इतिहास
चपाती आंदोलनाचे गूढ
आपल्या दररोजच्या जेवणात असलेली "चपाती / पोळी / रोटी" चा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता का?
"चपाती आंदोलन" म्हणून ओळखली गेलेली हि चळवळ खरंच स्वातंत्र्य लढ्याचा भाग होती का?
१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा चपाती आंदोलन होती का?
आणि जर असेल तर हे आंदोलन एव्हढे दुर्लक्षित का राहिले?
२३ व्या शतकातील हिंदू धर्म
इसवी सन २२५० साली धर्म आणि हिंदू धर्माचे स्वरूप आणि मानवी जीवनातील स्थान काय असेल याबाबत काही विचार मनात आले.... त्याबद्दल आपली मते अपेक्षित आहेत...
१. ह्युंमनोईड रोबोट आणि मानव यांचे संबंध आणि याबाबत तत्कालीन धर्माचे काय मत असेल?
२. अस्ट्रॉइड बेल्ट आणि मंगळ इत्यादी ग्रहावरील वसाहतीतील लोकं कोणता धर्म पाळत असतील व त्यांच्या आयष्यात धर्माचे काही स्थान असेल का व असल्यास काय?
३. मानवी लैंगिक संबंध आणि प्रजोत्पादन याबाबत तत्कालीन धर्म नियम काय असतील? कारण बहुधा सर्व प्रजोत्पादन यांत्रिक असणार...
असे अनेक प्रश्न मनात आले... आपणास काय वाटते???
इंद्राबद्दल पक्षपात का?
इंद्राबद्दल पक्षपात का?
मला नेहमी इंद्राबद्दल देवांच्या पक्षपाताबद्दल आश्चर्य वाटते. इंद्र आणि रावण यांची तुलना करूया.
इंद्राला सद्गुणी आणि पवित्र व्यक्ती मानण्यात आले. रावनला खलनायक म्हणून गणले गेले. पण नेमकी वस्तुस्थिती काय आहे..
रावण हा ब्रम्हादेवाचा पणतू , पुलस्य ऋषीचा नातू आणि वैश्वानर ऋषीचा मुलगा होता. अशा प्रकारे रावण ब्राह्मण होता आणि उच्च जातीत जन्मला आला होता. इंद्र हा नियुक्त व्यक्ती होता आणि त्याचा पूर्वजांविषयी निश्चिती नाही.
वाचावे ते नवलंच - 'अमीश' जीवनपद्धती! (पूर्वार्ध)
केशर : गाथा आणि दंतकथा - ४ (मोरोक्को)
The Wise Woman of the Atlas ह्या मोरोक्कन दंतकथेचे मराठीत शब्दांकनः
खूप वर्षांपूर्वी मोरोक्को मधल्या अॅटलास पर्वतरांगेतल्या एका लहानशा खेड्यात गावकुसा बाहेर 'आयेशा' नावाची एक वृद्ध महिला रहात होती. औषधी वनस्पती आणि जडीबुटींच्या ज्ञानासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या आयेशाकडे निसर्गोपचार घेण्यासाठी दूरदूरहून रुग्ण येत असत.
खऱ्या अज्ञातवासीची कथा - भाग २
हा भाग टाकण्यासाठी मी पीक टाकणार होतो, पण खूप लोकांनी सल्ला दिला, की खूप डार्क लिहिलंय,.डोन्ट ओपन अप सो मच. म्हणून नाही टाकला.
कुणालाही curiousity असेल, तर संपर्कातून मेसेज करा. मी पर्सनली सेंड करेन.
३० ऑक्टोबर २०२४.
पाकिस्तान -१४
मुक्तिवाहिनीचा ध्वज
युद्धामुळे जनतेला नुकसान झाले असले तरी, कुणीतरी फायद्यात होते.
पाकिस्तानाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता तीन गोष्टी घडल्या.
पहिली म्हणजे, अयूब खानचे सैनिकी सरकार युद्धातील अपयशानंतर ढळले. याचा अर्थ होता, लोकशाहीचे पुनरुत्थान. दुसरी म्हणजे, पूर्वी पाकिस्तानने आपल्या वेगळ्या होण्याचा निश्चय केला. त्यांना वाटले की पश्चिमी पाकिस्तानमध्ये जास्त शक्ती नाही. तिसरी म्हणजे, पाकिस्तानने अमेरिकेकडे पाठ फिरवून चीन आणि सोवियत संघाकडे बाजू वळवायला सुरुवात केली.
पाकिस्तान -१३
इतिहासाच्या अभ्यासकांची किंवा विद्यार्थ्यांची भूमिका नेहमी खेळातल्या पंचाप्रमाणे असावी. जेव्हा पंच मैदानात असतात, तेव्हा आपल्या देशाच्या खेळाडूने षटकार मारला तरी ते आनंद व्यक्त करत नाहीत आणि आउट झाल्यावर दु:खही व्यक्त करत नाहीत.
तरीही, जेव्हा सामना भारत-पाकिस्तान दरम्यान असतो, तेव्हा दोन्ही देशांचे पंचही तटस्थ राहू शकत नाहीत. बिशन सिंह बेदी आपल्या संघाला पाकिस्तानमधून परत घेऊन आले होते कारण पाकिस्तानी पंच अन्याय करत होते. तसेच, भारतीय पंच दारा धोतीवाला भारताच्या बाजूने कायम उभे दिसले.
त्या तृणांच्या माळरानी
डोळ्यासमोर नजर जाईल तिथपर्यंत विस्तीर्ण माळरान, सोनेरी पिवळ्या गवताने आच्छादलेले! साधारण हजारेक एकराचा त्याचा पसारा. त्याच्या ज्या कडेला मी उभी आहे. तिथून माळरान संपून उत्तरेकडे शेताडी सुरू होते. ती थेट वायव्येकडून आग्नेयेकडे पसरलेल्या पुणे सोलापूर महामार्गापर्यंत. या सगळ्यातून तिरकी काट मारून एक छोटासा ओढा वाहतो त्याचा आता रस्त्यापल्याडच्या शिवारांत फारसा माग लागत नाही. पण लागला तरी पुढे उत्तरेकडे लगेचच असलेल्या भीमेच्या काठापर्यंतच त्याची धाव असणार हे स्पष्ट आहे. पश्चिम दख्खनमध्ये अनेक ठिकाणी अगदी सर्रास आढळणार्या भौगोलिक परिसर-तुकड्यांमधलाच हा एक. गावातले लोक याला बामणथळ म्हणतात.
Pages
