आपण काही खाल्लं तरी शरीराला 'ए.टि.पी.' म्हणजेच 'अडिनोसिन ट्राय फॉस्पेट' हे ऊर्जेच्या स्वरूपात लागते. 'एटीपी' याला आपल्या शरीराची "एनर्जी करंसी" असे संबोधले गेले आहे. ह्याला मी 'खरी कमाई' म्हणतो अथवा "व्हाईट मनी". वाचत रहा तुमच्या लक्षात येईल कि घामाचा पैसा म्हणजे काय. तुम्ही काही खा, शरीराचा प्रयत्न असतो कि त्याला 'ग्लुकोज'च्या पातळीवर आणून रक्तात मिसळुन देणे, व त्यापासून 'एटिपी' तयार करणे. गहू, ज्वारी, भाकरी, तांदुळ, भात काही खाल्लं जिच्यामध्ये 'स्टार्च' आहे त्याचा 'ग्लुकोज' होणारच. सोबत प्रथिने (प्रोटिन्स) महत्वाचे म्हणून कडधान्य, पालेभाज्या सोबत खाव्या लागतात .
मधुमेह अर्थात डायबेटीस- आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाचा आजार. त्याने गेल्या अर्धशतकात समाजात जे काही थैमान घातले आहे त्याला तोड नाही. जगभरातील असंख्य लोक मधुमेहाने त्रस्त आहेत आणि त्यावरील विविध उपचार घेत आपले आयुष्य कंठत आहेत.
हे डाएट तीन भागात केले जाते असे म्हणता येईल.
डाएटच्या पहिल्या भागात पूर्वी सांगितलेल्या आहारातून कर्बोदके कमी करून स्निग्ध पदार्थ वाढवायचे आहेत; पण ते चवदार लागते म्हणून दिवसभराच्या एकूण कॅलरीजचे भान ठेवायचे. सुरुवातीच्या काळात भूक लागली की हाताशी सुकामेवा ठेवायचा. सुरुवातीच्या काळात प्रमाणात पाणी पिण्यावर लक्ष द्यायचे. प्रमाणात अशासाठी की अगदी मिनिटा मिनिटाला, तहान लागलेली नसताना दिवसाचे टार्गेट पूर्ण करायचे म्हणून, गरज नसताना ४-५ लिटर पाणी पिणे योग्य नाही.
मला भात बंद करणे सहज जमले, परंतु चपाती एक तरी खायला हवी असे वाटायचे. पहिला दिवस एका चपातीवर निभावला. करून करायचे तर व्यवस्थितच करायला हवे (करून करायचे तर कच्चे का? अन माळ्यावर बसून अडचण क?) म्हणून मग चपाती ऐवजी भाकरी खावी असे ठरवले. एका जेवणात अर्धी ते पाऊण भाकरी.
गव्हातले आणि ज्वारी, बाजरीतले कर्बोदकांचे प्रमाण पाहिल्यास जवळपास ते सारखेच आहे हे तपासल्यावर चौथ्या दिवसापासून मी भाकरीपण पूर्णपणे बंद केली.
सुरुवातीचे तीन महिने पूर्णपणे वर्ज्य केलेल्या गोष्टी :
चपाती
भात
मैदा
गोड पदार्थ (कोशिंबीरसुद्धा
बिन साखरेची)
भाकरी
कडधान्ये
डाळी
बीन्स
मटार
मका (दाणे, पीठ)
ऑगस्ट २०१५ च्या एका दुपारी जरा एका ऑफीसमध्ये काम होते म्हणून जेवण उरकून लेकाला घरीच ठेवून सायकलने निघाले होते. वाटेवर एका झाडाच्या ४-५ चेरी तोंडात टाकून जरा पुढे गेले आणि काही कळायच्या आतच चक्कर येऊन पडले. नशिबाने सायकल रस्त्याच्या कडेला गवतावर घेतली होती. विजेच्या पोलाच्या एक फूट पुढे जाऊन आणि मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वीच पडले होते.
सर्वात आधी एका गोष्टीचे बरे वाटले की, पिल्लू माझ्या सायकलवर मागे नव्हता. पण दुसरी काळजी अशी वाटली की, मला काही झालं असतं तर? नवरा भारतात गेलेला आणि लेकरू घरी एकटंच.
मधुमेह आणि आयुर्वेदिक उपचार आणि त्यांचे (सु)(दु:) परिणाम यावर इथे चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे.
तुम्हापैकी कोणाला मधुमेहावर आयुर्वेदिक औषधांचा अनुभव आहे का?
मी डायबेटीक रेटिनोपथी आहे. डोक्टरां नी लेझर चा उपचार सांगितला. त्याप्रमाणे २ सेटिंग ही झाले . मायबोली वर यावर अनेक उहापोह वाचला. माझी शंका हीच आहे की ... लेझर चा उपचार केल्यानंतर काय दुष्परिणाम होतात ? उपचार केल्यानंतर डोळा पुर्ववत होण्यासाठी किती कालावधी लागतो.? ही बाब माहीत आहे. की जी दॄष्टी आहे तीच राहते.. २ सेटींग झाल्या नंतर जवळची दॄष्टी योग्य वाट्ते. पण दुरची दॄष्टी धुसर झाल्यासारखी वाटते. २ दिवस झाले आहेत. मार्गदर्शन करावे. स्वःत चे अनुभव शेअर करावेत.
मधुमेही व्यक्तींनी काय काळजी घ्यावी – एक स्वानुभवाचा सल्ला
मधुमेह काय किंवा रक्तदाब काय , या दोन्हीही आनुवंशिक व्याधी आहेत. एखाद्या घरात जर आई-वडील किंवा आजी-आजोबा ह्याचे पैकी कुणालाही , ही व्याधी असेल तर ती पुढच्या पिढीतील मुला-मुलींपैकी किंवा त्यापुढील पिढीतील नातवंडांपैकी कुणालाही होऊ शकते असे वैद्यक शास्त्र सांगते. तसेच ह्या दोन्ही व्याधींना छुपे रुस्तूम असे म्हणतात.कारण दोन्हीमध्ये तपासणी केल्याखेरीज काही समजत नाही.