आरोग्य

आध्यात्मिक शिबीर, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी

Submitted by मंजूताई on 18 September, 2015 - 05:35

कुठे फिरून आले की लगेच त्या आठवणी लिहून काढायची सवय म्हणा, हौस म्हणा किंवा विरंगुळा म्हणा, आहे खरा! हे काम करायला मजा येते आणि नंतर त्या आठवणी कधीतरी वाचताना गंमत वाटते. पण सगळेच अनुभव व्यक्त करता येतातच असं नाही अन काही वेळा सांगावेसेही वाटत नाही तो आपला सुखद ठेवा असतो... आठवणींच्या गाभार्‍यात मखमली वेष्टणात गुंडाळून ठेवलेला. फक्त आणि फक्त आपणच त्याचे खजिनदार व राखणदार.

आरोग्याचा श्रीगणेशा!

Submitted by संयोजक on 17 September, 2015 - 06:46

नमस्कार!

मायबोलीवरचा गणेशोत्सव म्हणजे धमाल, मजा आणि मस्तीच्या कार्यक्रमांची नुसती रेलचेल असते. मायबोलीकर जितक्या उत्साहाने या सर्व उपक्रमाची मजा लुटतात तितकेच ते आहार, व्यायाम, कायदे, चालू घडामोडींविषयी जागरुकही असतात. गेल्या वर्षी बाप्पांनी आपल्याला स्वतःची, आपल्या कुटुंबाची सुरक्षा जपण्यासाठी काही कानमंत्र दिले होते, लक्षात आहे ना? याही वर्षी बाप्पा या धाग्यावर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, आरोग्याबद्दल! बाप्पासारखेच सुपाएवढे कान करुन ऐकूया! चला, तर मग करुया , निरामय आरोग्याचा श्रीगणेशा! गणपती बाप्पा मोरया!

एरंडेल तेल

Submitted by झगड्या on 10 September, 2015 - 06:57

मला नेहमी तोंड येते. तसे जन्मतःच तोंड आहे, जे मी खाण्या व बोलण्यासाठी वापरतो. हे तोंड येणे म्हणजे इंग्रजीतले mouth ulcers. आमच्या फ्यामिली डॉक्टरला विचारल्यावर ते बोलले की काही विशेष नाही, मलाही येतेच अधून मधून. बी कॉम्प्लेक्स च्या कमतरतेमुळे होते असे कधी कधी. वारंवार असे तोंड येऊन तुम्हाला कॉम्प्लेक्स येत असेल तर सरळ बीकॉसूल च्या गोळ्या रात्री जेवण झाल्यावर घ्या. तसे मी घेऊ लागलो. नंतर ते म्हणाले की पोट साफ नसल्यास सुद्धा असे होऊ शकते. तेव्हा अधून मधून एरंडेल पण घ्या.

तर नमनाला चमचाभर एरंडेल झाल्यावर आता मुद्द्याकडे वळतो.

विषय: 

व्यसने - परिणाम आणि दुष्परिणाम

Submitted by उडन खटोला on 8 September, 2015 - 10:58

अनादि काळापासून मानवी समाजात काही वस्तून्च्या सेवनाला "व्यसन" म्हणून त्याज्य ठरवले जाते ... त्या गोष्टीन्चा मोरल ग्राउन्ड्स वर निषेध केला जातो ... यात दारु ,तंबाखू, गांजा-भांग-चरस -एल एस डी इत्यादी गोष्टी येतात

उघड आहे की या गोष्टीना नैतिक /सामाजिक व कायदेशीर दॄष्ट्या त्याज्ज्य अथवा प्रतिबंधित करण्यामागे काही ठोस कारणे आहेत . सामाजिक अथवा नैतिक दॄष्ट्या धोकादायक ठरेल असे वर्तन ही द्रव्ये सेवन करणारुया व्यक्तींकडून घडते ,तसेच आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो . हे १००% मान्य आहे ... परंतु......

विषय: 

ईसबगोल - psyllium husk

Submitted by हर्ट on 8 September, 2015 - 02:20

मी रोज तीन चमचे psyllium husk पाण्यात ढवळून घेतो आणि मग भरपुर पाणी पितो. psyllium husk मधून हवे तेवढे फायबर शरिराला मिळतात. psyllium husk चे काही तोटे आहेत का? मला फक्त एकच माहिती वारंवार मिळाली ती ही की psyllium husk सोबत भरपुर पाणी घ्यावे लागते. नाहीतर पोटामधे त्याच्या गाठी होतात. पण पाणी पुरेसे प्याले की गाठी होत नाही.

विषय: 

मरणावर बोलू काही ...

Submitted by दिनेश. on 7 September, 2015 - 07:39

शीर्षक वाचून दचकलात ना ? सणांच्या दिवसात कसले अभद्र बोलतोस ? असेही म्हणाल. कुटुंबात कुणी नुसते विल करायचेय असे म्हणाले तरी घरातील लोक असेच बोलतात. प्रकाश घाटपांडे यांचा धागा आणि त्यावर साती आणि दीमांनी जे सुंदर प्रतिसाद दिलेत ते वाचून, माझ्या मनात बरेच दिवस येत असलेले विचार लिहून काढतोय.

माझ्या जन्मदिवशीच एक विचित्र घटना घडली. त्या पुर्वी आई सांगते ती आठवणही सांगायला हवी. आम्ही
मालाडला दत्त मंदीर रोड वर रहात होतो. त्या देवळातली दत्ताची मूर्ती फार सुंदर आहे. दर गुरुवारी आम्ही तिथे
जात असू. मी पोटात असताना अशीच आई तिथे गेली होती आणि देवाच्या समोर असतानाच अचानक आईच्या

वैद्यकीय इच्छापत्र

Submitted by प्रकाश घाटपांडे on 29 August, 2015 - 03:56

२२ ऑगस्ट २०१५ रोजी कोथरुड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माझ्या सुखांताचा माझा विचार या विषयावर परिसंवाद झाला होता.खाली नमूद केली वैद्यकीय इच्छापत्र हे नमुन्या दाखल आहे. यात प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बदल करु शकते. ऎड असीम सरोदे यांनी स्थापन केलेल्या सहयोग ट्रस्ट तर्फे इच्छामरण या विषयावर समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. डॉ शिरीष व डॉ आरती प्रयाग ( वैद्यकीय क्षेत्र) असीम व रमा सरोदे ( कायदा क्षेत्र) मंगला आठलेकर, डॉ रोहिणी पटवर्धन ( वृद्धकल्याणशास्त्र) शुभदा जोशी, विद्या बाळ व रविंद्र गोरे असा एक गट या विषयावर काम करतो आहे.

तडका - कांदा खाण्यासाठी

Submitted by vishal maske on 25 August, 2015 - 07:47

कांदा खाण्यासाठी

हल्ली चर्चा-चर्चांना लागलेला
कांदा भाववाढीचा वास आहे
रोज कांदे खाणारांचाही आता
बिना कांद्याचाच घास आहे

वाढत्या भावामुळे कदाचित कांदे
दैनंदिन जेवनातुन हरवले जातील
अन् कांदा खाण्यासाठी मात्र
आठवडी दिवस ठरवले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - यश मिळवताना

Submitted by vishal maske on 22 August, 2015 - 11:11

यश मिळवताना

यश मिळवायचं असेल तर
प्रयत्न हे करावे लागतात
ध्येयपुर्तीचे ध्येय वेडे
मनामध्ये भरावे लागतात

ध्येयही त्यांचेच पुर्ण होतात
ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते
मात्र इच्छा हिन माणसांकडून
उदासिनतेचीच खळबळ असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - आरोग्य