शिक्षण

एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन

Submitted by निलेश भाऊ on 13 February, 2014 - 04:54

इंग्रजीवरील प्रभुत्व

Submitted by विजय देशमुख on 11 February, 2014 - 22:26

आजकाल इंग्रजी भाषा आवश्यक झाली आहे. आपल्याला आवडो वा नावडो, कधीतरी कुठेतरी असं वाटुनच जातं की आता इंग्रजीवरही प्रभुत्व हवच. आपापल्या क्षेत्रांत आवश्यक असणारे संभाषण, प्रेझेंटेशन्स वगैरे फारशी जड जात नाही. ती सवयीने जमायला लागतात, पण आपल्या क्षेत्राच्या बाहेर विचार करणे, बोलणे, वाचणे, लिहिणे फारसं जमत नाही. असं नाही की इंग्रजी बोलताच येत नाही, पण वेळेवर नेमके शब्द आठवत नाही किंवा काय बोलावं, ते सुचत नाही. कित्येकदा इतर लोकं धडाधड सिडने शेल्डॉन {माझ्या काळातली} वगैरे कादंबरी लेखकांची नावे घेतात, तेंव्हा वाटते की अरे, आपण काहीच वाचत नाही की काय?

माझी काही स्वप्ने -१

Submitted by विजय देशमुख on 30 December, 2013 - 22:05

प्रत्येकाला स्वप्ने पडतात. त्यात त्याला फारसं काहीच करावं लागत नाही. त्याबद्दल आधी एका धाग्यात http://www.maayboli.com/node/44262 लिहिलं होतं.

पण जी स्वप्ने जागेपणी बघितल्या जातात, मग ती पूर्ण करणे स्वतःच्या हातात असो किंवा दुसर्‍याच्या, त्या स्वप्नांना एक विशेष अर्थही असतो, असं मला वाटतं. त्यातलीच काही स्वप्ने. कधी ती अचानक कोणीतरी पुर्ण करतो, तर काही अजुनही अधुरीच.

बालस्नेहसंमेलन ( संमेलनाचे धमाल किस्से )

Submitted by मितान on 20 December, 2013 - 04:10

दिवाळी झाली की शाळांना स्नेहसंमेलनाचे वेध लागतात. त्यात चिमुकल्यांच्या आनंदाला तर उधाण येतं. शिशुवर्ग आणि बालवर्गाची तर ही पहिलीवाहिली संमेलनं. पहिल्यांदाच नेहमीपेक्षा वेगळा पोषाख, नाटकात काम, गाण्यावर नाच, फॅन्सी ड्रेस, पाठांतर, गोष्ट सांगणं, लिंबू चमचा नि बेडूक उड्या ! शाळा कोणतीही असो, कोणत्याही गावातली, कोणत्याही माध्यमाची नि बोर्डाची, गरिबीतली किंवा श्रीमंतीतली ; छोट्या वर्गांच्या स्नेहसंमेलनाची धमाल सगळेकडे सारखीच ! अशाच काही संमेलनातील निरीक्षणे.

अजुनही?

Submitted by विजय देशमुख on 9 November, 2013 - 08:20

"हाय विजय"
"हॅलो निमिष, कसा आहेस?"
"ठिक. बरेच दिवस झाले तुला भेटायचं होत"
"मलासुद्धा. खरं तर आपल्या बायका भेटतात, बोलतात, त्यावरुन तुझ्याबद्दल माहीति होती, पण भेटीचा योग आज आला."
"खरय"
"काय रे थकला आहेस की काय?"
"नाही, का रे?"
"नाही चेहर्‍यावर फ्रेशनेस वाटत नाही, बरं आहे ना?"
"मी ठिक आहे रे..."
"कमॉन यार, xxxxxx सारख्या जगप्रसिद्ध कंपनीत आहेस, आमच्यासारखं नाही तुझं. कित्येक भारतीय रोजच भेटत असतील तुला, की कोरियन लोकांचा कंटाळा आला?"
"कोरिअन नाही, भारतीयांचाच कंटाळा आला?"
"म्हणजे, पॉलिटिक्स...?"
"नाही ते ही चाललं असतं, पण माझ्याच ऑफिसमध्ये मी वेगळा पडलोय..."
"का रे?"

"डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक" परिक्षेचा अभ्यास कसा करवून घ्यावा ?

Submitted by विनार्च on 9 November, 2013 - 04:44

माझी लेक चौथीला असताना, स्कॉलशीपच्या अभ्यासासाठी जो धागा मी काढला होता त्यावरचे प्रतिसाद मला अभ्यास करवून घेताना फारच उपयोगी पडले होते म्हणून हा धागा काढते आहे.
सहावीत दिल्या जाणार्‍या "डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक" परिक्षेचा अभ्यास कसा करवून घ्यावा ?
मी बाजारात मिळाली ती दोन पुस्तकं आणली आहेत पण त्यात फक्त प्रश्नपत्रीकाच आहेत. पहिली ते सहावीची विज्ञानाची पुस्तके वाचावीत असा सल्ला त्यात दिला आहे. तितकच पुरेसं आहे का?
पहिली परिक्षा पार केल्या नंतर पुढील पायर्‍यांसाठी काय तयारी करावी लागेल ?

विषय: 

शाळा-शाळा

Submitted by Arnika on 2 October, 2013 - 06:33

शाळा! बहुतेकांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. काहींना आवडली म्हणून, काहींना नावडली म्हणून. काहींनी नेमाने हजेरी लावली म्हणून, काहींनी नेटाने बुडवली म्हणून. काही हुशार होते म्हणून, काही शिक्षकांचे लाडके म्हणून, काही खोडकर होते म्हणून. काहींना आपण शाळेत घडलो असं वाटतं म्हणून, आणि काहींना बिघडलो असं वाटत असेल म्हणून. कुठल्याही कारणासाठी असेल, पण विषय मात्र जिव्हाळ्याचा!

विषय: 

परदेशातुन भारतात परत गेल्यावर मुलांचे शिक्षण

Submitted by डॅफोडिल्स on 18 September, 2013 - 22:54

भरतातल्या शाळा वर्षाच्या मध्ये म्हणजे ़जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये मुलांना अ‍ॅडमिशन देतात का? अमेरिकेतून काही लोक शैक्षणिक वर्षाच्या मधल्या कालावधीत भारतात परत जात आहेत, त्यांची मुले पहिली ते आठवी या इयत्तां मधली आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर ला भारतात परत जायचे असेल तर भारतातिल एक टर्म तेव्हा पूर्ण झालेली असते अश्यावेळी भारतातल्या शाळांमध्ये प्रवेश मिळू शकतो का ? की विद्यार्थ्या चे वर्ष वाया जाउ शकते ? कुणाला काही माहीती किंवा अनुभव असल्यास जरूर कळवा.

संकल्प शिक्षकदिनाचा....

Submitted by श्रीकांत काशीकर on 5 September, 2013 - 09:35

मातृदेवो भव, पितृदेवो भव पाठोपाठ समाजात आचार्य अर्थात शिक्षक श्रेष्ठ. 'आचार्य देवो भव' असं विशेष स्थान शिक्षकांना आहे. गुराख्याचा पोर असणार्‍या चंद्रगुप्ताला आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या आधारे चाणक्याने चक्रवर्ती सम्राट बनवलं. अलिकडच्या काळात एक शिक्षक या राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर पोचला होता. पाच सप्टेंबर हा दिवस या शिक्षकाचाच जन्मदिन. हा शिक्षक म्हणजेच आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.

दोषी कोण?

Submitted by विजय देशमुख on 27 August, 2013 - 06:56

अजुन एक बातमी, अन सगळ्यांची चीडचीड. तारस्वरात ओरडणारे चॅनेल्सवाले आणि मग सरकारची कासवाच्या, किंबहुना अधिकच संथपणे काही प्रतिक्रिया. मागील काही दिवसात ह्या घटना पुन्हा-पुन्हा होत आहेत. या घटनांनी "बलात्कार्‍याला फाशीच" दिली पाहिजे असे म्हणणारेसुद्धा वाढत आहेत. पण खरच फक्त ज्यांनी प्रत्यक्ष गुन्हा केला तेच दोषी आहेत का? त्यांना त्वरीत पकडणे, खट्ला चालवणे, शिक्षा करणे, इतकं पुरसं आहे का?

Pages

Subscribe to RSS - शिक्षण