त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले.
'अजि मी ब्रह्म पाहिले' एक गारुड...
हा अभंग ज्या कोणी संत श्री अमृतराय यांनी लिहिलाय त्यांना ते ब्रह्म दृग्गोचर झाले असेलही - कल्पना नाही.. पण आपल्याला स्वरब्रह्म नक्कीच भेटवेल असे हे अद्वितीय गाणे...
लहानपणी कानावर पडलेले या गाण्याचे सूर .... जसजसा मोठ होत गेलो तसतशी या सुरांची मोहिनी अजूनच गडद होत गेली.
खळे काकांनी जयजयवंती रागात बांधलेला हा श्री अमृतराय या संतांचा हा एक अगदी गोऽड अभंग. आशाबाईंनी अशा ताकदीने गायलाय की कितीही वेळा ऐकला तरी त्यातली गोडी उणावतच नाही, उलट वाढतच जाते...
मुलाच्या शाळेतुन वर लिहिलेल्या कोर्सवर एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की अंतर्मुख मुलांसाठी हा कोर्स फार उपयोगाचा आहे. त्यामुळे मुलांना इतरांशी सहजपणॅ मिसळणे शक्य होईल. कुणी हा कोर्स केला आहे का?
http://www.helenogrady.co.in/website/index.php/about
तालाविषयी माझे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे लवकरात लवकर कुणी देऊ शकेल का? तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप आभार.
१) समजा गाण्याचा ताल तीनताल आहे आणि जी व्यक्ती तबला वाजवत आहे ती व्यक्ती एक आवर्तन अतिशय हळूवार पण वाजवू शकते, मध्यम गतीमधेची वाजवू शकते आणि जलद गतीमधेही वाजवू शकते. म्हणजे, एक आवर्तन हे १ मिनिटात पुर्ण होऊ शकते तसे ते ३० सेकंदामधेही पुर्ण होईल. तर तबल्याची ही गती नक्की गायकाच्या आवाजावर अवलंबून असते? की ह्या गतीमधे गाणे गायचे हे आधीच संगीतकारानी ठरवलेले असते की हे तबला वाजवण्यावर ठरलेले असते?
नाही... सॅम अंकल नाहीये ते. सम अंकलच. मुळात सोम अंकल. खरतर काहीही म्हटलेलं चालायचं आम्ही पोरांनी त्यांना. पोरच काय बाकीचेही त्यांना वेगवेगळ्या नावांनी बोलवायचे.
मिस्टर सोमसुंदरम, मिस्टर सोम, सोम अंकल, नुस्तच ओ काका.. ते सम अंकल वगैरे मग आम्हा पोरांनी सुरू केलेली धतिंग.
मारलेल्या हाकेबरहुकुम ते उत्तरायचे.. म्हणजे. येस्सार... पासून काय गं पोट्टे ... ते... ’धा’!
उड़ जाएगा हंस अकेला।
जग दर्शन का मेला ।। धृ ।।
जैसे पात गिरे तरुवर के ।
मिलना बहुत दुहेला ।
ना जानू किधर गिरेगा ।
लग्या पवन का रेला ।। 1 ।।
जब होवे उमर पूरी ।
जब छूटेगा हुकुम हुजूरी ।
जम के दूत बड़े मजबूत ।
जम से पड़ा झमेला ।।2 ।।
दास कबीर हर के गुण गावे ।
वा हर को पार न पावे ।
गुरु की करनी गुरु जाएगा ।
चेले की करनी चेला ।। 3 ।।
- तसं समजायला सोपं असं हे निर्गुणी भजन.
सुनता है गुरु ग्यानी ।
गगन में आवाज हो रही
झीनी झीनी ।
नभ मेघांनी आक्रमिले...घन घन माला नभी दाटल्या...त्या ढगांचा गडगडाट होतो आहे आणि लवकरच पाऊस सुरू होणार आहे ही सामान्य घटना कबीर एका वेगळ्या नजरेतून बघतात.
आणि त्यांच्या 'भाई साधो' लोकांना प्रश्न विचारतात..
सुनता है गुरु ग्यानी? गगन में आवाज हो रही, झीनी झीनी. माझ्या ज्ञानी मित्रा, तुला गगनात होणारा आवाज ऐकू येतोय ना?
बघ तर तुला काय सांगतो हा आवाज?
ज्या ढगांचा हा आवाज आहे त्यांच्या पलीकडे पाणी आहे. आणि त्या बिंदूच्या आधीही 'नाद' ऐकू येतो. साधनेत सर्वप्रथम 'अनहत नाद' च ऐकू येतो आणि मग बिंदू दिसतात.
पाहिले आये नाद बिंदू से
गुरु बिन ग्यान!
गुरु विषयी अनेकांनी अनेक ठिकाणी बोलून ठेवलं आहे. पण तरीही प्रत्येकाला स्वत:च्या अनुभवांविषयी सांगावस वाटत असतंच! त्याला मी काही अपवाद नाही. म्हणून हा खटाटोप!