अफजलखानाची कबर

Submitted by शाखाहारी पिशाच्च on 24 November, 2022 - 08:35

नुकतेच अफजलखानाच्या कबरीवर केलेले बांधकाम महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने हटवण्यात आले. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गेली अनेक वर्षे बांधकाम हटवा अशी मागणी हिंदुत्ववाद्यांकडून होत असे. आता तेच सत्तेत आल्यावर कबरीभोवतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे कारण देऊन ते हटवले गेले आहे.

या कारवाईला अपेक्षित विरोध झाला नाही. कारवाईनंतरही फारसे पडसाद उमटले नाहीत. त्यामुळे बांधकाम हटवण्याच्या मागणीला विरोध करणारे तत्कालीन सरकारमधले लोक आपल्या भूमिकेवर ठाम नाहीत का असे विचारले जात आहे. तसेच या प्रश्नाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्नही होत आहे.

सोशल मीडीयात वेगवेगळे नरेटिव्हज मांडले जात आहेत. पण ते क्षीण आहेत. कारवाई झाली आणि तिला जवळजवळ शून्य विरोध झाला असेच चित्र आहे. मग हा प्रश्न इतके दिवस का चिघळला होता असा प्रश्न आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताची आघाडी सरकार चा अडीच वर्षाचा काळ सोडला तर.
त्या मधील किती तरी काळ तर covid सारख्या महामारी मध्येच गेला.
त्याच्या अगोदर bjp आणि सेना ह्या हिंदू हीत वादी पक्षांचं च सरकार होते.
तेव्हा पण अतिक्रमण होतेच ते काही आता झालेले नाही
पण तेव्हा का कारवाई केली नाही
आता शिंदे मुख्य मंत्री आहेत .शिंदे सरकार आहे.
म्हणजे पाहुण्याच्या चप्पल नी विंचू मारण्याचे काम bjp नी केले आहे.
उद्या वेळ आली तर bjp ल पलटी मारायला जागा आहे

Lol Lol Lol

इतके दिवस chutzpah ह्या शब्दाला योग्य उदाहरण मिळत नव्हते. ते उदाहरण पुराव्यानिशी शाबीत केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार _| |_

रोग जास्तच बळावला बहुतेक. बाकी मायबोलीवर मी बरेच जणांना भेटलो आहे, माझ्याबद्दल बरेच जणांना माहिती आहे. त्यामुळे हे फोटो ,फोन नंबर टाकून स्वतःचा कंड शमवून घेणे ह्यात फक्त मानसिक विकृती असू शकते. गोळ्या वेळेवर घेत चला. बरे होण्यासाठी शुभेच्छा. तुमच्या आजूबाजूच्यानाही शुभेच्छा, त्यांनाच जास्त गरज आहे.

शापि यांचे म्हणणे खरे असेल तर समविचारी , रोजच्या संबंधित लोकांची ड्युआयडीने बदनामी करायची, राजकीय विचारांसाठी विकृत पोस्टी करणे हा विकृतीचा कळस आहे. अशा धोकादायक लोकांपासून दूर राहीलेले बरे.

विषयाशी संबंधित
अफजलखान भारतीयच आहे. परप्रांतीय म्हणून कबर काढली कि मुसलमान म्हणून ?
function at() { [native code] }इक्रमणाचा मुद्दा असेल तर अनेक लेण्यांच्या बाहेर देवळे आहेत.
हरियाणा मधे एका गावात सदाशिवभाऊंची कबर आहे. ती नाथपंथीय लोक सांभाळतात. तिथे जत्रा भरते. अशाच प्रकारे समशेर बहाद्दरची कबर पण जपण्यात आली आहे. महाराष्ट्रात गेली अडीचशे वर्षे ठाऊक नाही.
कबर बांधण्याचे आदेश खुद्द् महाराजांनी दिले. तिची देखभाल करण्यासाठी एका कुटुंबाला वतन दिले आणि वेतनही दिले आहे. त्यामुळे कबर व आजूबाजूच्या परीसरावर त्यांचा हक्क आहे.

रोजच्या संबंधित लोकांची ड्युआयडीने बदनामी करायची, राजकीय विचारांसाठी विकृत पोस्टी करणे हा विकृतीचा कळस आहे
Look who is talking Wink
शाकाहारी पिशूच्या मनोरंजनाने आम्ही खुश आहोत. बोल तुला काय पाहिजे?

एकदा आणि शेवटचं सांगतो श्री किरण चव्हाण, मी मायबोलीवर कधीच डु आयडी घेऊन वावरलो नाहीये. बाकी जे काही तुम्ही चालवलं आहे त्यावरुन तुमची मानसिक अवस्था समजुन येते आहे त्याचा लवकर इलाज करुन घ्या असे सुचवेन. ह्यापुढे तुमच्या कुठल्याही प्रश्नाला/आरोपांना उत्तर देण्यात मला स्वारस्य नाही. लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा!!!

अफझलखान नवसाला पावायचा म्हणे. त्याचे हिंदू भाविकच जास्त होते म्हणे.
अतिक्रमण हटवले ते चांगलेच झाले. पूर्वी हा भाग दाट जंगलाचा होता.

अरे त्याने त्याच्या ६० राण्यांना ठार मारले होते. एका ज्योतिषाने सांगितले म्हणून. च्यायला इकडे काही विशिष्ट समाजात लग्नाला मुली मिळत नाही आणि ह्यांना ६० राण्या. आणि वर मारून टाकतात.

जिजाऊ मा साहेब ह्यांच्या आदेशाने छत्रपती नी अफजल खान ची कबर बांधली आहे.
शत्रू असला तरी तो वीर होता त्याची प्रतिष्ठा त्या मुळे राखली आहे.
ती तिथेच असावी.
अतिक्रमण होवू नये ,किंवा अफजल खान ल देवत्व देण्याचा कोणी स्वार्थी हेतू साधू नये इतकीच काळजी सरकार नी घ्यावी.
वीरांचा सन्मान तर झालाच पाहिजे.
मग तो शत्रू असेल तरी.
पण पाठीवर वार करणारे,हरामखोर ह्यांचा बिलकुल सन्मान नको.

अतिक्रमण होवू नये ,किंवा अफजल खान ल देवत्व देण्याचा कोणी स्वार्थी हेतू साधू नये इतकीच काळजी सरकार नी घ्यावी.>>>
सहमत