एक मोहरा निखळला.....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री श्री रेड्डी हे हेलिकॉप्टर अपघातात ठार झाल्याची बातामी वाचल्या नंतर, क्षणभर मन सुन्न झाले!

आपल्या देशाला, चांगले राजकारणे अकाली गमावण्याचा जणु शाप च मिळाला आहे असे वाटले.

श्यामा प्रसाद मुखर्जींच्या अन लाल बहादुर शास्त्रींच्या गुढ मृत्यु नंतर ही जी मालिका सुरु झाली त्यात... संजय गांधींचे विमान अपघातातील निधन, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींची हत्या, डॉ.श्रीकांत जिचकारांचे अपघाती निधन, राजेश पायलट ह्यांचे अपघाती निधन, माधवराव शिंदेंचे हेलिकॉप्टर अपघातात निधन, जी एम सी बालयोगी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन, साहेबसिंग वर्मांचे अपघाती निधन्..प्रमोदजी महाजन यांची हत्या..अन आज श्री रेड्डींचे अपघाती निधन......!

पक्ष कुठलाही असला तरी ह्या राजकारण्यांमध्ये एक समान सुत्र, म्हणजे, ह्या लोकांनी सार्वजनीक जीवनात, देशातील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी केलेला तंत्रज्ञानाचा वापर! राजकीय क्षेत्रातील लोक विषयाचा अभ्यास अन तंत्रज्ञान ह्या बाबतीत अगदीच अज्ञानी असतात. पण काही लोक मात्र ह्याला अपवाद आहेत. दुर्दैवाने असेच लोक ह्या जगाचा निरोप घेउन जातात अन देश अन जनता पुन्हा काही काळ नव्या नेत्याची वाट पाहत राहते......! Sad

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

प्रकार: 

आपल्या देशाला, चांगले राजकारणे अकाली गमावण्याचा जणु शाप च मिळाला आहे असे वाटले>> अगदी अगदी...

देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो....

आपल्या देशाला, चांगले राजकारणे अकाली गमावण्याचा जणु शाप च मिळाला आहे असे वाटले.
-------------

खरंय... Sad

देव रेड्डींच्या आत्म्याला शांती देवो!