कशाला त्या सायकियाट्रिस्टच्या डोंबल्यावर पैसे घालायचे? घडा घडा बोलावं. धडाधडा काम करावीत. रिकाम मन सैतानाचे घर. रिकामटेकडेपणातून हे नसते उद्योग सुचतात. तो काय सांगणार? आम्ही जे सांगतो तेच ना! मित्रमंडळींशी, घरच्यांशी शेअर करा, बोला. कामात गुंतवून घ्या! पण फी देउन हेच ऐकल की बरं वाटत. आम्ही सांगितलं तर त्याची किंमत नाही. प्रत्येक गोष्टीवर शंका घेत बसले की मग नस्ते आजार मागे लागतात. हे होतय ते होतयं. लवंग खाल्ली कि उष्णता होती आन वेलची खाल्ली की सर्दी होते. आम्ही बघा! जातो का उठसुट डॉक्टर कडे? आपली रोगप्रतिकार शक्ती असतेच ना! एकदा औषध गोळ्या मागे लागल्या कि घेत बसा आयुष्यभर.
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शुक्रवार १७/१२/२०२१ रोजी विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नका उखडू पुतळे आदर्शाचे
जे आम्हा पुजनीय असती
नका विटंबवू आदर्श आमचे
जे आमच्या हृदयात वसती
हे पुतळे नेहमीचे साधे नाहीत
अगदीच लेचेपेचे नाहीत
ते जीवंत जरी नसले तरीही
कार्य त्यांचे तळपत राहील
पुतळे जरी नष्ट केले
आदर्श नष्ट होत नसतात
त्यांच्या येथल्या असण्याने
तुम्ही येथे राहत असतात
- पाषाणभेद
२०/१२/२०२१
समींदरा रे समींदरा,
तू जपून आण माझ्या घरधन्याला
लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ||
नको उधाण आणू तुज्या पाण्याला
नको मस्ती करू देऊ वार्याला
काय नको होवू देऊ त्याचे होडीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२||
नारल पुनवचा सण आता सरला
तुला सोन्याचा नारल वाढवला
नेल्या होड्या त्यानं मासेमारीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३||
मी कोलीण घरला एकली
सारं आवरून बाजारा निघाली
म्हावरं विकून येवूदे बरकतीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४||
फलज्योतिषाचा उपयोग हा त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि रुपाबद्दल अंदाज करणे, त्या व्यक्तीचा उपजीविकेचा प्रांत अंदाजे कोणता असेल? त्याला कोणता दखल घेण्याजोगा आजार/विकार आहे का याचा अंदाज करणे, आयुष्याचा जोडीदार म्हणून योग्य ठरेल का याबद्दल अंदाज करणे, जातकाचा प्रेमविवाह होईल का? तसेच जातकाच्या आयुष्यातला मानसिक संतुलन बिघडवणारा कालावधी ओळखणे, त्या व्यक्तीची एखादी इच्छा पूर्ण होईल की नाही आणि कधी होईल अशा कामांसाठी केला जातो.
''दांडेकरांच्या राज्यात होळकरांची फौज आल्यावर कस काय व्हायचं?`` असा प्रश्न एकानं थोडं चिंतातूर होउन विचारल्यावर त्याला दुसरा म्हणाला, ''अरे त्यात काय? इथंच सोय झाल्यावर बाहेर धुंडत बसायला नको. साली पन साहेब लोकांची मज्जा !`` 'हित कशाला चांगल्या घरातल्या पोरीबाळी येताहेत. अहो इथं तसल्याच बाया येणारं. एकीकडं हे बी चालू दुसरीकडे नोकरी बी चालू` पोलीस खात्यात महिला पोलीस भरती मोठया प्रमाणात भरती जेव्हा होणार होत्या त्यावेळी उमटणारी ही स्पंदन.
शेतकरी आंदोलन आता थांबवतील, आणि नापसंत कृषी कायदे मागे घेतले म्हणून घरी जाऊन कदाचित दिवाळी साजरी करतील. आणि आपलं रोजचं आयुष्य जगतील.
पण दलित मजदुर ज्यांनी शेतकरी आंदोलनात भाग घेतला होता, भावनिक होऊन शेतमजूर असुनही तिथे त्या शेतकऱ्या सोबत ठिय्या दिला आंदोलनात त्यांना मात्र आंदोलन आटोपून घरी जाणं तेवढ्या आंनदाचं राहणार नाही. रोज परत जातीवादी जगणं तिथं चुकणार नाही जे ग्रामीण, शहरी भागात आहे.
आजीच्या गोष्टीत असतना तस एक आटपाट नगर होत या नगरात सर्व धर्माचे प्रांताचे लोक गुण्या गोविंदाने रहात होते .हे आटपाट नगर काही काळापुर्वी पारतंत्र्यात होत पण तेथील जनता मात्र स्वातंत्र्यप्रिय होती म्हणून ती स्वांतत्र्यासाठी प्राणाची पर्वा न करता लढली आणि जवळपास पंचाहत्तर वर्षीपुर्वी या नगराला स्वांतत्र्य मिळाले होते देश आधिच परकीय सत्तेने लुटून नेला होता पण सुजिन प्रजा आणि विकासाचा ध्यास घेतलेले राजे यामुळे लवकरच नगर सुफलाम झाले याकाळात या नगराला परकीय आक्रमणालाही तोंड द्यावे लागले पण आधिच्या युद्धातुन अनुभव घेतलेल्या नगराने शत्रुला नुसती धुळच चारली असे नव्हेतर आक्रमक नगराचे तुकडेही केले पण य
शोधितो आहे मिळाला अजून नाही
तुझ्या आठवणींना पर्याय असा काही
गुंफून शब्दांची माळ काव्य केले किती
मंत्रमुग्ध असे लिहणे काही जमले नाही
तुझ्या सुखात नेहमी माझे सुख मानले
समाधान मात्र तुझ्याकडे उधार राहिले
काही दिवस देवदास सारखे जगून पाहिले
मद्याचा सहवास करणे मात्र जमले नाही
अपेक्षा होती मला भरघोस परताव्याची
हृदयाची गुंतवणूक मात्र चुकीची निघाली
नफा ना तोटा ह्या तत्वावर संधी तर झाली
केलेल्या संधीचे सोने करणे मात्र जमले नाही
- अक्षय समेळ.
काही वर्षांपूर्वी, आईने जपून ठेवलेली, माझी जुनी वही सापडली होती. त्या संग्रहातील काही ओव्या खाली देत आहे. कवी माहीत नाही. या ओव्या पूर्वी सिध्दीच्या धाग्यावरती एका प्रतिक्रियेमध्ये दिलेल्या आहेत पण आज, इथे वेगळ्या धाग्यात देते आहे.
-------------------------------------------------------------------------
माझ्या एका मित्राबद्दल सल्ला हवा होता. मायबोलीकरांनी सल्ले द्यावीत ही विनंती.
कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाणे तसे
वाईटच आमच्या मित्राचे तेच झालेय तो नामस्मरणाच्या आहारी गेलाय. 'आता हे तर ग्रेट काम आहे यात कसलं आलाय आहारी जाणे?' असा प्रश्न बऱ्याच जणांना पडेल.ते कस हे मी थोडक्यात स्पष्ट करतो. हा मित्र पाहिल्या पासूनच स्थूल प्रकृतीचा उंची साधारण पण वजन ८० ते ८५ किलो च्या आसपास. खाण्याची प्रचंड आवड, धावपळ भरपूर करायचा. सदा हसमुख
पण गेल्या ६ महिन्यापासून त्याने एका प्रसिद्ध बुवांचा फोटो आणलाय.सध्याचा त्याचा दिनक्रम पुढीलप्रमाणे.