मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
इतिहास
पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग २ )
पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ )
मौजे केर्ले-मार्गशीर्ष महिन्यातील एक निवांत दुपार. रब्बीची पेरणी होउन गाव तस निवांत झाले होते.गावकर्यांशी हवापाण्याच्या गप्पागोष्टी उरकून गावचा पाटील पारावर निवांत पसरला होता. डोक्याशी कुर्हाड ठेवून तो निवांत पारावर पसरला होता. भल्या पहाटे थंडीचे श्रम केल्याने त्याचा डोळा लागला इतक्यात गावच्या वेशीतून पोरेटोरे गलका करत चावडीकडे पळत आली. पोरांच्या दंग्याने जागा झालेला पाटील खेकसलाच,"काय कालवा लावला रे?". पोरं घाईघाईने बोलु लागली.पळाल्यामुळे धापा टाकता टाकता त्यांनी सांगितले कि उगवतीकडून एक फौज येत आहे.
फौज ?
बिथोवन/मोझार्ट-(४)
बिथोवन(आणि मोझार्ट-३)
बिथोवन(आणि मोझार्ट-३)
सहा वर्षाचा असताना मोझार्टने केलेला तो कार्यक्रम अभूतपूर्व ठरला होता. लोकांनी असे कौतुक केले की एका रात्रीत मोझार्टचे नाव युरोपभर पसरले. त्यानंतर मोझार्टची कीर्ती अशी पसरली की त्याला चमत्कार असेच लोकांनी म्हंटले. हा कार्यक्रम झाल्यावर त्याला व्हिएन्ना, मग प्राग, पॅरिस, लंडन, म्युनिक, फ्रँकफर्ट, झुरीक आणि रोम इथे बोलावले गेले आणि तो आणि नॅनल आपल्या वडिलांबरोबर सांगीतिक दौरा करू लागले.
The Great Game -१
(हा ग्रेट गेम पुस्तकाचा परिचय़ आहे. परिचय करुन देताना प्रत्यक्षात ग्रेट गेम म्हणजे नक्की काय होते तेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा शंभराहून अधिक वर्षाचा इतिहास आहे म्हणूनच दोन भागात हा पुस्तक परिचय देत आहे.)
पुस्तक : The Great Game
लेखक : Peter Hopkirk
आख्यायिकांच्या गदारोळात तानसेन
लहानपणी माझी अशी समजूत होती की 'केतकी गुलाब जुहि' हे गाणं तानसेन आणि बैजू बावरा यांच्यामधील जुगलबंदी आहे. त्यात जो गायक "जिंकतो" असं दाखवलं आहे, त्याला मन्ना डेचा आवाज आहे आणि हरणारा आवाज भीमसेन जोशींचा, तेही शास्त्रीय मैफिलीत! व्हिडिओमध्ये ज्या क्षणाला तो नट खजील होऊन हार मान्य असल्याचा आविर्भाव आणतो, तिथे खरं तर भीमसेन जोशी वरचढ वाटत होते, आणि ह्याला अचानक खजील व्हायला काय झालं कळत नाही. अनेक वर्षांनंतर ते गाणं बसंत-बहार चित्रपटामधील असून त्यात तानसेन नाहीच हे कळल्यावर मी खजील झालो होतो.
रंग रंग तू, रंगिलासी
रंग रंग तू, रंगिलासी
दंग दंग तू, दंगलासी
भंग भंग तू, भंगलासी
वेड्यापिश्या रे जिवा
जाशी उगा जीवाशी
अव्यक्त बोल रे तुझे
शब्दांचे झाले तुला ओझे
का धावीशी उगा तू रे
कुणी नाही वेड्या रे तुझे
तो सूर्य देई एकला शक्ती
समिंदराची ओहोटीभरती
आकाश झेलते तारे
मग का हवे रे , तुला सारे ?
का जन्म घेतलासी ?
हा डाव साधलासी
रंगात रंगुनिया साऱ्या
संसार मांडलासी
गती मंद होत तुझी जाईल
मग हार गळ्याशी येईल
अग्नीत दग्ध होई सारे
आला तसाच रिता जाशील
ऐक साद अंतरात्म्याची
तुम्हाला कोणाचा ड्यू आयडी व्हायला आवडेल?
तर मंडळी - तुम्हाला कोणाचा ड्यू आयडी व्हायला आवडेल आणि का असा सिम्पल सवाल आहे .
कृपया ओरिजिनल आयडी नेच प्रतिसाद द्यावेत . ड्यू आयडी ने नाही . इथे प्रतिसाद येणारे आयडी मुळ आयडी समजले जातील .
आता माझ्याबद्धल . मला बोकलत यांचा ड्यू आयडी व्हायला आवडेल . अमानवीय धाग्यावर माझीच सत्ता असेल .
ऍडमिन सर धागा विरंगुळा मध्ये आहे . थोडी गम्मत म्हणून .
कुठून आले? का आले?
सद्याचा भारत हा मूळच्या इथल्या म्हणजे भारतातले लोक तसेच भारताबाहेरुन भारतात आलेल्या लोकांपासून बनलेला देश आहे.अगदी प्राचीन काळापासून ही स्थलांतरे होतायत.भारताच्या अंतर्भागतही बरीच स्थलांतरे झालेली आहेत.दुष्काळ,महापूर,रोजगार,लढाया,इत्यादी अशी विविध कारणे या मागे आहेत.भारतीय उपखंडासंबंधीच्या अशा स्थलांतराच्या नोंदी एकेठिकाणी व्हाव्यात,माहिती संकलित व्हावी तसेच माहितीत काही त्रुटी,चुका असतील तर त्यावरही आदानप्रदान व्हावे,या स्थलांतरामागची कारणे,या स्थलांतरीतांनी नवीन प्रदेशावर टाकलेला प्रभाव इत्यादी गोष्टी समजाव्यात यासाठी हे वाहते पान सुरु करत आहे.
Pages
