शिक्षण

मुलांच्या मनातील परीक्षेची चिंता घालवण्याचे काही उपाय

Submitted by balsanskar on 4 May, 2010 - 05:17

परीक्षा म्हटली की, सर्वांच्याच पोटात गोळा येतो. दहावी किंवा बारावीत असलेल्या मुलांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही त्यांच्या परीक्षेची चिंता लागून रहाते. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवूनही चांगल्या महाविद्यालयामध्ये आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवूनही आपल्या आवडत्या विषयात विश्वविद्यालयीन पदवी मिळवण्यासाठी आणि चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे परीक्षा जसजशी जवळ येते, तसतसा प्रत्येक विद्याथ्र्याला थोडा तरी परीक्षेचा ताण अनुभवास येतो.

विषय: 

सर्व्हे रिपोर्टः विभाग- नोकरी

Submitted by संयोजक_संयुक्ता on 24 April, 2010 - 13:15

नोकरी

या भागात १० प्रश्न समाविष्ट करण्यात आले होते. त्यातला कुठलाही प्रश्न अनिवार्य नव्हता. सध्याचा पदभार, नोकरी/ करियरविषयक मतं, Work- Life Balance, पदोन्नती, नोकरी सोडण्याची कारणे, Glass Ceiling (कामाच्या ठिकाणी लिंगभेदाचा अनुभव), नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्रियांबाबत मैत्रिणींचे विचार याभोवती या सदरातील प्रश्नांचा रोख ठेवला होता.

हे वाचण्यास सुरूवात करण्यापूर्वी प्राथमिक माहिती हा धागा पूर्ण वाचावा.
कृपया या भागातील टीपा काळजीपूर्वक वाचाव्या.

  • सध्याच्या पदभाराचे नाव, विभागाचे नाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कारभार

Submitted by हिम्सकूल on 15 April, 2010 - 10:12

सहजच नेट वर भटकताना एक धक्कादायक पण तितकीच आचंबित करणारी बातमी वाचली.
http://www.esakal.com/eSakal/20100415/5257657138283589530.htm

त्या बातमीची सत्यता पडताळी साठी पुढील वेबसाईटवर भेट दिली..
http://www.bamu.net/

मराठवाडा विद्यापीठातील उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच विद्यापीठाची वेबसाईट हॅक केली आहे..
त्याचे परिणाम कसे आणि किती होतील माहिती नाही.. पण ज्यांनी साईट हॅक केली त्यांच्यावर सायबर गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई होणार की नाही? तसेच विद्यापीठतील जो कारभार त्यांनी सगळ्यांसमोर आणला आहे त्यामध्ये काही बदल घडून येतील का?

बी ए एम एस नंतर अमेरिकेतील संधी ?

Submitted by एजे on 30 March, 2010 - 12:50

बी ए एम एस नंतर अमेरिकेतील संधी काय असेल यासंदर्भात माहीती हवी आहे.
बी ए एम एस च्या बेसिस वर कुठला कोर्स वा काही स्पेशलाय्झेशन करता येइल का. जेनेकरुन त्या क्षेत्रात काम करता येईल.
जाणकारानी कृपया मार्गदर्शन करावे.

सर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत (ले० स्वामीनाथन एस० अंकलेसरिया अय्यर, टाईम्स ऑफ इंडिया)

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

“Faced with half-empty classrooms in government schools, some state governments plan to introduce English from Class 1 to win back students. That would be a serious error.” श्री० अंकलेसरिया स्वामीनाथन अय्यर यांनी भारतातील राज्यशासनांस इशारा दिला आहे.

http://amrutmanthan.wordpress.com/2010/02/10/सर्वप्रथम-मातृभाषेत-शिकण/

क०लो०अ०

प्रकार: 

बारावीनंतर....

Submitted by शैलजा on 21 January, 2010 - 10:32

बारावी, शास्त्र (Science) घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर करिअर घडवण्यासाठी भारतामध्ये कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, ह्या विषयावर इथे ठाऊक असलेली माहिती लिहायची माबोकरांना विनंती आहे. ठराविक पर्याय, जसे की मेडीकल, इंजिनिअरींग हे तर झालेच. त्यातही नवीन काही पर्याय निघाले असतील, काही माहिती असेल तर लिहावी. हे सर्व पर्याय एकत्र केलेले पुस्तक वगैरे उपलब्ध आहे का, की जेणेकरुन सर्व माहिती एकत्र स्वरुपात सापडू शकेल?

पंच्याण्णऊ पॉईंट सत्याण्णऊ

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

http://72.78.249.125/esakal/20100106/4893480797968659175.htm

मला कधीच पंच्याण्णऊ पॉईंट सत्याण्णऊ टक्के मिळाले नाहीत. पण मला कधी त्याचे वाईटही वाटले नाही! मला नेहमीच साठ, सत्तत, आंशी असे कमीच मार्क मिळाले, पण माझ्या घरच्यांना देखील कधी वाईट वाटले नाही! माझे शिक्षक तर मी खुप हुशार होतो/आहे असे म्हणतात. मी माझ्या जुन्या शाळेत गेलो कि एक माजी विद्यार्थी म्हणुन मला हुषार, अभ्यासु असे सांगुन ओळख करुन देतात अन चांगला वगैरे म्हणतात...

माझे वडिल शिक्षक्-मुख्याध्यापक-प्राचार्य होते. अन मुख्य म्हंजे आम्ही रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होतो. त्यामुळे आम्हाला परिक्षार्थी कधीच बनता आले नाही.

प्रकार: 

मंत्रिमंडळ निर्णय

Submitted by झुलेलाल on 27 November, 2009 - 12:51

मंत्रिमंडळ निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी, २५ नोव्हेंबर २००९ रोजी रात्री सह्याद्री अतिथीगृहात झाली.
या बैठकीत प्राथमिक शिक्षणाची व्याख्या स्पष्ट करणारा पुढील निर्णय झाला :

प्राथमिक शिक्षण याचा अर्थ इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंत दिले जाणारे शिक्षण असा होय. असे स्पष्ट करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यास मान्यता देण्यात आली.

शिक्षण विभाग

Submitted by चंपक on 25 November, 2009 - 20:43

दि. २५ डिसेंबर च्या मंत्रिमडळ बैठकीमध्ये:
प्राथमिक शिक्षण याचा अर्थ इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी पर्यंत दिले जाणारे शिक्षण असा होय. असे स्पष्ट करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यास मान्यता देण्यात आली.

काही मुद्दे:

१) यापुर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे अन मोफत असे धोरण ठरवलले आहे. त्यात प्रामुख्याने पहिली ते चौथी असे वर्ग गृहित धरलेले आहेत. यापुढे शाळांना अनुदान/मान्यता देताना या निर्णयाचे होणारे परिणाम लक्षात घ्यायला हवेत.

Pages

Subscribe to RSS - शिक्षण