नमस्कार मायबोलीकर
सकारात्मक दृष्टिकोन व त्याचे परिणाम सिद्ध करणारा आणखी एक प्रयोग मी टीव्ही वर बघितला..
तो असा....
दोन माणसांना वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो द्यायला सांगितले. त्यापैकी एकाला एकदम
दुःखी चेहरा तर दुसऱ्याला आनंदी, हसरा चेहरा करायला सांगितले..
याच पोजमध्ये त्यांना २ मिनिटे स्थिर रहायला सांगितले.
फोटो काढल्यानंतर त्यांना ५० डॉलर्स बक्षीस दिले गेले. यानंतर त्यांना एक जुगाराचा खेळ खेळण्याची अॉफर देण्यात आली. त्यात जिंकल्यास १०० डॉलर मिळतील असे सांगण्यात आले.
त्यापैकी ज्याने आनंदी पोजमध्ये फोटो दिले त्याने पटकन होकार दिला व तो जिंकला सुद्धा..
न्याशनल जिअॉग्राफीवर एक 'ब्रेन - गेम्स' नावाचा कार्यक्रम पाहिला.
यात सकारात्मक विचार आपल्या व्यक्तिमत्त्वार किती परिणाम करतात, याचे विवेचन प्रयोगासहित दाखवले गेले.
एका मैदानावर एक मुलगी बास्केटबॉल खेळत होती.
सुरूवातीला तिला १० वेळा बॉल गोलपोस्ट मध्ये टाकायला सांगितला. तिचा बॉल एकदाही रिंग मधून गेला नाही कारण ती चांगली खेळाडू नव्हती. नंतर तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला पुन्हा बॉल टाकायला सांगितले गेले, परंतु यावेळी तिचा हा खेळ बघायला ८-१० प्रेक्षक ही बोलावले गेले. त्या प्रेक्षकांना आधीच सांगून ठेवले होते की बॉल कसाही गेला तरी आनंदाने जल्लोष करायचा ः-))
तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.
माझ्या एक परिचितांना (वय : ६१ वर्षे) सोरायसिस चा फार त्रास सुरु आहे गेली अनेक वर्षे. इतके दिवस सहन होत होतं तोवर काही क्रीम्स वापरत होते. पण आत्ता त्रास फार वाढलाय आणि त्यावर पायाचे दुखणे पण फार वाढलं आहे. शिवाय मधुमेहाचा त्रास आहेच.
संपूर्ण उपचार घेतल्याशिवाय आत्ता पर्याय नाही आणि त्यासाठी पुण्यातील डॉक्टर/वैद्य यांचा संदर्भ मिळेल काय. 'फॅमिली डॉक्टर' मध्ये "श्री सिद्धिविनायक आयुर्वेद फाउंडेशन" ची जाहिरात येते कायम याच्या उपचारा संदर्भात. त्यांना संपर्क करणार आहोतच, पण कुणाला अधिक माहिती अथवा अनुभव असेल तर नक्की लिहा इथे.
विचारांचं मनाशी नातं खरं तर आपलं सर्वात जवळचं नातं. जवळचं आणि आयुष्यभर पुरणारं. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसा यातला संवाद अधिकाधिक वाढत जातो. निदान वाढायला तरी हवा. हे नातं आपण सर्वार्थानं जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे सुदृढ केलं पाहिजे. कारण याच नात्यावर आपली स्वतःची प्रगती आणि प्रकृति अवलंबून असते. याला आपण स्वतःचा स्वतःशी संवाद असं सुद्धा म्हणू शकू. आपल्या मनाला आपण स्वतःच्या विचारांचा लगाम घातला नाही तर ते वाट्टेल तिथे भरकटेल. कधी ते विंचवासारखं आपल्यालाच डसेल तर कधी आपल्या हातून चांगलं कामही करून घेईल.
बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं तर
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात मी आप्पांच्या या लेखाचा उल्लेख केला होता आणि तुम्ही मंडळींनी तो लेख इथे टाकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तो हा लेखः
माझी पत्नी प्रतिभा सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन पावली. त्या वेळेपसून मी एकट्याचे जीवन जगत आहे. सुरवातीला हा एकटेपणा खूप त्रासदायक वाटत असे. विशेषतः ‘या परिस्थितीत आता फरक पडणार नाही’ या जाणीवेने अतिशय त्रास होई. पण मी सतत विचार करीत राहिलो. आता या परिस्थितीत जर फरक पडणार नाही तर त्या परिस्थितीशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जुळवून घेणं हे श्रेयस्कर नाही का? विचार पटला तरी हे करणं सोपं नसतं आणि सोपं नव्हतंच!
नुकतंच माझ्या सासर्यांनी (आम्ही सगळे त्यांना आप्पा म्हणतो) पंचाण्णव्या वर्षात पदार्पण केलं. त्या निमित्तानी हा लेखनप्रपंच. असं म्हणतात की आपल्याच माणसाचं चारचौघांसमोर कौतुक करू नये. पण त्यांच्यामध्ये इतकी सकारात्मकता आहे की ज्येष्ठच काय, तरुणांनीदेखील कित्ता गिरवावा अशी त्यांची विचारशैली. त्याबद्दल न लिहिणं हाच गुन्हा होईल.
त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या तारखा आणि तत्सम इतर पायर्या मी गाळूनच टाकते. मात्र ते आम्हाला सुपरमॅन का वाटतात ते लिहिते.
मी लिहणार आहे तो विषय तसा खुप संवेदनशील आहे त्यामुळे इथे लिहु की नको हा विचार गेले कित्येक महिने मी करतेय. पण माझ्या प्रश्नाला अजुन उत्तर नाही मिळाले म्हणुन मी आज इथे तो प्रश्न मांडतेय तरी तुम्हाला मी हा विषय इथे लिहणे योग्य नाही असे वाटत असेल तर मी हा धागा उडवुन टाकेन. खरतर कोतोबा मध्ये लिहणार होते पण माहितीपण हवी आहे म्हणुन इथे लिहते.