रात्री साधारण दोन-अडीज वाजलेले. डाव्या कुशीवर खिडकीकडे तोंड करून झोपलेलो मी. थंडीचे दिवस. अंगावर रजई ओढलेली. कुशी बदलण्यापुरती जाग आली. या कुशीवरचा त्या कुशीवर झालो. उबदार रजईत अंग आकसून पुन्हा झोपायच्या बेतात आणि कानावर काहीतरी खसखसल्याचा आवाज. आंतरमनाला जाग आली. ‘हे काये?,’ असं मनातच म्हटलं पण डोळे अजून मिटलेलेच. कपाळाखालच्या खोबणीत रुतलेले डोळे सैल करत कसेबसे पण अर्धवटच उघडले. बाहेरचा पुरेल असा अंधूक प्रकाश खिडकीतून आत येऊन पसरलेला. डोळ्यासमोर पलंगाचा विस्तार संपताच पडद्याने अर्धी झाकलेली खिडकी आणि तिच्या काचेतून बाहेर पाहता येईल असा नजरेचा टप्पा.
तुझ्या स्मरणात गेले उरलेल्या आयुष्याचे क्षण,
पुन्हा पुन्हा जगतो मी ते विरलेले मधुर क्षण।
माझी कविता ऐकून तू अनाहुत लाजलिस,
अजून डोळ्यांसमोर आहे तो गुलाबी क्षण।
तुझा स्पर्श होता जणू स्पर्श आयुष्याचा,
हृदयात जपून ठेवला अजूनही तो हळुवार क्षण।
तुझ्या ओठांत दडलेले किती अबोलसे अर्थ,
तू न बोलताही सारे मला उमजलेले ते क्षण।
तुझ्या पैंजणांची रुणझुण ऐकत सरले आयुष्य,
चांदण्यात भिजून गेले ते निःशब्द तारकांचे क्षण।
हात-हातात-घेऊन-तू ... सोडला-निःश्वास
गोठला-हृदयात-माझ्या ... तो-विरहाचा-क्षण
पुढे वाट काळोखी
चल ओंजळीत
उजेड घेऊन जाऊ
नसुदे निवारा कुठे
चल चांदण्यांचे
पांघरून करुन राहु
हा प्रवास आहे दुर्धर
चल वाटेसाठी
स्वप्नांची शिदोरी घेऊ
येतील वाटेत क्षण
चल गुंफून
आठवणी मनांत ठेऊ
अजय सरदेसाई (मेघ)
१६/३/२०२२ , ७:०० PM
meghvalli.blogspot.com
कधी भरलं आभाळ, कधी भरलं आभाळ
तूच तुझे तुला आता, क्षण एवढे सांभाळ
कधी झालं रे मोकळं, आभाळ हे मोकळं
सुख आलं दारी आता, क्षण एवढे सांभाळ
भरलं हे आभाळ, मोकळं हे आभाळ
तूच घाल आता मेळ, पाठशिवणीचा खेळ
ज्याला कळलं कळलं, त्याचं पारडं भरलं
श्रावण हा ज्याचा त्याचा, त्यात इंद्रधनू सजलं
राहुन गेले..
तुझ्यासवे अवखळ
बालपणीचे ते क्षण
पुन्हा एकदा
वेचायचे होते
ते क्षण वेचणे
राहुन गेले
तुझे जीवनगीत
ऐकत तुझ्या
कुशीत रातभर
जागायचे होते
ते जागणे आता
राहुन गेले
तु शिकवलेस
मज चालावयास
तुला आधारासाठी
हात देणे राहुन गेले
तुझ्याकडुन अजुन
जगरहाटीचे नियम
शिकायचे होते
पण ते नियम
शिकणे राहुन गेले
ओथंबलेले क्षण का स्मरतात
स्मृती उगाचच गर्दी करतात
जुन्या आठवणी कुरतडतात
हळुवार क्षणी मात्र डोकावतात
आठवणी आल्या चोर पावलांनी
हृदयाचा ठोका चुकला क्षणांनी
दगा दिला डोळ्यातील आसवांनी
दूर तरी बांधलो प्रेमाच्या नात्यांनी
हाक दिली हृदयस्थ भावनांना
प्रतिसाद नाही आला शब्दांना
विझावतो आतल्या तीव्र उद्रेकांना
साद घालतो आपल्याच लोकांना
अंतर असे कितीसे दोन श्वासांमधले
अंतर तितकेच आहे असण्या नसण्यामधले
बांधले जे मनोरे तू, आयुष्य खर्ची पडले
सांग गळून जाताना काय कामी आले
मार्ग पुढचा सांधताना, रस्ते ओस पडले
मागचे कढ आता, बांधू न शकले धागे
आजचा क्षण मात्र हसून उभा होता
पण तुला कळण्याआधीच कालचा झाला होता
क्षण हाच आहे, श्वासांना जोडण्याचा
निसटण्याआधीच प्रेमाने आलिंगनाचा
सामोरे जा आजच्या सौख्याला
मार्ग तोच आखील आणि नेईल मुक्कामाला
रायगड वारी… ( अंतिम भाग ) !!!
रायगड ! पहिल्या पायरीलाच तुला नमन… नव्हे, वाकून नमस्कार !!! इथे आल्यावर मला नेहमी वाटतं ती रायगड माझ्याकडे पाठ करून उभा आहे, गर्विष्ठपणे. पण त्याचंही बरोबर आहे. का करू नये गर्व ? माझ्या राजांचा एकटाच तर साक्षीदार आहे. कित्त्येक क्षण अनुभवले याने राजांसोबत, काय काय नाही पाहिलं याने, काय काय नाही सोसलं याने. याला बोलता आलं असतं तर विचारलं असतं सांग माझा राजा कसा होता…
आज संध्याकाळी काम संपल्यावर चालता चालता लहर आली, म्हणून सहज काहीतरी चघळायला घ्यायला दुकानात घुसलो. शेंगदाणे, चॉकलेट असे काहीतरी घेणे माझ्याकडून बरेचदा होते. माझ्या नेहमीच्या स्टोरमध्ये गर्दीही फार नसते. आजही नव्हती. उगाच २-३ जण माझ्यासारखीच काहीतरी सटरफटर खरेदी करायला आले असावेत. काही विद्यार्थी, काही कामावरचे लोक ... पूर्वी एकांकिकेत काम करताना पार्श्वभूमीवर काही 'नेहमीची मंडळी' वातावरण निर्मिती करायला इकडून तिकडे जात असायची तसाच सगळा माहौल होता एकंदरीत.