बालपण ..
आपला जन्म होतो. आपण म्हणजे आई- बाबांच सगळ्यात precious गिफ्ट. त्यांच्या अंगाखांद्यावरून खेळत हळूहळू आपल्याला येतं एक बालपण. सुंदर, समाधानी आणि गमतीशीर बालपण. जेव्हा आपण आईबाबांच्या सुरक्षित पंखाखाली निर्भीडपणे जगात असतो. छान छान गोष्टी, बालगीते, कविता, वाळूचे किल्ले, पऱ्या- राक्षस, ससा- कासव, घसरगुंड्या, सापशिडी, पकडापकडी, पडणे- धडपडणे, रडणे, पाउस, बेडूक, सर्दी- खोकला, शाळेला बुट्ट्या, भावला-बाहुलीचा लग्न अशा सगळ्यात रमण्याचे दिवस. सगळं कसं छान.. आई बाबा सांगतील, दाखवतील एवढंच आपलं जग.
वेडं वय
हे लेखन कथा नसल्यामुळे लेख विभागात टाकले आहे.
लेखन इथून पूर्णपणे कसे काढून टाकायचे ह्याबद्दल थोडी माहिती मिळेल का?
ज्ञानेश्वर माउलींच्या जीवनावरील कादंबरी वाचन श्री पद्माकर गोवईकर यांनी "मुंगी उडाली आकाशी " या ध्वनिफितीत अतिशय सुंदर केले होते. मी ते सतरा अठरा वर्ष्याचा असताना ऐकले होते. आणि वारंवार ऐकत होतो. त्यामध्ये एक प्रसंग होता की आळंदीच्या ब्राम्हणांच्या छळाला कंटाळून विठ्ठल पंत मुलांना घेऊन ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करायला त्य्रंबकेश्वर येथे जातात व ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करतात. तेथे असा उल्लेख केलेला ऐकला होता कि ब्रम्हगिरिचि प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. कारण ब्रम्हगिरीचा पर्वत म्हणजे साक्षात शंकर आहे. असा पुराणात उल्लेख आहे.
"तुझ्याकडून केवढ्या अपेक्षा होत्या आमच्या म्हणून आम्ही तुझ्याकडे राहायला येत होतो, तुला आमचा वापर करू देत होतो. पण तू एकदम अपेक्षाभंग केलस आमचा. "
मला ते सगळेच बोलत होते. आणि मी मान खाली घालून ऐकत होते.
खरं होतं ते. ते फार विश्वासाने माझ्याकडे आले होते. खरं तर मीच आर्जव करून त्यांना बोलावून घेतले होते. पण त्यांना बाहेर आणायची वेळ यायची तेव्हा मात्र मी कच खायचे. कधी आत्ता वेळच नाही तर कधी आत्ता खूप थकले आहे, कधी आत्ता शब्द नाहीत तर कधी आत्ता तुम्ही खूप विस्कळीत आहात तर कधी आत्ता सगळं असलं तरी लिहायला काही नाही पेन नाही, कागद नाही.
पोट हा दोन अक्षरी आणि तीन मात्रांचा शब्द तिन्ही लोक (भूलोक वगैरे) व्यापून उरला आहे. जसा देव अनादी आहे तसेच पोट पण अनादी काळापासून माणसांची, प्राण्यांची सोबत करत आहे. पोट या विषयावर असंख्य म्हणी.आणि मुहावरे आहेत. १) आधी पोटोबा मग विठोबा, २) कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी, ३) हिंदी सिनेलातील दणकेबाज डाय्लॉग "पापी पेट का सवाल है". ४) हातावर पोट घेऊन निघणे वगैरे वगैरे. मला तर बर्याच वेळेस वाटते की पोटाचे महत्व लक्षात घेऊनच गणेशाला लंबोदर किंवा मोठ्या पोटाची देवता बनवले गेले असावे.
है स्साला....
अभी अभी हुआ यकीं
के आग है ...
तीरांचं कसं असतय बघा, तीर तीर पे लिखा है निशान-ए-दिलका नाम!
म्हणजे काही तीर अगदी जवळून... कानाला वारा देऊन जातात... काही चक्कं वळसा घालून... पण आपलं नाव लिहिलेला तीर? तो पत्ता शोधत येतोय... तुम्ही कुठे खाचपटीत, तळघरात बसा... काही खरं नाही.. घुसायचं तेव्हा घुसतो, आणि करायची ती तबाही करतोच.
बाबा आणि सोनू........
---------------- || श्री || -------------
दिनांक १७ सप्टेंबर २०१३
पुणे.
प्रिय सोनू,
खरं तर तू एवढी मोठी झाल्यावर हे पत्र मी तुला लिहितोय याचे तुला आश्चर्यच वाटेल - कारण मी तुझ्याशी कायमच मित्रत्वाने आणि मोकळेपणाने बोलू शकतो. पण मग पत्राचे कारण काय ? खरंच, कारण नक्की काय आहे असे विचारले तर माझ्याकडे काहीच कारण नाही.... तरी पण ...
एक कारण जरुर आहे.
आताच एक खूप सुंदर लेख वाचला लोकसत्ता मध्ये Dr राजीव शारंगपाणी यांचा . "लोढणी टाका " आयुष्य मजेत जाईल.
http://www.loksatta.com/lokrang-news/add-to-liability-190768/
खरच आपण कळत नकळत किती ओझी वाहत असतो नाही !! गणपती, गौरी अनेक गोष्टी फक्त पूर्वापार चालत आल्यात म्हणून करतो . आजच्या जीवनात त्याचा काही एक मेळ बसतो का ?
गणपती बसवणे लोकमान्य गंगाधर टिळकांनी ज्या कारणाने सुरु केला तो हेतू आता उरला आहे का ?