पैल तो गे काऊ कोकताहे ।
लहानपणची गोष्ट. दारातल्या झाडावर बसलेला एखादा कावळा जोरजोरात ओरडू लागला की आई / आजी म्हणायची - आज कोणीतरी पाहुणा येणार रे ... मी विचारायचो - तुला काय माहित ? त्यावर उत्तर यायचे - हा काय कावळा ओरडतोय ना !! त्याला बरोबर ठाऊक असते कुठल्या घरी पाहुणा येणार ते.. तो बरोब्बर त्या घरापाशीच जाऊन ओरडणार मग ...
माझं बालमन आनंदून जायचं आणि पुढे काही काळ कोण बरं येणार आज पाहुणा ?? या विचारात छान मजेत जायचा ...
गणेशचतुर्थी दिवशी प्रतिष्ठापित केलेल्या मुर्तीचे ठरलेल्या दिवशी समुद्रात/ नदीत/ तळ्यात विसर्जन करणे गरजेचे असते का?
समजा धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिचे घरीच प्रतिकात्मक विसर्जन केले तर नाही चालत का? तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का?
अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि.......
मध्यंतरी एक शेर वाचनात आला -
दिलके आईनेमें है तस्वीर ए यारकी
बस, जरासी गर्दन झुकायी देख ली...
वस्तुतः उर्दू काय, हिंदी काय किंवा मराठी काय - शेरो शायरीमधले मला काहीही कळत नाही- म्हणजे त्यातल्या तांत्रिक बाबी - अलामत, काफिया, मतला वगैरे. पण एखादा शेर का भावतो तर तो थेट मनालाच स्पर्श करतो म्हणून.
आता हा वर दिलेला शेर एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी म्हणत असेल का एखादा भक्त आपल्या ह्रदयस्थ भगवंतासाठी म्हणत असेल ??
रविवारी वर्तमानपत्राबरोबर एक जाहीरात आली होती जेवण/डबे पुरवण्याची सुविधा, नाव होते " द्रौपदीची थाळी". या नावाशी जरा थबकले आणि विचारचक्र सुरू झाले.
नमस्कार मंडळी.
सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोप्प व्हाव म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)" नावाचे अॅन्ड्रॉईड अॅप तय्यार केले आहे. हे अॅप वापरण्यासाठी एकदम सोप्पे, आकर्षक, आणि सुटसुटीत असे आहे किंबहुना तसा बनवण्याच्या प्रयत्न केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे अॅप निशुल्क वापरण्यासाठी उपलब्ध आहे.
हनुमान जयंती

'हनुमान' म्हणजे बल,पराक्रम,नम्रता,बुद्धिमत्ता,सेवा यांचा आदर्श ! हनुमानाला रुद्राचा अवतार मानले जाते.तसेच मरुत किंवा वायूचा पुत्र म्हणून त्याला 'मारुती' ही म्हणतात. शक्ती,भक्ती,पराक्रम यांचा आदर्शवत अशा या दैवताची जयंती आज सर्वत्र मोठया धुमधडाक्यात साजरी होते.
राम जन्मला गं सखे राम जन्मला

मर्यादा पुरषोत्तम प्रभुरामचंद्राचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला असल्याने या तिथीला रामनवमी असे म्हटले जाते. या दिवशी कौसल्येने भगवान श्रीरामांना जन्म दिला होता. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती. असे महात्म्य आहे या दिवसाचे.
आम्हाला मुंबईहून गरुडेश्वर आणि नारेश्वर येथे जायचे आहे. त्याबद्दल माहिती हवी आहे.
नेटवर शोधल्यावर कळले की गरुडेश्वर बडोदा, भरुच आणि अंकलेश्वर या तिन्ही ठिकाणांहून गरुडेश्वर जवळजवळ ८०-१०० किमी आहे.
मुंबईवरुन रेल्वेने बडोदा, भरुच आणि अंकलेश्वर पर्यंत जाऊन तिथुन बसने जायचा प्लान आहे.
भरुच किंवा अंकलेश्वर यापैकी कोणत्या ठिकाणापासुन बस कनेक्टिविटी चांगली आहे? तिथे राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे?
गरुडेश्वर/नारेश्वर याखेरीज जवळपासची इतर कोणती स्थळे पाहता येतील का?
भक्ति तों कठिण सुळावरील पोळी....
"भक्ति" या विषयाचा आवाकाच इतका अवाढव्य आहे की त्यात नुसते डोकवायचे म्हटले तरीही ती फार फार अवघड गोष्ट आहे. आणि ही भक्ति आचरणात, अमलात आणण्याचे म्हटले तर फक्त संतमंडळीच ती करु जाणे. कारण जनसामान्यांच्या भक्तिच्या कल्पना आणि संतांना अभिप्रेत असलेली भक्ति यात जमीन-अस्मानाइतका फरक आहे.