महाराष्ट्र वजा मुंबई = बिहार
खरंतर आपण सगळे महाराष्ट्रीयन लोकं मुंबईच्या बडावर मोठ्या मोठ्या डिंग्या हानतो.
महाराष्ट्राची झगमगाट एकट्या त्या मुंबईच्या जिवावर चालते.
जरा विचार करा, महाराष्ट्राच्या एकुण उत्पन्नातुन आपल्याला मुंबईतुन येणारे उत्पन्न वजा करुन बघा,
मग आपला महाराष्ट्र त्या बिहार पेक्षा फार श्रिमंत नाही हे दिसुन येईल.
आपला प्लस पॉईंट एकच तो म्हणजे आपल्याकडे मुंबई आहे. अन्यथा आपली आर्थीक परिस्थीती बिहा-यांपेक्षा फार वेगळी नाही.
आणी मुंबईचे बोलायचेच झाले, तर मुंबईतील उत्पन्नात मराठी माणसाचा वाटा किती ?