शासन(सरकार)

समृद्धी महामार्ग

Submitted by जावेद_खान on 8 July, 2023 - 01:31

सात महिन्यांत 1000 अपघात आणि 100 हून अधिक मृत्यू. नक्की कुठे काय चुकले आहे समृद्धी महामार्गावर? टायर फुटणे, रस्ता संमोहन, वाहन चालकाने केलेल्या चुका ही कारणं गृहीत धरली तरी इतक्या कमी कालावधीत इतके जास्त अपघात होणे हे जरा जास्तच होतंय. ह्या महामार्गाला बांधताना पूर्ण नियोजन करण्यात रस्ते महामंडळाला अपयश आले काय?

रेशन आपल्या दारी - शिंदे फडणवीस सरकारचा उपक्रम

Submitted by ढंपस टंपू on 18 June, 2023 - 02:24

महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या दारी योजनेप्रमाणे रेशन आपल्या दारी ही योजना सादर केली आहे.
आरा रेशनसाठी रेशनच्या दुकानात जाण्याची गरज राहणार नाही. फिरत्या रेशनगाडीतून घरो घरी रेशनचे वाटप अशी ही योजना आहे. या योजनेबद्दल काय वाटतं ?
रेशन दुकानदार, रेशन खाते यांचा भ्रष्टाचार यामुळे कमी होईल का ? रेशनचे रॉकेल गायब होण्याचे प्रमाण बंद होईल का ?

भारताच्या रेल्वे इतिहासातील सर्वात दुर्दैवी व भीषण अपघात

Submitted by ढंपस टंपू on 3 June, 2023 - 23:49

भारताच्या रेल्वे इतिहासात आजवर अनेक अपघात झाले. पण परवा बालासोर इथे झालेला दुर्दैवी अपघात हा समोरासमोर तीन रेल्वेगाड्यांची टक्कर झाल्याने भारताच्या रेल्वे इतिहासातला अत्यंत भीषण अपघात म्हणावा लागेल. या आधी ६ जानेवारी १९८१ रोजी बिहार मधे बागमती नदीत रेल्वेगाडी घसरून ७०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा आजवरचा सर्वात भीषण अपघात समजला जातो.

बालासोरच्या दुर्दैवी घटनेत आता पर्यंत २९४ मृत तर ११०० प्रवासी जखमी आहेत. जस जसे मदत कार्य पुढे जाईल तसतसा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

शब्दखुणा: 

मायाजाल (Honey Trap) की देशाच्या सुरक्षेशी बेईमानी?

Submitted by ढंपस टंपू on 26 May, 2023 - 04:42

सध्या मायाजालात अनेक जबाबदारीच्या पदावरील व्यक्ती अडकल्याचे वारंवार दिसून येते आहे. पुरूषांच्या जोडीला महिला सुद्धा या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे विषकन्याच नाही तर विषकुमारांचा सुद्धा वापर केला जातो हे उघड झाले आहे.

पण सध्या मायाजाल (हनीट्रॅप) या शब्दाच्या वापरावरून वादंग उठले आहे. मायाजाल या शब्दाचा वापर करून काही देशद्रोह्यांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी करून त्यांना बळी / पीडीत दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे असे काही जणांचे म्हणणे आहे.

त्यांच्या जागी विशिष्ट लोक असते तर मीडिया ने आग लावून त्यात तेल ओतत राहण्याचे काम केले असते असे त्यांचे म्हणणे आहे.

शब्दखुणा: 

मी वाचलेलं पुस्तक : राजधानीतून… लेखक अशोक जैन

Submitted by अनया on 18 May, 2023 - 09:21

श्री. अशोक जैन ह्यांनी १९७८ च्या ऑगस्ट ते १९८९ ह्या अकरा वर्षांच्या काळात महाराष्ट्र टाइम्स ह्या मराठी वृत्तपत्राचा दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. दिल्लीत असलेल्या विशेष प्रतिनिधीने तिथल्या राजकारणावर, सत्ता मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या चक्रावर नजर ठेवून आपल्या वाचकांपर्यंत त्या बातम्या पोचवणे, हे अपेक्षित होतंच. त्या व्यतिरिक्त दर सोमवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये दिल्लीतील घडामोडी सांगणारं ‘राजधानीतून’ हे सदर जैन लिहीत असत.

डिस्नी आणि डिसॅटि(मोनिअ)स

Submitted by अमितव on 12 April, 2023 - 16:46
डिस्ने वर्ल्ड - ऑरलँडो फ्लोरिडा Joe Raedle/Getty Images

डिस्ने वर्ल्ड - ऑरलँडो फ्लोरिडा Joe Raedle/Getty Images

गेले काही दिवस डिस्नी आणि फ्लोरिडाचा गव्हर्नर रॉन डिसँटिस अर्थात आपला लाडाचा डिसँटिमोनिअस यांच्यातील वाद प्रतिवादाच्या अनेक बातम्या उडत उडत वाचत होतो. आज शांतपणे नक्की काय वाद आहे ते डीटेलवार वाचलं आणि फारच मजेदार गोष्टी समोर आल्या म्हणून इथे शेअर करतोय.

अफजलखानाची कबर

Submitted by शाखाहारी पिशाच्च on 24 November, 2022 - 08:35

नुकतेच अफजलखानाच्या कबरीवर केलेले बांधकाम महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने हटवण्यात आले. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गेली अनेक वर्षे बांधकाम हटवा अशी मागणी हिंदुत्ववाद्यांकडून होत असे. आता तेच सत्तेत आल्यावर कबरीभोवतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे कारण देऊन ते हटवले गेले आहे.

या कारवाईला अपेक्षित विरोध झाला नाही. कारवाईनंतरही फारसे पडसाद उमटले नाहीत. त्यामुळे बांधकाम हटवण्याच्या मागणीला विरोध करणारे तत्कालीन सरकारमधले लोक आपल्या भूमिकेवर ठाम नाहीत का असे विचारले जात आहे. तसेच या प्रश्नाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्नही होत आहे.

शब्दखुणा: 

पुण्यातल्या नवले ब्रिज येथे नेहमी होणारे अपघात

Submitted by शाखाहारी पिशाच्च on 21 November, 2022 - 09:33

विषय सर्वांनाच माहिती आहे. तरी कुणाला माहिती नसेल तर थोडक्यात.

Silver Trumpet and Trumpet Banner

Submitted by पराग१२२६३ on 4 November, 2022 - 12:43

H20221028120385.jpeg
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली. प्रत्येक राष्ट्रपतीच्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडणारा हा औपचारिक, शिस्तबद्ध आणि दिमाखदार समारंभ. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 14 मे 1957 ला राष्ट्रपती अंगरक्षक दलाला पहिली राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली होती.

Pages

Subscribe to RSS - शासन(सरकार)