असे आगळा राम आदर्शमूर्ती
जना दावूनी श्रेष्ठ कर्तव्यपूर्ती
वरी भाविका देतसे दिव्य भक्ती
अशा राघवासी स्मरावे भजावे
किती रामदासे जना बोधवावे
असे आगळा राम आदर्शमूर्ती
तया टाळूनी वाउगेची पूजीती
भ्रमा वाढवोनी रती आत्मघाती
अभक्ते स्वये देशही नासविती
बहु भक्त झाले इथे राघवाचे
पुढे गोडवे दिव्य ते सद्गुणाचे
तया पाहता कीव ये दुर्जनाचे
रवी तेज ते येई का काजव्याचे
जना उद्धराया स्वये राम येई
तया सांडूनी नष्ट ते दुष्ट ध्यायी
भ्रमाने भ्रमाते जगी वाढवीती
जनासी तरी व्यर्थचि घोळविती
भंडारा इस्पितळात आगीने होरपळून जळालेल्या १० नवजात बालकांच्या बातमीने महाराष्ट्र आज हादरला. १७ पैकी ७ बालके वाचू शकली, उरलेली १० जिवंत जळाल्याची बातमी प्रसारमाध्यमांत आहे. गृहमंत्री, चौकशी, मृतांच्या प्रजनकांना आर्थिक मदत वगैरे नेहेमीचे सोपोस्कारही सुरु झाले. संडासात बसून किंवा चहा पितापिता मोबाईलवर बातम्या वाचून किंवा उथळ अतिरंजित वृत्तवाहिन्यांचे अतिभावनिक वृत्तांत पाहून बऱ्याच जणांची दिवसाची "हळहळ व्यक्त" करण्याची भूकही आत्तापार्येंत शमली असेल.
लेखाच्या सुरुवातीला काही प्रसंग सांगणे आवश्यक आहेत. खालील प्रसंगातील नावे बदलली आहेत. जिथे जिथे ××× आहे, तिथे तिथे त्याऐवजी तुम्ही एखाद्या शिवीची कल्पना करा.
प्रसंग1:
खासगी कंपनी. अमोल लॅपटॉपवर काम करत आहे. खूप वर्क लोड आहे. तो आपला सहकारी विनितशी एका ऑफिसच्या कामासंदर्भात चॅट करतोय. तेवढ्यात चॅट विंडोवर सिनियर कस्टमरपैकी एक असलेला हरमित त्याला मेसेज पाठवतो.
"काल सांगितलेला रिपोर्ट पाठवला नाही का अजून? कालच रात्री पाठवायला सांगितला होता ना? उशीर का झाला?"
इतरांवर विश्वास असावा पण अति विश्वास नसावा. आणि एकदा एखाद्याचा वाईट अनुभव आला तरीही पुन्हा पूर्वीसारखाच संपूर्ण विश्वास त्या व्यक्तीवर ठेवतांना स्वतःला हजार वेळा प्रश्न विचारला पाहिजे.
दुधाने जीभ पोळली की ताकही फुंकून प्यायला हवे अशी म्हण आहे पण इथे तर दुधाने जीभ पोळल्यावर परत दूध पीतांनाच जर सावध नाही राहिले (फुंकर मारली नाही) तर पुन्हा जीभ पोळेल. नुसती पोळेल नाही तर जळेल.
मी चंद्राला विचारले, "हे चंद्रा सांग बरे, माझ्या प्रेयसी पेक्षाही सुंदर तरुणी या पृथ्वीवर आहे का रे?"
चंद्र म्हणाला, "मित्रा तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही. अरे इतक्या लांबून रात्रीच्या अंधारात काहीच स्पष्ट दिसत नाही!"
मी पुन्हा म्हटले, "मित्रा, माझ्या प्रश्नाला अशी बगल देऊ नकोस. तुझं खरं खरं मत सांगायला संकोच करू नकोस. अरे, नजरेचा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरकडून डोळे तपासून घे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार चष्मा बनवून घे!"
जय जय जयकारे नाम येता मुखासी
अविरत सुखवृष्टी अंतरी हो तयासी
सदयह्रदय माझी माऊली ज्ञानदेवी
कवळ तरी सुखाचे बाळका नित्य फावी
मुखि जरि नित ओवी येत की ज्ञानदेवी
अगणित सुखराशी लाभते भाविकासी
पठण मनन भावे त्यावरी ध्यास घेई
जननि अतिव प्रेमे मोक्ष भक्तीस देई
अपरमित गुणासी वर्णिता वर्णवेना
जननि तव कृपेला मोजिता मोजवेना
चरणि तरि असावे बालका दान देई
गुणगुणत स्वभावे अंतरी एक ओवी
श्री ज्ञानेश्वरमहाराजांचरणी प्रेमपूर्वक दंडवत.
कवळ..... घास, ग्रास
फावणे.... प्राप्त होणे
बाप आहेच अंतरी
आठवावे काय रुप
चाले विठ्ठलाचे नाम
असोनिया तो अरुप
श्वासी विठ्ठल विठ्ठल
रोमरोमी तोचि एक
देहाबाहेर अंतरी
नित्य वैकुंठनायक
नेत्र पाहती विठ्ठल
कर्णी विठ्ठलाचे नाम
मुखी जप नसे तरी
तोच घेई त्याचे नाम
हाती लिहवितो तोचि
अभंगात ठाकलासे
किर्तनात रंगूनिया
नाम थोर गर्जतसे
कळेचिना जनलोका
तुका समोर तो दिसे
क्षणामाजी पालटून
वैकुंठात भासलासे
देह दिसेना तरीही
ह्रदी बैसला अढळ
भाविकासी निश्चयाने
त्याच्या विश्वासाचे बळ
भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.
भूतकाळाची कबर उकरून झाली
राहिलेली हाडके चघळून झाली
होत आहे वेळ कसला निर्णयाला?
साक्ष सगळ्यांची अता वदवून झाली
वाटले, येशील मथुरेहून गावी
पण तुझी तर द्वारका वसवून झाली
जन्म सरल्यावर म्हणे, जगलोच नाही
कारणे आपापली ठरवून झाली
न्यायची आहे कुठे, माहीत नाही
जीवनाची पालखी सजवून झाली
अर्थात थोड्या प्रमाणात मत्सर चांगला असंही म्हटलं जातं . कारण तो आपल्याला प्रगतीसाठी मोटिव्हेट करतो .... मी जे आधीच्या भागात म्हटलं आहे , ते अशा गोष्टींबद्दल - ज्या प्रयत्नाने मिळण्यासारख्या नसतात ... अशी परिस्थिती जी आहे तशी स्वीकारण्याखेरीज आपल्याकडे दुसरा काहीही ऑप्शन नसतो . अशा गोष्टींबद्दल मनात पडलेलं मत्सराचं बीज हे फार विषारी ... दिसताक्षणी गोळ्या घालाव्या या लायकीचं.... फक्त प्रॉब्लेम हा की ते शोधायला गेल्याशिवाय दिसत नाही आणि आपल्याकडे त्याला मारता येईल अशा गोळ्याही नसतात .... ह्या गोळ्या म्हणजे आत्मचिंतन .. कशाकशासाठी कौन्सिलर शोधणार ...