माझ्या वडिलांनी बरेच अभंग लिहून छोटे पुस्तक छापले आहे. त्या पैकी काही इथे देत आहे .
१. भेटीची आस मोठी जिवाला !
कधी भेटीशी पांडुरंगा मला !!१!!
रात्रंदिवस जीव तळमळत आहे !
काही केल्या अुगी न राहे !! २! !
काय वृत करु कोणती साधने !
मन स्थिरावेल काय ती विधाने ! ! ३! !
संकल्प केला सिद्धि न जाये !
मनासारखे काही न होये ! ! ४! !
अंतःकरणातुनी पाचारीतो तूला !
लवकरी येई बा विठ्ठला ! ! ५! !
विठ्ठल दासा लागली तळमळ !
पांडुरंग भेटला गेली मळमळ ! ! ६!!
२. पूर्ण माझे मनोरथ झाले ! कामही सिद्धि गेले ! ! १! !
जे जे द्रुष्टी पड़े ! ते ते दिसे राम रुपडे ! ! २! !
आरक्षणाचा विचार,...
आरक्षणाच्या बाबतीत
हलगर्जीपणा नसावा
विकासाच्या वाटेवरून
कुणी सुध्दा उणा नसावा
उगीच विचार करू म्हणत
टाळा-टाळीचा प्रकार नसावा
आता आरक्षणाच्या मागणीचा
विचारपुर्वक विचार असावा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
ठाव मना-मनाचे,...
कुणासाठी ठाव असतो
कुणासाठी घाव असतो
वेग-वेगळ्या मनामध्ये
वेग-वेगळा भाव असतो
जसे मनं बदलतील तसे
कधी अर्थ बदलु शकतात
कुण्या मनात उचलणारे
कुणा मनी आदळू शकतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
आरोप प्रत्यारोप करताना,...
समजु शकणार्या गोष्टींचे
कधी गैरसमज होऊ नयेत
फालतु अफवांच्या बळीही
आपल्या भावना जाऊ नयेत
प्रत्येक गोष्टीतली सत्यताही
चिकित्सकपणे जाणली जावी
आरोप-प्रत्यारोप करताना
आपली बुध्दी ना हिनली जावी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
गुढी पाडवा
पारंपारिक असली जरी
नव्या-नव्याने थाटली जाते
नव-वर्षाच्या स्वागताला
रूढीची गुढी नटली जाते
मना-मनात आपुलकी अन्
आनंदाचा गोडवा असतो
मरठी माणसांचं नवं साल
असा हा गुढी-पाडवा असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
शरण्योsस्मि - अवघा काय़ापालट !!!!
शरण्योsस्मि - शरणागती म्हणजेच शरण जाणे .
भगवंता मी तुला शरण आहे म्हणणे म्हणजेच अवघा काय़ापालट असे समीकरण मांडल्यास वावगे ठरणार नाही.
महाशिवरात्र - म्हणजे भगवान शिव-शंकराच्या पूजनाचा अतिशय महत्त्वाचा दिवस. बहुतेक करून आपण सारे जण ह्या दिवशी उपास करून , साबुदाण्याची खिचडी, वरीच्या तांदळाचा भात, शेंगदाण्याची आमटी असा उपासाच्या पदार्थांवर आडवा हात मारतो.
आता जरा विचार करू या की "महाशिवरात्र" नाव ठेवण्यामागे काय बरे कारण असावे?
अणुरेणुया थोकडा, तुका आकाशाएवढा ????
जरी मी नव्हतों पतित । तरि तूं पावन कैंचा येथ ॥१॥
ह्मणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥
लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड जैसा ॥२॥
तुका ह्मणे याचकभावें। कल्पतरु मान पावे ॥३॥अभंगगाथा ७५२||
आपल्याला जर कोणी "देव" कुठे असतो असे विचारले तर तो कुठेतरी दूर आकाशात वा देवळात असतो असे काहीबाही आपण सांगतो. कोणी एखादा जास्त हुशार असला तर "देव" आपल्या अंतःकरणातच असतो असेही सांगेल खरे पण ती सगळी केवळ ऐकीव माहितीच. (अनुभवाच्या नावाने शून्यच.. )

थोडक्यात आपल्याबाबतीत देव म्हणजे काहीतरी अगम्य अशी गोष्ट.
आजूनही हा त्रास माल होतो
माझे आजोबा पूर्वी अमावसेच्या आठवड्याल कोणत्याही रात्री झोपेत मोठ्याने ओर्द्याचे तसे झाले नाही तर पूर्निमेचाय आठवड्यात कोणत्याही रात्री तोच
त्रास मला होतो
वडलांच्या तोंडून आईकून आहे कि माझे काका (माज्या वादांचे मोठे भाऊ) लहान असताना घरची परिस्थिती बेताची असल्या मुले इतर ठिकाणी मोलमजुरी
करून घरी बाजारहाट आणायचे असेच एकदा अंधार झाल्यावर बाजारहाट घेऊन घरी परतत होते
वाटेत अंधार होता भरपूर झाडी आणि शेती होती (आता JCB ने ती रस्ता मोठा केला आहे आणि झाडे पण तोडली आहेत) रस्त्यात त्यांना एक बकरीचे पिल्लू
शिव-मानस-पूजा स्तोत्र- (श्रीमत् शंकराचार्य-विरचित )- मराठी भावानुवाद
श्रीशंकर शिवप्रभो बसावे रत्नखचित मानससिंहासनी
मनोमनी स्नानार्थ आणले हिमगिरीचे सुखशीतल पाणी
दिव्य वस्त्र मग वेढून घ्यावे संध्यारंगासम झळझळते
कस्तुरीचंदन तुला लावतो सुगंधात त्या विश्व नाहते
पापनाशनी धूप जाळुनी राशी रचली बिल्वदलांची
कितीक सुंदर अर्धोन्मीलित फुले जाईची अन चाफ्याची
स्वामी मंगलदीप लावतो दीपोत्सव होऊ दे अंतरी
नमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ||
सुवर्णपात्रही मनी कल्पिले रत्नांची त्यावरती दाटी
दह्यादुधातील पंच पाककृती खीर तूप सारे तुजसाठी
तुकोबांची कीर्तनभक्ति - सत्संगती - भाग १
युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥
कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देइल भेटी ॥ध्रु.॥
न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥२॥
तुका म्हणे मज आणि उपाव । दिसती ते वाव नामाविण ॥३॥९६||
(वेव्हार=व्यवहार., वनांतर=वनात जाऊन रहाणे., वाव=व्यर्थ)
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् |
अर्चनं वंदनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम् ||