शासन(सरकार)

'खेळरत्न पुरस्कार' नाम बदल..योग्य की अयोग्य?

Submitted by सचिन पगारे on 12 August, 2021 - 15:10

भारता चे महान सुपुत्र दिवंगत प्रधानमंत्री राजीवजी गांधी यांच्या नावाने 'खेळरत्न' हा पुरस्कार् देण्यात येतो. सध्याच्या मोदी सरकारने राजीवजींच्या नावे देण्यात येणाऱ्या ह्या पुरस्काराचे नाव बदलून ध्यानचंद ह्या खेळाडूच्या नावाने हा पुरस्कार् देण्याचा निर्णय घेतला.

पीएम ह्यांनी लोकांची मागणी म्हणून हे नाव बदलल्याचे
सांगितले.अर्थात कोण लोक, कुठे मागणी झाली, कुठे मोर्चे निघाले याबद्दल अवाक्षरही नाही.अर्थात सत्ताधारी म्हणून त्यांनी त्यांचा अधिकार वापरला. अशीच तात्परता बेरोजगारी, लसीकरण,पेट्रोल डिझेलचे वाढते भाव, अशक्त जिडीपी। ह्याबाबत त्यांनी दाखवल्यास जनता त्यांची। ऋणी राहील.

जुने सातबारा ८ अ व फेरफार विषयी

Submitted by गोडांबा on 12 July, 2021 - 11:01

महाराष्ट्र शासन मध्यंतरी जुने सातबारा , फेरफार online उपलब्ध करून देणार असे वाचले होते . परंतु अजून . काही पुणे, अ.नगर जिल्ह्याची जुनी माहिती दिसत नाही . कोणाला यासंदर्भात काही update असेल तर सांगा ...
मला ही माहिती पणजोबा आणि इतर पूर्वज यांच्या माहितीसाठी हवी आहे . म्हणजे आजोबांना लिहितावाचता येत नव्हते त्यामुळे एक दोत पिढ्यांपर्यंतच तोकडी माहिती त्यांच्याकडे आहे . मी जरा खोलात जाऊन कुतुहल म्हणून हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय .

पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ?

Submitted by एकुलता एक डॉन on 5 July, 2021 - 07:41

पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ?

मी स्वतः आयटी मधला ,wfh आणि झोमॅटो एवढंच केले लोकडोऊन मध्ये ,कंपन्या पण बदलल्या

पण सरकारी लोक काय करत असतील ?
पगार तर चालूच असणार
सगळे घरी बसून पगार तर घेत नाहीत ना ?

पोलीस वाल्यांचे समजू शकतो त्यांना उलटे एक्सट्रा ड्युटी
शिक्षक लोक ह्यांना पण कोरोना ड्युटी पण बाकी ?

राष्ट्रपती विशेष रेल्वेगाडी

Submitted by पराग१२२६३ on 26 June, 2021 - 15:53

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 25 जून 2021 रोजी विशेष रेल्वेगाडीतून प्रवास केला. राष्ट्रपतींनी रेल्वेगाडीतून प्रवास करण्याची प्रथा अलिकडील काळात अतिशय दुर्मिळ झालेली आहे. यंदाही तब्बल 15 वर्षांनंतर भारताच्या राष्ट्रपतींकडून दौऱ्यासाठी रेल्वेगाडीची निवड केली गेली होती. आपल्या मूळगावी परौख येथे जाण्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्ली ते कानपूर असा 438 किलोमीटरचा प्रवास रेल्वेगाडीने केला. अलिकडील काळात भारताच्या राष्ट्रपतींनी केलेला तो सर्वाधिक लांबचा रेल्वे प्रवास ठरला.

कोरोना विधवेसाठी सरकारी मदत कशी मिळवायची?

Submitted by रीया on 10 June, 2021 - 20:56

आमच्या शेजारच्या काका मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये कोरोना ने गेले. त्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. कुठे तरी बातमी वाचली होती की कोरोना मुले विधवा झालेल्या स्त्रियांसाठी सरकार मदत देत आहे. एक फॉर्म ऑनलाईन मिळाला पण तो कुठे पाठवायचा आहे वगैरे काही माहिती त्यावर नाही. कोणाला काही माहिती असेल तर प्लिज शेअर करा.

भारतात कोविडच्या लसीला होणारी दिरंगाई.

Submitted by बाख on 28 April, 2021 - 08:38

जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.

कोविड-19 लसीकरण

Submitted by राहुल बावणकुळे on 6 March, 2021 - 06:42

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या दुसर्या टप्प्यात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरीकांसाठी लसीकरण सुरू झाले. त्यात 3 मार्चला माझ्या आई (66 वर्षे) व बाबांनी (71 वर्षे) लस घेतली. लसीकरणावेळी दोघांनाही काहीच त्रास जाणवला नाही, वा मग नित्यक्रमात काहीही अडथळा आला नाही. दुसर्या दिवशी आईला लस दिलेल्या जागी एक-दोन तास हलकेसे दुखत होत, नंतर आपोआपच बंद झालं. त्यामुळे औषध घ्यायची गरज भासली नाही.

माहितीसाठी
1. cowin.gov.in ह्या संकेतस्थळावर आपला मोबाईल क्रमांक वापरून नावनोंदणी करावी लागते. प्रत्येक वेळी लॉग इन करतांना नव्याने OTP येत असल्याने पासवर्डची भानगड नाही.

शब्दखुणा: 

व्यवस्थासत्ताक!

Submitted by सांज on 25 January, 2021 - 06:52

नमस्कार!
उद्या 'प्रजासत्ताक' दिवस. त्यानिमित्ताने चार वर्षांपूर्वी याच दिवशी लिहिलेला एक लेख इथे शेअर करतेय. किरकोळ बदल सोडले तर परिस्थिति आजही तीच आहे!

व्यवस्थासत्ताक!

प्रभात रोड, भांडार कर रोड गल्ल्यांचे रुंदीकरणः खरंच गरज आहे का?

Submitted by अश्विनीमामी on 14 January, 2021 - 00:14

पुण्यातील रम्य अश्या प्रभात रोड व भांडारकर रोड भागाचे वैशि ष्ट्य म्हणजे ह्या भागातील जुनी टुमदार घरे, सोसायट्या व शांत गल्ल्या. काही टू वे आहेत तर काही डेड एंड. ह्या भागात वर्दळ व वाहनांची गर्दी वाढल्याचे कारण देत पुणे महापालिकेने ह्या गल्ल्या रुंद करायचा घाट घातला आहे.

खुन एक स्वातंत्र्यापुर्वीचा आणि बारा स्वातंत्र्यानंतरचे

Submitted by नितीनचंद्र on 20 October, 2020 - 02:30

कालच बापु बिरु वाटेगावकर यांच्या जीवनप्रवासावर युट्युबवर एका दुरदर्शन वाहिनीने घेतलेला साक्षात्कार पाहिला https://www.youtube.com/watch?v=ticyo5LzOP4

बापु बिरु वाटेगावकर यांनी महिलांचे शिलरक्षण व्हावे यासाठी पहिला खुन पाडला. तो ही स्वातंत्र्यानंतरच्या काळात जेव्हा अत्याचारी राज्यकर्ते सुध्दा तुरुंगात जाऊ शकतात अशी यंत्रणा असुन ती फेल झालेली होती.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - शासन(सरकार)