कृष्ण स्वतःला स्वर्गात म्हणाला
खूप ऐकलाय जन्माष्टमी सोहळा
एकदाचा भूलोकी हवा पाहायला
याची देही याची डोळा
रुप बदलून अष्टमीच्या रात्री
कान्हा धरेवर आला
भजन किर्तनी रमला
सजलेल्या पाळण्यात झुलला
स्तुतीगाण ऐकून मनी हरखला
म्हणाला
सकाळी फेरफटका मारु शहरात
बघूया काय घडतयं गल्ली बोळात
रात्री जन्माष्टमीचा सात्विक सोहळा
दिवसाही लुटायचा नवनीत गोळा
हळूच शिरला गोविंदा पथकात
वेशांतर करुन ओळख लपवत
गहिरे गोकुळ 2
***बराच विलंब झाला ना?पहिला भाग लिहून. राधा कृष्ण यांच्याविषयी लिहिताना खूप शब्द येतात.त्यांना मांडताना फार गाळण उडते.
आता नाही उशीर करणार....***
**तर पुढे
**राधा: कान्हा , खूप निवांत गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी. अर्जुनाला जे ज्ञान दिलंस म्हणजे तसं ऐकून आहे मी द ग्रेट भगवद्गीता...
कान्हा काय आहे रे ही भगवद्गीता? तुझं आणि अर्जुनाचं नातं हे किती सॉरटेड आहे. सखा म्हणतो तो तुला आणि तू मारलेली पार्थ ही हाक, साऊंडस सो रेस्पेक्टबल!!!
गम्मत आहे ना माधवा, आपलं नातं मात्र किती किती वेगवेगळ्या आयामातून पाहिलं गेलाय ,कान्हा.....समजत नाही....
कृष्ण होऊन गेला त्याला हजारो वर्षे झाली. पण अनेक विचार धारा, परंपरा शिकवणुकी, कथा यातून कृष्ण आपल्यातच आहे.
गहिरे गोकुळ हा राधाकृष्ण संवाद कल्पून एक नाट्यमालिका लिहिते आहे. यातील कल्पित राधाकृष्ण संवाद आताच्या भाषिक शैलीला समोर ठेवून लिहिला आहे. राधा आणि कृष्ण हे आधुनिक युगात येऊन जुन्या घटनांचा आणि नवीन घटनांचा चर्चा रूप आढावा घेत आहेत अशी कल्पना आहे.
खालील नाट्यरुप हे केवळ एक विचारमंथन आणि मनोरंजन पर लेखन आहे.
गहिरे गोकुळ....भाग 1
राधा: अरे थांब थांब...थांब रे किती धावशील...कलियुग आलंय...मी आजही तशीच अर्धवट...ही इथेच बसलेय...वाट बघत..
गीता जयंती निमित्त आगामी युगांतर पुस्तकातला एक भाग तुम्हा सर्वांकरता......
युगांतर-आरंभ अंताचा!
कुणाच्यातरी आगमनाची चाहूल लागली आणि भीष्मांनी डोळे उघडत आवाजाच्या दिशेने पाहिले. निळा शेला आणि मोरमुगुटातले मोरपीस कृष्णाला अगदीच शोभून दिसत होते. तो भीष्मांजवळ आला तेव्हा त्याच्या रुपाचं संमोहन तिथल्या वाऱ्यावरही घडलं असावं. कुठल्याशा धुंदीत तो चक्राकार वाहू लागला.
रात्र.... पाऊस...... कशाची तमा न बाळगता ती चालत सुटली. गणपत चौकात येईपर्यंत तिचे कपडे भिजून अंगाला घट्ट चिकटले होते. तिच्या नकळत २ जणांची वखवखलेली नजर.... तिच्या कपड्यांच्या आरपार पाहण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या खांद्याला कसलासा स्पर्श झाला तसे दचकून तिने मागे पाहिले.
"कहॉ चली मोहतरमा?" तिच्या खांद्यावर हात घासत पहिला म्हणाला. तिला त्या स्पर्शाची जबरदस्त किळस वाटली. तिने हात झटकत घाबरून त्याच्याकडे पाहिलं. तितक्यात दुसऱ्याने तिला मागून पकडलं.
"वाचवा.... वाचवा..... हेल्प!" जीवाच्या आकांताने ती ओरडू लागली. प्रतिकार कमी झाल्याची संधी घेत पहिल्याने पुढून पकडलं.
आहे अजूनही मी
पाहित वाट राधे
डोळ्यात बोचते मज
माझेच रूप आधे
बोल मज "हे मुरारी
राधा तुझीच सारी"
भेटावयास ये मज
तोडू नकोस वादे
डोळ्यात बोचते मज
माझेच रूप आधे
मी शाम-रंग माझा
तू पुष्पगुच्छ साजा
बिलगून गंध दे मज
इतकेच शब्द साधे
डोळ्यात बोचते मज
माझेच रूप आधे
वाटे तुला ना काही
श्रीकृष्ण वाट पाही
गोपी असूच दे मग
रुसवा कशास मागे
डोळ्यात बोचुदे मज
माझेच रूप आधे
©-जोतिराम
नमस्ते मित्र मैत्रिणींनो,
ही कृष्णाची आरती माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.
तुम्हाला आवडल्यास तुम्हीही म्हणू शकता.
जय देव जय देव जय गोपाळा कृष्णा
तव गीतामृत पाने निवते भव तृष्णा || धृ ||
नीती न्याय दयादिक गुण जनी लोपोनि
अधर्म अन्यायाही त्रासली जब अवनी
दुष्टा निर्दालाया तव जगी अवतरुनि
सुष्टा रक्षियले त्वा सत्पक्षा धरुनी || १ ||
कृष्ण सावळा तो राधेचा कुठे हरवला तरी
व्याकुळलेली दिसे बावरी फिरते यमुनातीरी
सूर कुठे पाव्याचा घुमतो कान देऊनी उभी
झुळझुळणारा वारा वाहे नादावून ती खुळी
चमकून बघता अाभाळीचा मेघ शामवर्णी
कान्हा कान्हा शब्द विराले निश्चळ ती रमणी
मेघ थबकला माथ्यावरती राधा फुटली ऊरी
अलगद सुटता भान तयाचे बरसे वरचेवरी
चिंब भिजूनिया कृष्णप्रेमिका अंतरात श्रीहरी
जळ यमुनेचे कृतार्थतेने लोळे चरणांवरी
(मुकुल शिवपुत्र यांची "तारुवा गिनत गिनत"ही चिज एेकताना जे वाटत गेलं ते असं...)
आणि ती ही रात्र आठवते सख्या...
तुझा निरोप आला अन सारी दुपार संध्याकाळची वाट बघण्यात गेली. तू येणार...काय करू, काय नकोहोऊन गेलं.तुझ्या येण्याला साजरं करण्यासाठी किती सोसा सोसाने सारे सजवले, सजले... सजणेच जणु साजण होऊन आले!
अन दुपारची तलखी संपून मनातली गोड हुरहूर अंगभर, अंगणभर पसरत गेली, उतरणाऱ्या उन्हातल्या सावल्यांसारखी.
अन तोही दिवस आठवतो राधे,...
रंगपंचमीचा दिवस होता तो. सकाळीच माईने मला ओवाळले, तिलक लावला, नंदबाबांनी गुलाल लावला गालाला आणि रंगीत करून टाकला सारा दिवस. त्यांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो अन सगळ्या गोपांनी घेरून टाकलं. नुसती धमाल सुरू झाली.
सगळे एकमेकांना रंगवत यमुनेतीरी आलो. तर तू अन तुझ्या सख्याही तिथे आलेलात, नेहमी प्रमाणे पाणी भरायला. पण आज तुम्हाला घाई नव्हती. तू पुढे झालीस, मला हळूच गुलाल लाऊन उलटी वळलीस. पण मी असा सोडणार नव्हतोच तुला. मीही गुलाल उधळला. सगळेच गोपही रंग उडवू लागले. लाल, निळा, गुलाबी, केशरी सारे रंग एकमेकांत रंगू लागले.