श्री. अशोक जैन ह्यांनी १९७८ च्या ऑगस्ट ते १९८९ ह्या अकरा वर्षांच्या काळात महाराष्ट्र टाइम्स ह्या मराठी वृत्तपत्राचा दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. दिल्लीत असलेल्या विशेष प्रतिनिधीने तिथल्या राजकारणावर, सत्ता मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या चक्रावर नजर ठेवून आपल्या वाचकांपर्यंत त्या बातम्या पोचवणे, हे अपेक्षित होतंच. त्या व्यतिरिक्त दर सोमवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये दिल्लीतील घडामोडी सांगणारं ‘राजधानीतून’ हे सदर जैन लिहीत असत.
महाराष्ट्राच्या कुरूक्षेत्रावर
पुन्हा राजकारण घडत आहे.
आणखी एक धुर्तराष्ट्र आपल्याच पुतण्याला डावलण्यासाठी धडपडत आहे.
( ही वाक्ये चारोळीचे अनभिषीक्त सम्राट श्री रामदास फुटाणे महोदयांना समर्पित )
ही चारोळी माननीय रामदास फुटाणे यांना का समर्पित केली याचे कारण.
कै देविलाल आपल्या मुलाला मुख्यमंत्री ( ओमप्रकाश चौटाला याला ) बनविण्यासाठी धडपडत होते. या दरम्यान झालेल्या निवडणूक मधे हत्या झाल्या या पार्श्वभूमीवर श्री रामदास फुटाणे यांची चारोळी होतो.
महाभारताच्या कुरूक्षेत्रावर आणखी
एक महाभारत घडत आहे.
(सर्वात आधी एक नवीन आभासी खातं मायबोलीवर तयार केलं. उगीचच सध्या सत्तेत असलेल्या विरुद्ध दोन शब्द इकडे तिकडे व्हायचे आणि एक दोन महिने तुरुंगाची हवा खायला लागायची. रिस्क नको.)
मागील काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. प्रसार माध्यमातून दिवसभर मनोरंजनही चालू आहे. अगदी उत्कंठा शिगेला पोहोचते आणि त्या दिवशीचा एपिसोड संपतो. परत दुसऱ्या दिवशी तेच चक्र.
हा तिढा सुटणार तरी कसा? हा "बाहुबलीने कटप्पा को क्यो मारा" या प्रश्नासारखाच गहन प्रश्न तमाम मराठी बंधू भगिनींना पडला नसेल तरच नवल.
मायबोली वर राजकीय आणि सामाजिक विषयांवर उत्साहाने चर्चा होतात. त्या कधीकधी खूप माहितीपूर्ण असतात, आणि कधीकधी गोलाकार असतात, त्यांना ना सुरुवात असते ना अंत.
मला अशा चर्चांमध्यें सहभागी असलेल्या सदस्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, कधी मायबोली वरील चर्चेमुळे एखाद्या विषयावर मतपरिवर्तन झाले आहे का ?
जर मत बदलले असल्यास कोणत्या विषयावर बदलले आणि कशामुळे बदलले ?-
व्हॉटसअॅप,फेसबुक,ट्विटर,मिपा आणि अशी अनेक आंतरजालीय समाजमाध्यमे जिथे चर्चा करता येते; ती बहुतांशी वेळा देशाच्या,राज्याच्या राजकारणावरील चर्चेने अोसंडून वाहत असतात.अगदी काही वेळा वैताग येईल इतका इतका वेळ अशा चर्चांवर दिला जातो.आपला आवडता पक्ष,आवडता नेता हाच आख्ख्या भारतात किंवा राज्यात कसा चांगला आहे.तोच कसा जनतेला सर्वाधिक चांगला न्याय देऊ शकतो यावर अटीतटीने मुद्दे मांडणं सुरु असतं.समोरचा आपला मुद्दा मान्य करत नाही हे बघून काहीजणांचा तोल ढळतो; मग नको त्या शब्दांत किंवा वैयक्तिक जीवनातील गोष्टींचा उद्धार करुन नामोहरम करण्याचाही प्रयत्न होतो.आवडता पक्ष,नेता हरला की राग,संताप होतो.यावरुन कोणी
मतदार हुशार झालेत ?
दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर.
आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे.
राजकारण हे राजकारण असतं
पत्ते त्यांचे आणि खेळ ही त्यांचाच
आपण फक्त पत्ते पिसायच असतं
राजकारण हे राजकारण असतं
खुर्ची त्यांची अन् बसणं त्यांचच असतं
आपण फक्त पाया म्हणून उभ राहायच असतं
राजकारण हे राजकारण असतं
ख-याचे खोटे अन् खोट्याचे खरे
करणं हे त्यांचच काम असतं
आपण फक्त मत मांडायच असतं
राजकारण हे राजकारण असतं
थोड अवघड अन् किचकटच असतं
वरवर सोप्प सोप्प दिसत असल तरी
वरून मुकुट पण आतून काटेरी असतं
मित्र दे रे (या निडणुकीत व्हाट्स अप् वर मित्र तुटतांना पाहीले अत्यंत टोकाची भूमिका घेवून भांडतांना पाहीले ,खूप वाईट वाटले . )
*****
संवाद साधून
घेई समजून
व्यर्थ व्यवधान
सुटे मग ॥
सुटे अभिमान
शंकेचे कारण
मैत्रीचे मरण
होई जेणे॥
देई रे हसून
घेई रे हसून
उघडी बोलून
कथा व्यथा ॥
होताच अवघे
मित्र जिवलग
आनंदाची बाग
जग होय ॥
दिल्याविना काही
मिळत ते नाही
कर्माची ही पाही
रित असे ॥
विक्रांत मैत्रीला
सदैव भुकेला
सांगतो दत्ताला
मित्र दे रे ॥
'आजचा सुधारक' हे नियतकालीक अनेक वर्षे सातत्याने चालल्यानंतर बंद पडले होते. त्याचे या महिन्यापासून पुनरुज्जीवन होते आहे. थोडेफार डावीकडे झुकणारे लिखाण असले तरी जगभरातील आजच्या राईट वींग प्रवृत्तींना ते टक्कर देऊ शकतील का ते पहायचे. निवडणुका जवळ आल्यामुळे हा अंक राजकारणावर आहे.
अस्मादिकांचाही एक लेख या पहिल्या अंकात आहे. भल्या बुऱ्या प्रतिक्रिया जरुर द्या
http://www.sudharak.in/