऊनी वरती, परतुनी आले"
ऐसी कुजबुज होते ) 

आपल्या दररोजच्या जेवणात असलेली "चपाती / पोळी / रोटी" चा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता का?
"चपाती आंदोलन" म्हणून ओळखली गेलेली हि चळवळ खरंच स्वातंत्र्य लढ्याचा भाग होती का?
१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा चपाती आंदोलन होती का?
आणि जर असेल तर हे आंदोलन एव्हढे दुर्लक्षित का राहिले?
गुरूजी शिकवत होते.
" कोणतीही गोष्ट सिद्ध झाल्याशिवाय विज्ञान त्यास मान्यता देत नाही"
हे वाक्य उच्चारतानाच त्यांच्या सराईत भिरभिरत्या नजरेने डाव्या कोपर्यातले रंगडपोश भुट्टा आणि खॅनकस झिग्गो टिपले. दोघे आपसात खुसुर फुसूर करत होते.
"रंगडपोश , खॅनकस हवेत उड"
दोघे अचंबित.
"गुरूजी आम्ही कसे काय उडू ?"
कट कट ..
मागे जाऊयात.
पाऊस-कविता झाली पाडून
विठुलाही वेठिस धरिले
जशी मागणी तसा पुरवठा
ब्रीदवाक्य कवि-झोळीतले
जरा स्वस्थ बैसेन तोवरी
दिन येईल स्वातंत्र्याचा
हस्तिदंती मम मनोऱ्यातुनी
शब्द तिरंगी लिहिण्याचा
दुरून मग खुणवेल दिवाळी
शब्दांची आतषबाजी-
-करण्यासाठी सज्ज होऊनी
लावीन "प्रतिभेची(?)" बाजी
"स्वांत:सुखाय सारी धडपड"
जरी हे जगास कथितो मी
शब्दांच्या पलिकडे वसे ते
सांग कधी का पाहीन मी? 