राम जन्मला गं सखे राम जन्मला
मर्यादा पुरषोत्तम प्रभुरामचंद्राचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला असल्याने या तिथीला रामनवमी असे म्हटले जाते. या दिवशी कौसल्येने भगवान श्रीरामांना जन्म दिला होता. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती. असे महात्म्य आहे या दिवसाचे.
आम्हाला मुंबईहून गरुडेश्वर आणि नारेश्वर येथे जायचे आहे. त्याबद्दल माहिती हवी आहे.
नेटवर शोधल्यावर कळले की गरुडेश्वर बडोदा, भरुच आणि अंकलेश्वर या तिन्ही ठिकाणांहून गरुडेश्वर जवळजवळ ८०-१०० किमी आहे.
मुंबईवरुन रेल्वेने बडोदा, भरुच आणि अंकलेश्वर पर्यंत जाऊन तिथुन बसने जायचा प्लान आहे.
भरुच किंवा अंकलेश्वर यापैकी कोणत्या ठिकाणापासुन बस कनेक्टिविटी चांगली आहे? तिथे राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे?
गरुडेश्वर/नारेश्वर याखेरीज जवळपासची इतर कोणती स्थळे पाहता येतील का?
भक्ति तों कठिण सुळावरील पोळी....
"भक्ति" या विषयाचा आवाकाच इतका अवाढव्य आहे की त्यात नुसते डोकवायचे म्हटले तरीही ती फार फार अवघड गोष्ट आहे. आणि ही भक्ति आचरणात, अमलात आणण्याचे म्हटले तर फक्त संतमंडळीच ती करु जाणे. कारण जनसामान्यांच्या भक्तिच्या कल्पना आणि संतांना अभिप्रेत असलेली भक्ति यात जमीन-अस्मानाइतका फरक आहे.
'महाशिवरात्र ' -शिव शक्ती समोर नतमस्तक होण्याचे भाग्य उपलब्ध करून देणारा सोहळा.महाशिवरात्रीच्या निमित्ताने काही लिहावे म्हणून अनेकदा लेखणी सरसावली, पण शब्द आकार घेण्यास तयारच नव्हते.का बरे असे होत असेल? सर्व सगुण साकार असून हि माझे विचार असे सतत निर्गुण निराकार का होत आहेत? मी नतमस्तक आहे का निष्प्रभ आहे? अश्या अनेक प्रश्नांच्या गर्तेत मी सतत हेलकावे खात होतो.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने व शिवभक्ती साठी केले जाणारे महारुद्र स्मरणात आले .रुद्र म्हणजे काय ? यावर मनात सतत चिंतन सुरु झाले. आणि मन एकदम शालेय जीवनात गेले.
नाशिक येथील श्री. नीळकंठ मोहिनीराज नांदुरकर यांनी अल्पशा संदर्भ सामग्रीवर संत निळोबाराय यांचं जीवनचरित्र लिहिलं आहे. त्यावरुनच निळोबांचा अल्पपरिचय करुन देते.
.........प.पु. गुरुमाउली सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या उपदेशा नुसार मला समजलेले अध्यात्म ........
(१) सर्वसाधारण पणे हा देह मन चालवत असतो त्यामुळे त्या मनात येईल ते आपण करत असतो ते बरोबर कि चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाठी त्या मनालाच चालवायला आपण शिकले पाहिजे ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म......१
(२) परमेश्वराने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक.त्या गोष्टीस जे आपले मन नकारात्मक विचाराने किंवा गोष्टीने झाकू पाहते तेंव्हा त्या नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्याम होय. -2
(सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या दृष्टीक्षेपातुन )
मानवी जीवनात अन्न,वस्त्र,निवारा या मुलभूत गरजा मानल्या जातात पण त्या शिवाय एक अत्यंत महत्वाची गरज असते ती सद्गुरू चरणां पाशी आश्रयाची. ती आधी प्राप्त झाली कि काहीही मिळवायचे रहात नाहीच तसेच या शिवाय जीवनात काहीही खरे समाधान मिळत नाही हेही तितकेच खरे|
||जय श्री राम||
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा|
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मयेन श्री गुरुवेनम: ||
श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सचितानंद सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य महाराज की जय
यशस्वी होणे हे प्रत्येकाचेच ध्येय असते .पण फार थोडेच लोक आत्मचिंतन करून स्व:तच्या यशाचा खडतर मार्ग शोधून काढून त्या मार्गे जाऊनच यशस्वी होतात तेव्हा सर्वसामान्यत: यश हे सहजासहजी कोणालाच मिळत नसते,तसेच यशाची व्याख्या सुद्धा व्यक्तिपरत्वे,स्थाना परत्वे वेगवेगळी असू शकते.एवढे मात्र निश्चित आहे कि यशा साठी लढा प्रत्येकाला द्यावाच लागतो आणि हा लढा नेहमीच स्वकियांशीच म्हणजे स्वतः मधील दुर्गुण, अज्ञान यान्च्या विरोधात असलेला लढा असतो तेव्हा हा मार्ग चालू लागू या . यशस्वी होऊन इतरांना हि यशस्वी करू या .
यशाचा मार्ग मला दिसत नाही ,
कारण यशस्वी होण्याचे ठरत नाही.||