चला कवटाळू ह्या संह्य कपारी
भल्या सकाळी वा भर दुपारी
चढा मर्दानो देतात किल्ले आव्हान
उगाच का मग थबकता ओ-पैलवान
साथीला तुम्हा ही गोड गुलाबी थंडी
चढवा मोजे न् मस्त उबदार बंडी
लागुद्यात माथ्यावर ती उरी धाप
घडूद्यात छोटाका हा जरी प्रताप
ढकला तो आडोसा कामाचा बिलंदर
सकला खुणावतो हा धुरंदर पुरंदर
दही पोहे न् खायला गर्म भजी
जपा आठवण ही मर्म निजी
'पुण्य'वानच फक्त असती गिरी छन्दी
इतर सामान्य न पडती ह्या फंदी
नका सोडू ही दैवी संधी
नंतर वयच घालेल तुम्हावर बंदी
'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.
तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.
कधीतरी चवथ्या-पाचव्या वर्गात असतांना अजिंठा ला आमच्या वर्गाची सहल गेली होती... त्या लहान वयात फार काही कळत नाही... वरुन शिक्षकांचा धाक... हे करु नका... ते करु नका... तरी लेण्या उंच डोंगराच्या कडेला कोरलेल्या आहेत... समोर खोल दरी आहे... लेण्याच्या भिंतीवर खुप जुने चित्र आहेत... शेवटी भगवान बुध्दाची झोपलेली मुर्ती एका लेणीत आहे... एवढेच मला आठवायाचे... ती एकच मुर्ति माझ्या डोक्यात कशी राहली याचा आजवर मला उलगडा झाला नाही.
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
ट्रेक ला जायचं कुठे ह्यावरून बरीच चर्चा केल्यानंतर 'राजगड' करायचा असे किसन देवांनी जाहीर केले. बरेच मेंबर गळत गळत शेवटी मी , किसन, सुड, अल्प्या आणि सिड.. एवढे उरलो.इंद्रायणी वेळेवर शिवाजीनगर पोचली.तडक रिक्षा पकडुन आमची वरात सुडच्या घरी पोहोचली.
मग सुड च्या हातचे फक्कड फवे खाल्ले, वर झकास चाय ढोसला. परत स्वारगेट ला आलो.
पुनर्जन्माच्या विषयाला वाहिलेली अमेरिकन संस्था
पुनर्जन्म हा तसा अनेक मायबोलीकरांच्या आणि तथाकथीत बुध्दीपामाण्यावाद्यांच्या दृष्टिने चेष्टेचा, टिंगल टवाळीचा आणि टीका करण्याचा विषय आहे. भारतात हिंदु धर्म असा आहे की जो कर्मसिध्दांत आणि त्याला जोडुन असलेले प्रारब्ध्द आणि त्याला जोडुन येणारा पुनर्जन्म ह्या विषयाला मान्यता देणारा आहे. याच कारण हा धर्म किंवा जड वाटत असेल तर संस्कृती म्हणा एका पुस्तकाच्या आधाराने चालणारा नाही. अनेक ग्रंथ गुढ अश्या विषयावर भाष्य करताना दिसतात तसेच आजच्या जीवनाशी त्याची सांगड घालताना दिसतात.
आपण एक स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत असतो . असेच एक सुराज्याचे स्वप्न आई जीजाऊने पहिले 'श्रीमंतयोगी "शिवरायांच्या रूपाने साकार केले ... या स्वप्न पूर्तीसाठी त्यांना साथ लाभली ती या निष्ठावंत आणि उभ्या सह्याद्रीची …
पण आज त्यांचे सुवर्ण स्वप्नाची अनास्था आपण उघड्या डोळ्याने पाहत आलो , ज्यांच्या अंगाखांदयावर आपल्या पूर्वजांनी पराक्रमाचे रक्त वाहिले त्यांची अवस्था काय आहे आज ? त्यांच्या चिरा चीर्यातून मदतीची आर्त आपणास का ऐकू येत नाही ??
प्राध्यापकाला चावले आहे झुरळ
की बहकला आहे पुरा लागून चळ ?
बोलायचा अवकाश की 'बंडल गझल'
प्रतिसादकाची काढतो अक्कल सरळ !
मद हुंगतो अपुलाच आणिक झिंगतो
भेंडाळला आहे पहा लिहितो उथळ
मंचावरी हा काफियांचा पूर का ?
ह्याच्या घरी मोरीतला फुटलाय नळ !
अवतार त्याचा हासुधा संपेल की
माबो ..तुला सोसेल तितकी काढ कळ
के. गो.
(शेवटचा शेर वैभव कुलकर्णी ह्यांचा.)