राजकारण

महाराष्ट्र वजा मुंबई = बिहार

Submitted by रॉकऑन on 3 November, 2009 - 06:21

खरंतर आपण सगळे महाराष्ट्रीयन लोकं मुंबईच्या बडावर मोठ्या मोठ्या डिंग्या हानतो.
महाराष्ट्राची झगमगाट एकट्या त्या मुंबईच्या जिवावर चालते.
जरा विचार करा, महाराष्ट्राच्या एकुण उत्पन्नातुन आपल्याला मुंबईतुन येणारे उत्पन्न वजा करुन बघा,
मग आपला महाराष्ट्र त्या बिहार पेक्षा फार श्रिमंत नाही हे दिसुन येईल.
आपला प्लस पॉईंट एकच तो म्हणजे आपल्याकडे मुंबई आहे. अन्यथा आपली आर्थीक परिस्थीती बिहा-यांपेक्षा फार वेगळी नाही.
आणी मुंबईचे बोलायचेच झाले, तर मुंबईतील उत्पन्नात मराठी माणसाचा वाटा किती ?

विषय: 

राज्यात सर्व भाषा खरोखरच सारख्या आहेत काय?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

एक विचारप्रवर्तक लेख. भारताचे भाषा-धोरण, त्याविषयीच्या कायदेशीर तरतूदी इत्यादींची माहिती करून घेतल्यावर आपल्याला हे स्पष्ट होते की प्रत्येक राज्यात आपापल्या राज्यभाषेचे स्थान किती महत्त्वाचे, प्राधान्यतेचे आहे आणि म्हणूनच कुठल्याही राज्यात स्थानिक भाषेपेक्षा हिंदी किंवा इंग्रजीची कायद्याने बळजबरी का केली जाऊ शकत नाही. महाराष्ट्रात मात्र मराठीची सर्वत्र हेटाळणी व उपेक्षा होते कारण आपल्या हक्कांबद्दल आपण जागृत नाही. खालील दुव्यावरील लेख अवश्य वाचा.

प्रकार: 

मतदान तीन ते पाच दिवस चालेल का?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

दर निवडणुकीला हमखास चर्चा होते ती वेग्वेगळ्या मतदार संघातील कमी- अधिक मतदानाची! अन त्याहुन जास्त चर्चा होते ती एकुण कमी टक्केवरीची! हा टक्का वाढवायचा असेल तर मतदानाची वेळ एक दिवसा ऐवजी तीन ते पाच दिवस नाही का करु शकत?
१) एक तर मतदान अन मतमोजनीत ९ दिवसांचे अंतर ठेवुन, झटपट निकालाची अपेक्षा आयोगाने गुंडाळुन टाकलीय.

प्रकार: 

पैसा आला धावुण.......!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आज रात्रो ठिक साडे बारा वाजता भारतीय लोकशाहीचे एक भयनाट्य सुरु होईल. प्रचंड प्रमाणात पैसा, दारु अन ई.ई. चा पुर येउन त्यात लोकशाहीचे प्रेत वाहुन जाईल.
तर तम्माम नागरिकांनो, आज आत्ता ताबडतोब, दोन मिनिटे शांत बसुन, आपण आपल्या लोकशाहीला आदरांजली वाहु!

अन उद्या सकाळी तिची अंत्ययात्रा काढायला सकाळी ७ वाजता पुन्हा हजर राहु!

वेळ- सकाळी ७ ते संध्याकाळी ५.
ठिकाण- गावची पडकी शाळा.
साहित्य- निळे रंगीत पाणी.
कृती- कळ दाबणे.

प्रकार: 

लोकशाही, निवडणुका, राजकारण अन... आपण!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

भारत माझा देश आहे, हे वाक्य आपण शाळेच्या पहिल्या दिवसापासुन म्हणत असतो! पण जसे जसे शाळा संपुण कॉलेज मध्ये जातो अन नंतर रोजच्या जीवणात पाउल ठेवतो, तस तसे आपण हे वाक्य विसरत जातो. (कदाचित कॉलेज च्या ५-७ वर्षाच्या काळात आपण रोजची प्रतिज्ञा म्हणत नाही अन म्हणुन!) शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात आपण भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे असे वाचत असतो, परंतु शाळा संपुण महाविद्यालयात गेल्या नंतर अन मग नोकरी करु लागल्यावर मात्र हे सर्व शब्द आपण विसरुण जातो!

प्रकार: 

इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

लोकसत्ता (लोकमुद्रा पुरवणी दि० ०४ ऑक्टोबर २००९) मध्ये प्रकाशित झालेला हा लेख, प्रत्येक स्वाभिमानी व स्वभाषाप्रेमी माणसाने आवर्जून वाचावा असा आहे.
—————
आज इंग्रजी भाषा ही जगातील अत्यंत प्रगत भाषांपैकी एक आहे. इंग्लडसारख्या एका चिमुकल्या देशात जन्मलेल्या या भाषेची एकेकाळी त्याच देशात किती दयनीय परिस्थिती होती आणि इंग्रजांनी जिद्दीने कशा प्रकारे तिचे पुनरुत्थान केले याची ’सुरस आणि विस्मयकारी’ कथा पुढील दुव्यावर सापडेल.

http://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

प्रकार: 

संप, संप, संप...!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हमारी मांगे पुरी करो, वरना कुर्सी खाली करो.....!!! Happy

आज आमच्या विद्यापीठात संप चालु आहे. वेतनवाढ तसेच काही इतर मागण्यांसाठी संप आहे. शिक्षक लोक आलेले नाहीत. विद्यार्थी भटकतायेत कॅम्पस मध्ये! मेन गेट ला एक गट संपाबद्द्ल पोस्टर घेउन उभे होते. येणार्या जाणार्‍याला माहितीपत्रके देत होते.

samp_1.pdf (55.78 KB)
samp_2.pdf (90.99 KB)

प्रकार: 

एक मोहरा निखळला.....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री श्री रेड्डी हे हेलिकॉप्टर अपघातात ठार झाल्याची बातामी वाचल्या नंतर, क्षणभर मन सुन्न झाले!

आपल्या देशाला, चांगले राजकारणे अकाली गमावण्याचा जणु शाप च मिळाला आहे असे वाटले.

प्रकार: 

शुभारंभ !!!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ऑर्कुट कम्युनिटी: श्री विट्ठलराव लंघे पाटील

http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=93556659

महाराष्ट्राच्या स्थापणेला ५० वर्षे पुर्ण होत असताना, नेवासा तालुक्यातील जनतेला नेवासा हा स्वतंत्र मतदार संघ मिळणे, ही भारतीय लोकशाहीची नेवासा तालुक्यातील जनतेला सुंदर भेट च आहे. अन, नेवासा तालुक्यातील जनतेचे लाडके नेते, माननीय श्री विट्ठ्लराव लंघे-पाटील यांच्या रुपाने नेवासा मतदार संघाला प्रथम आमदार मिळणे हा सुवर्ण कांचण योग च म्हणावा लागेल!

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण