महाराष्ट्र

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला?

Submitted by shantanu paranjpe on 18 April, 2018 - 06:20

रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला! त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.

विषय: 

महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुका

Submitted by धनि on 28 November, 2016 - 10:47

आजच (२८ नोव्हेंबर २०१६) महाराष्ट्रातील बहुतांश नगरपालिकांच्या निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. मायबोलीवर सर्व भागातील जनता वावरत असते. महानगरांमधील लोक प्राधान्याने असले तरी इतर गावांमधीलही लोक असतातच. आणि बरेच लोक जे महानगरांमध्ये राहतात त्यांना त्यांच्या मूळ गावात काय चालू आहे याची हालहवाल माहिती असतेच.

उत्तम सामाजिक उपक्रम, कार्यक्रम व प्रकल्पांच्या माहितीचे संकलन

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 17 September, 2015 - 01:56

आपल्याला वेगवेगळ्या माहिती स्रोतांद्वारे अनेक खात्रीशीर, सेवाभावी व लोकहितकारी अशा सामाजिक प्रकल्प व उपक्रमांची माहिती नित्यनियमाने मिळत असते. सोशल मीडियातून तर अशी माहिती रोजच प्रसृत होत असते. खात्रीलायक, नोंदणीकृत संस्थांद्वारे जसे मोठे उपक्रम व सेवाकार्य प्रकल्प हाती घेतले जातात तसेच अगदी छोट्या पातळीवरही एकट्या दुकट्या लोकांनी मोठ्या तळमळीने चालू ठेवलेल्या कल्याणकार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते खरी, परंतु ही माहिती इतर लाटांमध्ये विरूनही जाते. तर या धाग्याचा उद्देश हा की, अशा प्रकारचे चांगले काम व उपक्रम संकलित स्वरूपात आपल्या माहितीसाठी एकत्र पाहाता यावेत.

स्त्रीविरोधातील हिंसा नष्ट करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस : २५ नोव्हेंबर! (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 November, 2014 - 01:16

स्त्रियांबाबत केली जाणारी हिंसा ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु दिवसेंदिवस या हिंसेचे वाढत चाललेले उग्र रूप ही एक अत्यंत चिंतेची व शरम आणणारी वस्तुस्थिती बनत चालली आहे. आजूबाजूच्या या परिस्थितीकडे काणाडोळा करून उपयोग नाही, कारण त्याची झळ कधी तुम्हांला लागेल ते सांगता येत नाही. अनेकदा स्त्रियांचे बाबतीत घडणारा हिंसाचार हा त्यांच्या जोडीदाराकडून होतो. इ.स. २०१२मध्ये हत्या झालेल्या स्त्रियांमधील जवळपास अर्ध्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबसदस्याकडून मारल्या गेल्या.

रेल्वेमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: आपल्या सूचना व सल्ले. "विनंती स्वीकरली आहे"

Submitted by ऋग्वेद on 20 November, 2014 - 07:49

भारताच्या इतिहासात दुसर्यांदा महाराष्ट्राकडे देशाचे एक महत्वाचे असे "रेल्वे मंत्रीपद" मिळाले आहे. ( राम नाईक यांच्याकडे एनडीएच्या काळात आलेले होत परंतु ऑगस्ट ते ऑक्टोंबर १९९९ असे अवघे ३ महिनेच होते ) माननिय श्री. सुरेश प्रभुंसारख्या हुशार आणि कल्पक नेतृत्वाकडे हे पद गेल्याने नक्कीच अपेक्षा वाढली आहे. भारतीय अर्थकारणात रेल्वेचा सहभाग महत्त्वाचा आहे. रेल्वे ही भारताच्या नसनसातुन वाहत आहे. एक प्रमुख दळणवळणाचे साधन म्हणुन तसे स्वस्त आणि जलद मालवाहतुक साधन म्हणुन देखील रेल्वेचे भारतात मुख्य योगदान आहे.

विषय: 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकः २०१४

Submitted by pkarandikar50 on 14 October, 2014 - 13:40

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४: वेगळी का व कशी?

’प्रत्येक निवडणूक वेगळी असते, असे लोकसत्ताकार श्री. गिरीश कुबेर म्हणतात, ते खरेच आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीचे वेगळेपण समजावून घेताना गेल्या काही निवडणूकांचा संक्षिप्त आढावा घेणे आवश्यक वाटते.

विषय: 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकः २०१४

Submitted by pkarandikar50 on 14 October, 2014 - 13:40

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४: वेगळी का व कशी?

’प्रत्येक निवडणूक वेगळी असते, असे लोकसत्ताकार श्री. गिरीश कुबेर म्हणतात, ते खरेच आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीचे वेगळेपण समजावून घेताना गेल्या काही निवडणूकांचा संक्षिप्त आढावा घेणे आवश्यक वाटते.

विषय: 

उल्का, अशनी, डायनोसॉर्स आणि 'प्रिय अमुचा …'*

Submitted by kaushiknagarkar on 4 March, 2013 - 16:27

रात्री झोपताना छताकडे डोळे लावून झोपण्याची माझी सवय. आजही तसाच पडलो. नेहेमीप्रमाणे अंधारात छत कोठे अाहे हे पाहण्याच्या प्रयत्नात पापण्या जड होउन झोप लागेल ही अपेक्षा. पण अाज काही वेगळाच अनुभव येतोय. मी जे पाहातोय ते छत नाही, अथांग अंतराळ आहे. त्या काळ्या अवकाशात छोटे छोटे ठिपके; सोनेरी, लालसर, पांढुरके, निळसर. त्यातच एक फिकट ठिपका अगदी दिसेल न दिसेल असा. पण अाज तो मला अगदी स्पष्ट दिसतोय. इतर ताऱ्यांप्रमाणे हा ही एका जागी स्थिर नाही. प्रचंड वेगाने तो ठिपका अगदी थेट माझ्याकडेच धाव घेत अाहे हे मला ठाऊक अाहे.

आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

विषय: 

महाराष्ट्र दिन

Submitted by श्रीकांत काशीकर on 30 April, 2012 - 09:11

महाराष्ट्राच्या शूरवीरांची साक्ष देती हे सह्यकडे ।
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। धृ.।।

तलवारीच्या तालावरती शूर नाचले थयाथया
थयाथयाट तो पाहुनी करतो शत्रू त्यापुढे गयावया ।
आठवुनी त्या पराक्रमाला पाऊल टाकू सदा पुढे
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। १ ।।

गोब्राह्मण प्रतिपालक राजा इथेच झाला तो शिवबा
महाराष्ट्राच्या जरिपटक्याला अटकपार ने राघोबा ।
राक्षसभुवनी माधवरावे निजामास चारिले खडे
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। २।।

त्या रक्ताचे वारस आम्ही भाग्य असे हो हे अमुचे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - महाराष्ट्र