मुंबई दहशतवादी हल्ला

१९९३ ते २०१३

Submitted by अनुराधा म्हापणकर on 12 March, 2013 - 04:48

१९९३ ते २०१३
===========

वीस वर्ष झाली सिरियल ब्लास्टला
त्यानंतर ही हल्ल्यांची सिरियल थांबली नाही.
कधी ट्रेन, कधी बस, स्कूटर, कधी टॆक्सी
अगदी पंचतारांकित वास्तूही त्यांनी सोडली नाही

तुटत मोडत विस्कळत राहिली मुंबई
रक्ताने माखलेली जळत राहिली मुंबई
पुन्हा जखमांनी भळभळत राहिली मुंबई 
तरी पुन्हा उभी राहून पळत राहिली मुंबई 

मुंबईला ओरबाडताना 
तिच्या दु:खाला गाडताना 
तिच्या जनतेला नाडताना 
तिची वसने फाडताना 
कुणा नेत्याचे हात नाही कचरले
फुंकर घालत तिला कुणी नाही विचारले 
की कुणा नेत्याच्या अंगी नाही संचारले 

मुंबई पोसत राहिली

दहशतवाद : मी काय करणं अपेक्षित आहे?

Submitted by गजानन on 14 July, 2011 - 02:56

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातली/देशातली ही परिस्थिती सुधारून असे हल्ले टाळण्यासाठी एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे?

'मी' म्हणजे भारत देशातला एक सामान्य नागरिक.

कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं

या व्यतिरिक्त.

मला प्रामाणिकपणे हे जाणून घ्यायचे आहे.

विषय: 
Subscribe to RSS - मुंबई दहशतवादी हल्ला