सावरकरांनी अनेक नवे शब्द मराठीला दिले.
त्या सर्वांची "अधिकृत" यादी आणि ते सर्व शब्द सावरकरांनी कोणत्या लिखाणातुन ( वर्तमानपत्र / पुस्तक ई.) जगासमोर मांडले त्यांचे अधिकृत स्त्रोत / संदर्भ मिळु शकतील काय?
मोघम संदर्भ नको. एखादे छापील पुस्तक / लेख / वर्तमानपत्र ई. प्रकारचे काही असेल तर चांगले.
आगाऊ धन्यवाद.
या वर्षी अंबेजोगाई ला जायचा योग आला.योगेश्वरी देवी कुलदेवता असल्याने तसे अधे मध्ये जाऊन येतो.लातूर एक्सप्रेस झाल्याने आता जाणे सोपे झाले आहे. पूर्वी सारखे औरंगाबाद हून बस ने वेग्रे जावे लागत नाही. लातूर ला उतरून एक गाडी केलेली होती.आमच्याच गाडीला अमित देशमुख असल्याने , सिंघम स्तैल मध्ये आधी त्याच्या २०-२५ गाड्यांचा ताफा धुरळा उडवत निघून गेला. मग इतर लोकांच्या गाड्या निघाल्या
सकाळचे लातूर स्टेशन
उद्या ८ मार्च. उद्या आहे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’. उद्या आहे शुभेच्छांची देवाणघेवाण. उद्या आहे समस्यांची आकडेवारी आणि चिंता. उद्या काही भाषणं, काही लेख, आणि थोडे सुस्कारे. उद्या प्रगतीची काही उदाहरणं वाचून जागा होणारा आशावाद. उद्या रेडिओ, वर्तमानपत्रं, टीव्ही इकडं सगळीकडं झळकणारं अभिवादन, अभिनंदन आणि कौतुक. ‘महिलांसाठी अमुक इतका डिस्काउंट’ असा बाजाराचा गोंगाट. उद्या महिला मेळावे, ठेवणीतले कपडे घालून आलेल्या स्त्रियांचे एकत्र जेवणाचे कार्यक्रम. उद्या थोडं हसू, काही उद्विग्नता..
सुरूवातीला 'निळावंती' विषयी ऐकलं तेव्हा विश्वासच बसला नाही. (अजूनही नाही विश्वास यावर) जुण्या जाणत्या माणसांना विचारालं पण खात्रीशीर माहिती मिळाली नाही.
परंतु अंगची संशोधकवृत्ती गप्प बसू देईना. भेटेल त्याला मी त्या पुस्तकाविषयी विचारायचो. गुगल बाबालाही विचारलं. त्यानुसार 'निळावंती' हा एक प्राचीन ग्रंथ आहे. त्याच्या वाचकाला पशु-पक्षांची भाषा समजते व ते त्याला गुप्तधनाची माहिती देतात.
प्रत्येक प्राचीन गोष्टीला असते तशी काळी किनार या ग्रंथालाही आहे. असं म्हणतात की, ही विद्या जो कोणी मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याला एकतर यशप्राप्ती होते नाहीतर वैकुंठप्राप्ती होते.
चालू घडामोडींपासून प्रेरणा घेऊन सुरेश भटांच्या 'दु:ख माझे' ही कविता माझ्यासाठी आणि माझ्यासारख्याच अन्य काहींसाठी थोडी बदलून
ट्रोल माझा
माझियामागे असू दे !
तो बिचारा एकटा जाईल कोठे?
मी असोनी का अनाथासारखे त्याने फिरावे?
माझियावाचून** त्याला
आसरा आहे कुणाचा?
जन्मला* तेव्हापुनी
श्वानापरी
माझ्याच मागे राहिला तो!
ट्रोल माझा
माझियामागे असू दे!
आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. परंपरेनुसार या अधिवेशनाची सुरुवात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली आहे. अभिभाषणाची ही परंपरा सुरू होऊन यंदा ९५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या परंपरेवर आधारित माझा एक लेख आजच्या दै. दिव्य मराठीत (पान क्र. ७) प्रकाशित झाला आहे. त्याची लिंक खाली देत आहे. तसेच सोयीकरिता लेखातील काही भाग सोबत दिलेला आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/23022016/0/1/
---000---
आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. परंपरेनुसार या अधिवेशनाची सुरुवात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली आहे. अभिभाषणाची ही परंपरा सुरू होऊन यंदा ९५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या परंपरेवर आधारित माझा एक लेख आजच्या दै. दिव्य मराठीत (पान क्र. ७) प्रकाशित झाला आहे. त्याची लिंक खाली देत आहे. तसेच सोयीकरिता लेखातील काही भाग सोबत दिलेला आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/23022016/0/1/
---000---
गजानन मेहेंदळे यांचे संशोधन आणि पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता' हे पुस्तक
.
या आठवड्यातील एका फुसके बारमध्ये मी इतिहासाचे अभ्यासक गजानन मेहेंदळे यांच्या एका व्हिडियोचा संदर्भ दिला होता. त्याचा प्रतिवाद कोणी केलेला आहे का हे विचारले होते. शिवाजीराजांना आताच्या संदर्भातल्या व्याख्येप्रमाणे सर्वधर्मसमभावी ठरवले जाते हाही इतिहास खोट्या व चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा काही जणांचा प्रयत्न असतो त्याचाच भाग आहे.
आताच्या शिवजयंतीच्या निमित्तानेही नेहमीप्रमाणे शिवाजीच्या सैन्यात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम सैनिक व सरदार होते असे ऐकण्या-वाचण्यात आले.
ज्या माबोकरांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत किंवा छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्या सदस्यांच्या माबोवावरातुन तुमच्या मनात त्यांच्या व्यक्तीमत्वाची तयार झालेली प्रतिमा साकारायची आहे.
कोणाचाही अपमान करु नका आणि आपल्याबद्दल (सामाजीक संकेत पाळुन) लिहिले असेल तर अपमान वाटून घेऊ नका!
सभ्य शब्दांची मर्यादा पाळा आणि उगाच कोणत्याही उल्लेखामुळे जाती, धर्माची भावना दुखावुन घेऊ नका.
प्रेरणा - लिंक पहिल्या प्रतिसादात दिली आहे.
हे पुस्तक बरेच महिने टेबलवर पडून होतं पण काही केल्या वाचायला मुहूर्त लागत नव्हता याचं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं. कारण पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चरित्रनायिकेचं नाव स्पष्ट लिहिलं आहे आणि तिचं प्रकाशचित्रही आहे. या राजबंदिनीच्या आयुष्याबद्दल फार सविस्तर माहिती मला नसली तरी एकंदर तिचं आयुष्य संघर्षाचं आहे हे माहिती होतं. पण नुकतंच वाचलेल्या ‘मीना’चे ठसे अद्याप ताजे होते, तोवर आणखी एक तसंचं संघर्षमय आयुष्य वाचायची मनाची तयारी होत नव्हती आणि त्यामुळे पुस्तक माझी वाट पहात होतं.