भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील तीन धगधगती स्फुल्लिंगे - भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव.
इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध त्यांचा लढा आणि त्यांचे प्राणार्पण त्यांना अजरामर करुन गेले आहे.
त्यांना मिळालेली शिक्षा ऐकून सगळा भारत पेटून उठला होता त्यावेऴी. ज्या लाहोर शहरात (कोट लखपत तुरुगांत) ते कैद होते, तिथे तर उठावाची चिन्हे दिसत होती. आणि त्या धास्तीनेच एक दिवस आधीच त्यांना फाशी देण्यात आली. कुटुंबियांनाही याची कल्पना दिली नव्हती. आपल्याला सांगण्यात आले की रात्रीच्या अंधारात एका नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सध्याच्या दिवसांत Epidemic Diseases Act, 1897. याचा उल्लेख वारंवार होतो आहे. कोरोना महामारी च्या पार्श्वभू मीवर सरकारने हा कायदा पुन्हा एकदा लागू केला आहे.
हा कायदा ब्रिटिश सरकारने १८९७ साली प्लेगच्या नियंत्रणार्थ आणला होता.
या प्लेगच्या पाऊलखुणा मराठी इतिहास-साहित्य-कलाविश्वात उमटलेल्या दिसतात. सर्वांत आधी आठवतो तो २२ जून १८९७ हा चित्रपट.
©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
संपूर्ण कथा - https://www.maayboli.com/node/74130
महान पुरुषांना आपला मृत्यू आधीच कळतो असं म्हणतात. `महान` हा शब्द लोकांच्या भल्यासाठी आपले आयुष्य वेचलेल्या व्यक्तींसाठी आपण वापरतो. तशा अर्थाने हिटलरला महान निश्चितच म्हणता येणार नाही. पण त्याचं संपूर्ण जीवन जर आपण पाहिलं तर ते एका असामान्य माणसाचं होतं हे कोणीही मान्य करेल. तर अशा या असामान्य हिटलरनं आपल्या बोलण्यातून, लिखाणातून आणि भाषणांतून अनेकदा त्याला आयुष्य फारच कमी असल्याचं सांगितलं होतं. १९२८च्या दरम्यान तो एकदा म्हणाला होता की आत्ता मी ३९ वर्षांचा आहे. आणखी वीस वर्षेच मी जगणार आहे.
बिन चेहेऱ्याचा शत्रू - स्पॅनिश फ्ल्यू- १९१८
सुरा हे वाळवंटातल्या गोड्या पाण्याच्या झऱ्याकाठी ऐसपैस पहुडलेलं एक सुखवस्तू गाव होतं. गावात मोजकेच लोक असले, तरी ते सगळे गुण्यागोविंदाने राहात होते. गावात कोणीही एकमेकांशी भांडण करणं, मारामार्या करणं असले प्रकार करत नसत. दार आठवड्याला शुक्रवारी जिरगा ( पंचायत ) जमवून सगळ्या तक्रारींचा निवाडा व्हायचा आणि दोन्ही बाजू ऐकून मौलवी, पंच आणि गावातले ज्येष्ठ हे सगळं कामकाज चालवायचे.
माझ्या UAE मधल्या १०-१२ वर्षांच्या प्रवासात मी अनेक लोकांना भेटलो आणि त्यांच्याशी अनेक विषयांवर बोललो.काही अनुभव अतिशय वाईट होते , पण 'जे जे उत्तम उदात्त उज्ज्वल ' ते ते घेऊन अनुभवाची शिदोरी अधिकाधिक समृद्ध करणं या एकाच ध्येयाने मी आजवर पुढे जात आलो आहे.
लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी
निर्व्यसनी असाल तर नको नको ती सवय लावून घ्यावी
कधी तंबाखू चोळावा निवांत तर कधी दारू ढोसावी
जर सर्व ठीक आले ,, तरच बायको करावी
अन्यथा बोहल्यावर चढू नये
चढल्यावर तोंडावर पडू नये
यातून अखेरपर्यंत सुटका नाही
हेच सत्य मानून , खालील पध्द्त अवलंबावी
व्यसनांनुसार टाकावा एकेक थेम्ब लाळेचा
हातातल्या लिटमस कागदावरी
बघावे सामूचे मोजमाप नीट
बायको येण्यापूर्वी घरी
जर सामू आला सात
खुशाल आपली काढावी वरात
जर त्यामध्ये असेल चढउतार
नवीन दशक चालू होण्याच्या उंबरठयावर जे अनेक बदल आपण पाहतो आहोत त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे गेल्या दशकातील तंत्रज्ञानाने उत्तम सेवा( Excellent Customer Service ) देणारी संसाधने( Resources ) हाती दिल्यानंतर माणसाचा प्रवास हा ते वापरून आपले जीवन समृद्ध करण्याकडे चाललेला दिसतो। त्यातील परवालीचा शब्द म्हणजे जीवनाभुव ( Life Experiences ).