शासन(सरकार)

पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

शब्दखुणा: 

ऑनलाईन मतदार नोंदणी बद्दलची माहीती. (भारतात)

Submitted by आ.रा.रा. on 25 January, 2019 - 11:13

सुजनहो,

लोकसभेच्या निवडणूका जवळ येत आहेत.

१ जानेवारी २०१९ रोजी जर तुम्ही १८ वर्षे वय पूर्ण केलेले असेल, तर मतदार म्हणून नोंदणी करून घेणे तुमचे कर्तव्य आहे.

हे करण्याचा सोप्पा ऑनलाईन मार्ग म्हणजे ही लिंक. https://nvsp.in/Forms/Forms/form6?lang=en-GB

तुम्ही जुने मतदार अस्लात अन उदा, एनाराय वगैरे, किंवा नोकरीधंद्या निमित्त इतर मतदारसंघात रहात असलात, तरी https://nvsp.in/ या लिंकवर जाऊन वेगवेगळे ऑप्शन्स वापरू शकता.

शब्दखुणा: 

स्वच्छ भारत अभियान ― एक विरोधाभास

Submitted by सेन्साय on 24 January, 2019 - 13:59

एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या मुलभुत गरजा भागवण्यास जेव्हा कुठलीही सरकारी यंत्रणा अपयशी ठरते तेव्हा मनाचा क़ौल नक्कीच त्या पक्षाच्या विरोधात जात राहतो. माझ्या परिसरातील सरकारी यंत्रणेकड़ून स्वच्छ भारत अभियानाचे सोंग पांघरून राजरोस सुरु असलेली अस्वच्छता आणि तद्अनुषंगाने होणारे आरोग्य विषयक गंभीर दुष्परिणाम ह्याबद्दल मला आज बोलायचं आहे.

राजकारणात कसे सक्रिय व्हावे?

Submitted by Mi Patil aahe. on 22 January, 2019 - 06:31

राजकारणात मायबोलीवरील कोणी सदस्य सक्रीय आहेत का?काही मार्गदर्शन करु शकाल का? राजकारणात कसे सक्रिय व्हावे, याबाबत मोलाचं मार्गदर्शन मिळू शकेल का?

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

गाडी (कार) च्या विक्रीनंतर खरेदीदाराने गाडीची कागदपत्रे आपल्या नावावर करून घेतली नाहीत तर काय करावे

Submitted by Parichit on 10 October, 2018 - 01:28

काही वर्षापूर्वी मी माझी कार जवळच्या नात्यातील एका व्यक्तीस विकली. त्यानंतर गाडीची कागदपत्रे स्वत:च्या नावावर करून घेतो म्हणून ती व्यक्ती माझ्याकडून मूळ कागदपत्रे घेऊन गेली. तेंव्हा आमचे संबंध चांगले होते त्यामुळे मी सुद्धा फार काळजी न करता सगळी कागदे त्याच्या हातात दिली. पण गाडीची कागदोपत्री ट्रान्स्फरचे हे काम त्याने कधी केलेच नाही. जवळची व्यक्ती आणि संबंध चांगले होते म्हणून मी सुद्धा त्याबाबत त्याला फार तगादा लावला नाही. आता इतकी वर्षे झाली अद्याप गाडी माझ्याच नावावर आहे. पण गाडी आणि तिची मूळ कागदपत्रे मात्र त्याच्याकडे आहेत. मध्यंतरी ह्या व्यक्तीशी संबंध काही कारणांवरून खूप बिघडले.

या भग्न मंदिरात , मग्न होऊन आरती करतोय

Submitted by सिद्धेश्वर विला... on 10 September, 2018 - 03:53

या भग्न मंदिरात

मग्न होऊन आरती करतोय

भित्तीचित्र खुणावतायत

दाखवतायत क्षीण भग्नता

चक्रपाणी मोडके हात घेऊन उभा

कधी कोसळेल सांगता येणार नाही

असा गाभा

खांबावर डोलारा सारा

विदारक सारे, पण दैदीपयमान इतिहास सांगणारे

इतिहासातली प्रसन्नता त्या भग्नावस्थेतहि कायम

ती विचित्र निरव शांतता , जळमटं , वेली

यांनीच खांद्यावर पेललेली रखवाली

वृक्षांनी घातलेला घेराव

अथपासून इथपर्यंत केलेला अभेद्य बचाव

निसर्गाचे अनोखे कर्तृत्व पाहून स्तंभित झालो

भग्नावशेष मनात साठवून

पुण्यातील या शिक्षणसंस्थेतील पीडीत विद्यार्थ्यांसाठी काही करता येणे शक्य आहे का ?

Submitted by मधुरांबे on 4 July, 2018 - 12:48

पुण्यातील एका खासगी शाळेबाबतची बातमी भयंकर आहे. बातमी ज्या प्रमाणे विविध वाहीन्यांवरून समोर येतेय त्यावरून तरी प्रथमदर्शनी तुघलकी फर्मान काढून पालकांना आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याचे दिसून येत आहे. या अटी भयानक आहेत. आणि जर पाळल्या नाहीत तर पोलीसी कारवाई करण्याची धमकी दिलेली आहे.

खालील लिंकवर आपण पाहू शकता.
https://www.facebook.com/abpmajha/videos/10160779103170271/

अफवेचे बळी

Submitted by हेला on 3 July, 2018 - 14:28

देशभरात मागच्या महिन्यात अफवेचे २५-२६ बळी गेलेत. कारण काय? तर मुलं पळवणारे संशयित म्हणून मारहाण झाली. कहर म्हणजे या मेलेल्यांपैकी एकही मुलं पळवणारा नव्हता. आसाम कि अरुणाचल मध्ये तर या अफवेबद्दल लोकांमध्ये जनजागृती कारण एक सरकारी अधिकारीच लोकांच्या मूर्खपणाला बळी पडला. परवा एकाला मारहाण करून पोलीस स्टेशन ला नेमल्यावर लक्षात आलं कि तो मुलगा त्याचाच होता. काल मालेगाव मध्ये अशीच दंगल झाली. पण या सगळ्या घटनेवर कळस केलाय परवाच्या धुळ्यातील घटनेने. अगदी मृतदेहांवरही लोक वर करत होते. रक्ताचा मांसाचा खच पडलेला होता. आणि यात त्यांना समाधान वाटत होत? कसलं होत हे समाधान ? कुणाला तरी मारल्याचं?

कोणी वीज देता का वीज?

Submitted by अनया on 22 June, 2018 - 00:09

आजच्या आधुनिक काळात अन्न, वस्त्र, निवारा ह्या मुलभूत गरजांबरोबरच 'वीज' हीदेखील मुलभूत गरज झाली आहे. ती मिळवण्याचे सगळे मार्ग महावितरणच्या दाराशी जातात. मी एजंट टाळून स्वतःच्या हिमतीवर काम करू पाहात होते. पण महावितरणच्या ढिसाळ कामाने माझी कशी ससेहोलपट केली, त्याची ही कहाणी.
****************************************************************************************************************************************

Pages

Subscribe to RSS - शासन(सरकार)