चित्रपटांची लाज काढणारा सूर्यवंशी बॉलीवूडमधे रिलीज झाला. तमिळ मधे सुद्धा असे सिनेमे येतात. पण त्याच वेळी ती चित्रपटसृष्टी बॉलीवूडची लाज काढणारे अनेक सिनेमे बनवत असते.
बॉलीवूडने अनेक विषयांवर कातडे ओढून घेतलेले आहे. वास्तववादी म्हणून फार तर वेन्सडे सारखा चित्रपट बनतो. अक्षयकुमारचे चित्रपट सातत्याने गुड मुसलमान आणि बॅड मुसलमान करत राहतात. हेच ते काय वास्तववादी. पण आजूबाजूला जे जातीच्या अत्याचारासारखे रखरखीत वास्तव आहे त्याकडे बॉलीवूडचे चित्रपट दुर्लक्ष करतात. असे मुद्दे अनुल्लेखाने मारत राहतात.
हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये राजश्री प्रॉडक्शनची स्वतंत्र ओळख आहे. नेहमीच्या मारधाडपटांहून आगळे चित्रपट निर्माण करणारे म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबरीने सुश्राव्य संगीतमय चित्रपट अशीही त्यांची ओळख आहे. आरती या त्यांच्या पहिल्याच चित्रपटापासून हा संगीतमय चित्रपटांचा सिलसिला सुरू आहे. दोस्ती पासून त्यांना साथ मिळाली ती लक्ष्मीकांत - प्यारेलाल यांची. एल-पींना पहिला हीट चित्रपट हा दोस्तीच्या स्वरूपात राजश्रीकडूनच मिळाला. १९७२ च्या पिया का घर पर्यंत एल-पी राजश्रीच्या चित्रपटांना संगीत देत होते.
हिंदी, मराठी चित्रपट संगीत, भावगीतं, लोकगीतं यांमधील सौंदर्यस्थळांबद्दल चर्चा इथे करू.
..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८) या धाग्यावर एका कोड्याचे उत्तर देताना जी अधिकची माहिती मला लिहाविशी वाटली त्यावरून ही कल्पना सुचली.
नमस्कार !
आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती सांगता सांगता टप्प्याटप्प्याने काही प्रश्न विचारतो. त्यांची उत्तरे मनात देत रहा.
आणि हो, गोष्ट क्रमानेच वाचा. मजकुराचा शेवट आधी बघू नका. तरच मजा येईल !
मग चालू करूयात ?
१. एका गरीब रिक्षाचालकाच्या रिक्षेत एक तरुणी बसली आहे. गाडी सिग्नलला थांबलीय. तेवढ्यात रस्त्यावरची एक भटकी मुलगी त्या तरुणीची पर्स पळवते आणि जोरात पळू लागते. अशा प्रसंगी तो रिक्षाचालक रिक्षा थांबवून आणि आपला कामधंदा सोडून त्या चोर मुलीचा पाठलाग करेल, की त्या तरुणीला उतरवून आपले भाडे घेऊन निघून जाईल ?
`हद कर दी आपने!` हा माझ्या आवडत्या चित्रपटांतील एक चित्रपट!
परीक्षण - Scam 1992: The Harshad Mehta Story
अलीकडच्या काळात वेब सिरिज म्हणजे अतिरंजित कथा, अति भडक मारामारी, आणि अति भडक दृश्ये असे समीकरण बनले होते. पण या सगळ्यांना छेद देणारी नवीन वेब सिरिज म्हणजे SCAM 1992 आली आहे. IMdB या संकेतस्थळा वर ९.५ मानांकन असलेली एकमेव भारतीय वेब सिरिज आहे. त्यामुळे ही सिरिज बघायचीच असे ठरवले.
१७ मे २०१८ च्या सकाळी सलिह नावाचा एक माणूस केरळमधील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत दाखल होतो . सुरुवातीला त्याच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांना तो जापनीज इंफायलिटीसचा प्रकार वाटतो . पण जसजसा दिवस वर चढत जातो तसतसा उपचार करण्याऱ्या न्यूरॉलॉजिस्टना काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो . या रोग्याची लक्षण वर उल्लेख केलेल्या आजारापेक्षा वेगळीच असतात . विशेष म्हणजे १२ दिवसांपूर्वी सलिहाचा भाऊ याच लक्षणांनी बेजार होऊन गेलेला असतो . आणि सलिहाचे बाबा आणि आत्यामध्येही तीच लक्षण दिसू लागतात .
डर सिनेमातल्या शाहरुखशी जर जुहीने लग्न केलं असतं तर काय झालं असतं ? लहानपणी तो सिनेमा पाहताना वाटायचं की जर जुहीने त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला असता तर तो सुधारला असता , तिच्याशी प्रेमाने वागला असता , दोघे एकमेकांबरोबर सुखी झाले असते ... अर्थात त्याचं वागणं चूक आहे , तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटणं आहे आणि त्याला स्वीकारायला ती अजिबात बांधील नाही , वगैरे सगळं कळायचं ... पण शाहरुखमुळे त्या पात्राबद्दल सहानुभूती वाटायची ...
- “शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥ शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥ शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥“ शिवराया बद्दल कितीही पुस्तके लिहिली आणि कथा चित्रपटात दाखवल्या तर कमीच पडेल. राजांची प्रत्येक लढाई, पराक्रम, कर्तृत्व, माणसं जिंकण्याची कला, आणि बुद्धीबळातील अजोड चाली प्रमाणे खिंडीत गाठून शत्रूवर केलेली मात यावर चित्रपट निघू शकतो. राजांचे उत्तुंग कर्तृत्व आणि पराक्रम आभाळाच्या परीघा सारखा होता.