राजकारण

कोणता झेंडा घेऊ हाती?

Submitted by kapil gholap on 7 July, 2023 - 03:49

भारतातील खास करून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक परिस्थिती गढूळलेल्या अवस्थेत आहे, राजकीय, सामाजिक क्षितिजावर घडणाऱ्या अनेक विस्मयकारक घटनांचा सामान्य लोकांवर आणि लोकशाही वर परिणाम होतोच पण त्याचा जास्त परिणाम हा कार्यकर्त्यांवर होतोय. कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था निर्माण होते, खरं सांगायचं म्हणजे कार्यकर्त्यांचे अक्षरशः बारा वाजलेत. पक्ष/संघटना निष्ठा की, विचार/समाज निष्ठा? याबद्दल त्याचा सामाजिक व राजकीय कामातील उत्साह दिवसेंदिवस क्षीण होतोय. आणि जर त्याच्यातील कार्यकर्ता मरण पावला तर हे कोणत्याही पक्षाला कधीच परवडणारं नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

राष्ट्र्वादी (अप) आणी राष्ट्र्वादी (शप)!!

Submitted by यक्ष on 2 July, 2023 - 07:40

शेवटी बहुप्रतिक्षित पक्षफूट व अप साहेबांचे नवीन सरकारात जोरदार एंट्री! (मी शेवट्पर्यंत ह्याच पक्षात राहणार हेही सिद्ध करायचे आहे!)
भाकरी स्वतःहून फिरली काय?
शप साहेबांन्ना अजून किती काम करावे लागणार?
पुन्हा न्यायालय आहे का?

विषय: 
शब्दखुणा: 

मी वाचलेलं पुस्तक : राजधानीतून… लेखक अशोक जैन

Submitted by अनया on 18 May, 2023 - 09:21

श्री. अशोक जैन ह्यांनी १९७८ च्या ऑगस्ट ते १९८९ ह्या अकरा वर्षांच्या काळात महाराष्ट्र टाइम्स ह्या मराठी वृत्तपत्राचा दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. दिल्लीत असलेल्या विशेष प्रतिनिधीने तिथल्या राजकारणावर, सत्ता मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या चक्रावर नजर ठेवून आपल्या वाचकांपर्यंत त्या बातम्या पोचवणे, हे अपेक्षित होतंच. त्या व्यतिरिक्त दर सोमवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये दिल्लीतील घडामोडी सांगणारं ‘राजधानीतून’ हे सदर जैन लिहीत असत.

राजकारण

Submitted by नितीनचंद्र on 12 May, 2023 - 13:13

महाराष्ट्राच्या कुरूक्षेत्रावर
पुन्हा राजकारण घडत आहे.

आणखी एक धुर्तराष्ट्र आपल्याच पुतण्याला डावलण्यासाठी धडपडत आहे.

( ही वाक्ये चारोळीचे अनभिषीक्त सम्राट श्री रामदास फुटाणे महोदयांना समर्पित )

ही चारोळी माननीय रामदास फुटाणे यांना का समर्पित केली याचे कारण.

कै देविलाल आपल्या मुलाला मुख्यमंत्री ( ओमप्रकाश चौटाला याला ) बनविण्यासाठी धडपडत होते. या दरम्यान झालेल्या निवडणूक मधे हत्या झाल्या या पार्श्वभूमीवर श्री रामदास फुटाणे यांची चारोळी होतो.

महाभारताच्या कुरूक्षेत्रावर आणखी
एक महाभारत घडत आहे.

शब्दखुणा: 

महाराष्ट्रातील सत्ताकारणाची पुढील दिशा

Submitted by मराठीमाणूस on 25 June, 2022 - 15:21

(सर्वात आधी एक नवीन आभासी खातं मायबोलीवर तयार केलं. उगीचच सध्या सत्तेत असलेल्या विरुद्ध दोन शब्द इकडे तिकडे व्हायचे आणि एक दोन महिने तुरुंगाची हवा खायला लागायची. रिस्क नको.)

मागील काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. प्रसार माध्यमातून दिवसभर मनोरंजनही चालू आहे. अगदी उत्कंठा शिगेला पोहोचते आणि त्या दिवशीचा एपिसोड संपतो. परत दुसऱ्या दिवशी तेच चक्र.

हा तिढा सुटणार तरी कसा? हा "बाहुबलीने कटप्पा को क्यो मारा" या प्रश्नासारखाच गहन प्रश्न तमाम मराठी बंधू भगिनींना पडला नसेल तरच नवल.

विषय: 

राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा

Submitted by सॉक्स on 13 April, 2022 - 00:44

मायबोली वर राजकीय आणि सामाजिक विषयांवर उत्साहाने चर्चा होतात. त्या कधीकधी खूप माहितीपूर्ण असतात, आणि कधीकधी गोलाकार असतात, त्यांना ना सुरुवात असते ना अंत.

मला अशा चर्चांमध्यें सहभागी असलेल्या सदस्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, कधी मायबोली वरील चर्चेमुळे एखाद्या विषयावर मतपरिवर्तन झाले आहे का ?

जर मत बदलले असल्यास कोणत्या विषयावर बदलले आणि कशामुळे बदलले ?-

आंतरजालावर राजकीय विषयांवर चर्चा करुन फायदा काय?

Submitted by केअशु on 18 March, 2020 - 03:51

व्हॉटसअॅप,फेसबुक,ट्विटर,मिपा आणि अशी अनेक आंतरजालीय समाजमाध्यमे जिथे चर्चा करता येते; ती बहुतांशी वेळा देशाच्या,राज्याच्या राजकारणावरील चर्चेने अोसंडून वाहत असतात.अगदी काही वेळा वैताग येईल इतका इतका वेळ अशा चर्चांवर दिला जातो.आपला आवडता पक्ष,आवडता नेता हाच आख्ख्या भारतात किंवा राज्यात कसा चांगला आहे.तोच कसा जनतेला सर्वाधिक चांगला न्याय देऊ शकतो यावर अटीतटीने मुद्दे मांडणं सुरु असतं.समोरचा आपला मुद्दा मान्य करत नाही हे बघून काहीजणांचा तोल ढळतो; मग नको त्या शब्दांत किंवा वैयक्तिक जीवनातील गोष्टींचा उद्धार करुन नामोहरम करण्याचाही प्रयत्न होतो.आवडता पक्ष,नेता हरला की राग,संताप होतो.यावरुन कोणी

शब्दखुणा: 

मतदार हुशार झालेत का?

Submitted by विवेक9420 on 27 February, 2020 - 14:27

मतदार हुशार झालेत ?

दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर.
आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे.

शब्दखुणा: 

पत्ते

Submitted by यतीन on 24 September, 2019 - 08:04

राजकारण हे राजकारण असतं
पत्ते त्यांचे आणि खेळ ही त्यांचाच

आपण फक्त पत्ते पिसायच असतं
राजकारण हे राजकारण असतं

खुर्ची त्यांची अन् बसणं त्यांचच असतं
आपण फक्त पाया म्हणून उभ राहायच असतं

राजकारण हे राजकारण असतं
ख-याचे खोटे अन् खोट्याचे खरे

करणं हे त्यांचच काम असतं
आपण फक्त मत मांडायच असतं

राजकारण हे राजकारण असतं
थोड अवघड अन् किचकटच असतं

वरवर सोप्प सोप्प दिसत असल तरी
वरून मुकुट पण आतून काटेरी असतं

शब्दखुणा: 

मायबोलीवर राजकीय पक्षांच्या आयटी सेल कार्यरत आहेत का?

Submitted by हायझेनबर्ग on 28 May, 2019 - 10:27

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्यावेळी आणि पुन्हा मागच्या दोनेक वर्षात २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत राजकारणा संदर्भातले अनेक धागे फॉलो केले. हरेक धाग्यावर धुळवड सुरू होण्याआधी येणार्‍या चर्चात्मक प्रतिसादांची संख्या, प्रत्येक नवीन धाग्यागणिक कमी कमी होत गेली. शेवटी पहिल्या प्रतिक्रियेपासूनच धागाकर्त्याला डिसक्रेडिट करणे सुद्धा चालू झाले. सध्या राजकीय धागा म्हणजे प्रतिसादातून धुळवड असेच समीकरण झालेले दिसत आहे.
अनेकांचे चर्चात्मक प्रतिसाद वाहून दुर्लक्षिले जातात आणि विषय त्याच त्याच द्वेष पसरवणार्‍या मुद्द्यांभोवती फिरत राहतो.

Pages

Subscribe to RSS - राजकारण