नंदघरी राहायला यशोदेने रोहिणीला बोलावून घेतले तेव्हापासून नंदाचे घर बलराम आणि कृष्णाच्या किलबिलाटाने भरून गेले होते.
कृष्णाच्या दैवी चमत्काराच्या कैक वार्ता हवेच्या लहरींसोबत सर्वत्र पसरत होत्या. त्याच्या निळ्या रुपाची आणि विशाल काळभोर नेत्रांची भूल पडणार नाही अशी एक गोपिका गोकुळी मिळाली तर नवल!
पेटता पेटता विझलो कधी
माझे मलाच कळले नाही
दिला होता शब्द खरा
पण काय ते नीट आठवलेच नाही
या स्मृतीला कोण जाणे
कुणाचा विखारी दंश झाला
जो तो ओळखीचा असूनही
इथे मलाच परका झाला
कोणता हात धरू मी ?
कोणता सोडून देऊ ?
या हातांच्या विळख्यातच
माझा नक्की कोणता ? तोच कळेनासा झाला
समजत होतो धुरंधर स्वतःला
पण या हळव्या हृदयाने घात केला
मेंदूने बरेच समजावून पहिले त्यास
पण हळूहळू तोही त्या हृदयात गेला
इथेच घेतली समाधी मनाने
इथेच माझा अंत झाला
हाच तो विखारी दंश होता
दुर्दैव आणि शाप एकाच घराण्याला गिळंकृत करू पाहत होते. एकीकडे कुंती वनवास भोगत होती आणि दुसरीकडे तिचा चुलत भ्राता वसूदेव, कारावास ! माता पित्यांपासून दूर देवकीनंदन कृष्ण गोकुळात वाढत होता आणि त्याचा आत्मबंधु युधिष्ठिर आणि सोबत वायुपुत्र भीम राजमहालापासून दूर वनातल्या कुटीत.
कुंतीने मंत्रशक्तीने इंद्राला पाचारण केले.
काळंभोर ढगांची गर्दी झाली आणि शुभ्र विजेचा झोत येत तेजस्वी रुप समोर आले.
"प्रणाम इंद्रदेव!"
"कुंती, कश्या पुत्राची अपेक्षा आहे तुला?"
कंसाने आकाशाकडे बघत हातातला सोमरसाचा प्याला नाचवला.
"बोल.... बोल आता.... तुझा मृत्यू जन्म घेतोय म्हणून....." जोरजोरात हसला , " या स्वतःच्या हाताने मृत्यूलाच मृत्यु देणारा एकमेव आहे हा कंस! सातही पुत्र यमसदनी धाडलेत मी. आणि आता आठव्यासाठी प्रतीक्षा कर."
"महाराज, एक प्रश्न आहे...."
"राजमंत्री.... काय विचारायचं आहे? आणि कोणाला ? याला?" कंसाने आभाळाकडे बोट दाखवत विचारलं.
"नाही महाराज... तुम्हाला."
"मग ठिक आहे. कारण तो प्रश्नांची उत्तरं नसतो देत."
कंसाला नशा चढली होती.
"महाराज, आठव्या पुत्रापासून भिती होती. मग आधीचे पुत्र का....?"
देवकीने कंसाच्या पायाला जड बेड्यांनी सुजलेल्या हातांचा विळखा घातला.
"भ्राताश्री.....हा सातवा पुत्र आहे, भ्राताश्री. सातवा आहे. आठवा नाही."
कंसने चिडून पाय झटकला. रडणाऱ्या नवजात बालकाला घेऊन निघून गेला.
'गेलास? घेऊन गेलास शेवटचा उरलेला आशेचा किरण सुद्धा?
"महाराज, दास वार्ता घेऊन आला आहे."
"अनुमती आहे."
"महाराजांचा विजय असो. महाराज, तुमच्या अनुज पंडुंना द्वितीय पुत्र प्राप्त झाल्याची आनंदवार्ता आहे. ऐकण्यात आले आहे की वायुदेवांचा वरदहस्त आहे युवराजांच्या माथी."
'युवराज? आत्तापासून पंडुपुत्राने राजगादीवर अधिकार जमवायला सुरवात केली?' धृतराष्ट्राच्या मनात तिडिक गेली.
हस्तिनापुरात आनंदाचे ढोल, नगारे वाजत होते. आपल्या अनूजाला पुत्र होणार ही वार्ता कळल्यावर धृतराष्ट्राने मिष्टान्न वाटले. सर्व नगरीत अन्न-वस्त्र वाटून भीष्मांनी पंडुकडेही मिष्टान्न पाठवले.
"प्रणाम महाराज !"
"शकुनी.... बोल."
"महाराज, तुम्ही काय करताय हे?"
"काय करताय म्हणजे? स्वागत करतोय! राजपरिवाराच्या नव्या सदस्याचे! आनंद साजरा करतोय मी शकुनी!"
"पण कसला आनंद महाराज?"
"अरे तू ऐकलं नाहीस? पंडुला पुत्रप्राप्ती....."
"ते ऐकलं महाराज. म्हणूनच आश्चर्य वाटते आहे तुमच्या वागण्याचे!"
"पण का? त्यात आश्चर्य वाटण्यासारखे आहे तरी काय?"
"कुंती, माद्री, ऐकलंत का?" हातातली रवी तशीच सोडून कुंती बाहेर आली.
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
भाग २१
पंडु वनवासाला कंटाळून परतेल अशी अपेक्षा करत भीष्म आणि विदुर त्याची वाट पाहत होते. पंडुची नाजूक तब्येत वैद्यांच्या देखरेखीशिवाय कशी नीट राहिल, हा प्रश्नही त्यांना सतावत होता. दासाने दिलेल्या वार्ता ऐकून पंडु परतण्याची शक्यता आता धुसर झाली होती. शेती करत पंडु वनातच रमल्याचे चित्र ही घोर निराशा होती.