भरलेली सभा!
मान्यवर आसनस्थ होते.
द्रोणाचार्य उठले तेव्हा सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती. स्पर्धा काय असेल, यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
"ही स्पर्धा समजा अथवा गुरु आज्ञा, पण माझ्यासाठी ही गुरुदक्षिणा असेल!" मुठीत धरून सगळे ऐकत होते.... "तुम्हाला पांचाल नरेश द्रुपद राजाला हरवून त्याला बंदी बनवायचे आहे."
दुर्योधनच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. 'राजाला हरवायचे आहे? .....आणि हे पांडव स्पर्धा जिंकतील ? हे पाच जण?' त्याला हसू आले. 'ही गुरुदक्षिणा तर आम्हीच देणार तुम्हाला, गुरु द्रोण! १०० कौरव आणि हस्तिनापुरच्या सैन्यापुढे कोणीही टिकू शकत नाही!'
"प्रणाम द्रोणाचार्य."
"प्रणाम. काय झाले कृपाचार्य? तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात अजूनही?"
"तुम्ही पाहिलेत ना काय झाले ते."
"हो. पण तुम्ही का चिंतेत आहात?"
"का नसेन, द्रोणाचार्य?"
"कारण तुम्हाला वाटलेली भिती सत्यात उतरली नाही."
"म्हणजे?"
"दुर्योधन स्पर्धेत विजयी झाला नाही, कुलगुरु. तुम्ही तर आनंदी असायला हवे. चिंतीत नाही." द्रोणाचार्य हसत म्हणाले.
भेटली पुन्हा ती वृध्दापकाळी
एके दिवशी बागेमध्ये
दुरूनच ती न्याहाळत होती
लगडलेली हिरवी केळी
मी रममाण नामस्मरणी
बैसलों टेकूनी बाकाला
अंतःपुरातून इशारा येता
डावा डोळा फडफडला
तिने माळलेला मोगरा मजला
बरेच काही सांगुनी गेला
गत आठवणींचे बाष्प जमुनी
चष्मा थोडा ओला झाला
काचा झाल्या धूसर धूसर
नाद लागले खुळचट
विस्मरण ते हरीनामाचे
देठ पुन्हा तो हिरवट
वायपर लावूनी साफ केली
आठवण सारी काचेवरची
हात लावूनी पुन्हा परखली
खाली लिंबू अन मिरची
"आवाज अनोळखी आहे हा विदुर. कोण आहे तो वीर जो द्वंद्व करण्यास आव्हान देऊ इच्छितो.... ते ही अर्जुनाला?" धृतराष्ट्राच्या अंधारलेल्या नेत्रांपुढे एक आशेचा किरण जागृत होत होता..... 'एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने अर्जुनाला हरवलं की ही स्पर्धा बाद ठरवून वेगळ्या स्पर्धेचे आयोजन ! मग दुर्योधनच्या राज्याभिषेकात अडथळा नाही.' धृतराष्ट्राला त्या वीराबद्दल उत्सुकता लागून होती.
"जितका तुम्हाला आवाज अनोळखी आहे, तितकाच अपरिचित आहे तो तरुण मला, महाराज."
"मला सांग विदुर, कसा दिसतो तो?"
"अलौकिक! सुवर्ण घातले आहे त्याने, महाराज कानांत.....आणि अंगावरचा पोषाखही पूर्ण सुवर्ण आहे."
आकाश महालात सुर्यमहाराजांचे गमन-आगमन होत राहिले. ना दुर्योधन बदलला, ना भीम आणि दुर्योधनाचे वैर. होणाऱ्या भांडणात मध्ये पडून न्यायाचे अमृत ओतत दोघांना शांत करण्याचे काम नित्यनियमाने करणारा युधिष्ठिरही बदलला नाही, आणि काहीही झालं की भीष्माचार्यांच्या कुशीत शिरणारा अर्जुनही नाही.....
ते ना महालात बदलले ना गुरुकुलात!
१५ ऑगस्ट १९७७.
बिग इअर रेडिओ दुर्बीनीच्या व परग्रहवासीय शोधमोहीमेच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस. ओहियो स्टेट युनिवर्सिटीमधे ही बिग इअर दुर्बीन १९६३ ते १९९८ या काळात कार्यरत होती. कोलंबस, ओहियो, अमेरीका इथे पर्किन्स ऑब्झरवेटरीच्या प्रांगणात असलेल्या या दुर्बीनिचे मुख्य काम परग्रहवासीयांकडुन आलेल्या रेडिओ संदेशांवर लक्ष ठेवणे असे होते. १५ ऑगस्ट १९७७ या दिवशी ०२:१६ UTC वाजता बिग इअर रेडिओ दुर्बीनिला एक नेहमीपेक्षा वेगळा रेडिओ सिग्नल मिळाला.
भीमाला शुद्ध आली तेव्हा तो नागलोकी होता. तेही सैनिकांच्या पहाऱ्यात.
"महाराज, हा आम्हाला सापडला तेव्हा मृच्छीत होता. गुप्तचर वगैरे असेल म्हणून याला रक्षक नागांनी दंश केला तर हा शुद्धीत आला."
"दंश केल्यावर शुद्धीत आला?"
"हो, महाराज."
"याचा अर्थ त्याने आधीच विष प्राशन केले होते."
"नाही, मी तर खीर खाल्ली होती." भीम म्हणाला.
'चेहऱ्यावरचे तेज पाहून तो कुणी सामान्य तर वाटत नाही.' नाग महाराजांनी भीमला विचारलं, "कोण आहेस तू?"
"मी कुंतीपुत्र भीम. भीष्माचार्यांचा पौत्र."
"कुंती? हस्तिनापुरातून आला आहेस?"
"हो."
स्वार्थापायी त्यांनी देशाचे केले तुकडे
नशिबी भूमातेच्या लिहिले केवळ दुखडे
मानाचा तो भगवा.... नि हक्काची भूमाता
आसिंधू अखंड आमुचा, आरक्त जाहला होता
काळ्या मातीच्या पायी लाली रक्ताची होती....
ते दृष्य शवांचे होते, ती जमीन केशरी होती....
ना धीर सोडला आम्ही, ना त्यांनी केली पर्वा
कष्ट उपसले कोणी, कोणाची झाली चर्चा!
मातीत रुजवला त्यांनी पुन्हा नव्याने मत्सर
पानोपानी लिहिले असत्य अधर्मी अक्षर!
ना रंग आता तो आहे, ना गंध तिथे मातीला!
नापाक अधर्मी हेतू नि कपट असे साथीला
"महामहीम, एक दु:खद वार्ता आहे...."
"बोल."
"वनातून संदेश आला आहे."
काहीतरी अघटित घडलेले असल्याचा अंदाज आला आणि भीष्माचार्य आसनावर रोवून बसले. आणि दासाकडे पाहू लागले.
"पंडुंचे देहावसान झाले."
"पंडु....." जोरात किंचाळून शेजारी उभी असलेली अंबालिका कोसळली.