
मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे. या प्रवासावर आधारित गाणीही अतिशय लोकप्रिय ठरली आहेत.
चूल
चुलीवरची भाकरी चुलीवरचे मटण असे खूप ऐकतो . अशा जाहिराती असलेल्या पाट्यांनी हॉटेल सजवून टाकलेली आहे आणि लोक चुलीवरच्या पदार्थांची चव घेण्यासाठी जाऊन तेथे जेवण करतात . चुलीवरच्या भाकरींची , चुलीवरच्या स्वयंपाकाची वेगळीच चव आहे , अशी एक सर्वसामान्य मान्यता आहे . महाराष्ट्रात चुलीवरच्या जेवणाला पसंती देतात . अनेक पारंपरिक पदार्थ चुलीवर केल्या जातात आणि काही पदार्थ तर चुलीवरच केल्या जातात . चुलीचे महत्त्व या काळातही विशेष असे आहे .
हिरवाई
निसर्गाचा रंग कुठला आहे म्हणून विचारलं तर सहजच कोणी सांगेल हिरवा/ निळा . पण एवढ्या एका शब्दांत वर्णन होणे शक्य नाही . हिरवा रंग एवढं म्हणून हिरव्या रंगाची ओळख आपण करून देऊ शकतो का? निसर्गात गेलो , वनात
गेलो तर हिरवा रंग आपले विविध समृद्ध दालन आपल्यासमोर उघडून उभा असतो आता प्रश्न असा पडतो की यातला हिरव्या रंगाचे वर्णन कसे करावे ?
महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय
भारतात आता अनेक व्यवसाय आहेत . समाजाच्या मागणीनुसार आणि गरजांनुसार व्यवसाय देखील बदलत आहेत . कँटरिंग , लाँन , हॉटेल अशा मोठ्या व्यवसायात अनेक लहान व्यवसाय गुंतलेले आहेत . छोट्या छोट्या व्यवसायांवर मोठे व्यवसाय सुरू असतात . हल्ली हे व्यवसाय तर फक्त फोनवरही सुरू असतात . यांची एक साखळी असते .
चित्रातली देवळे-देवळातले चित्र
अगदी लहानपणापासून जेव्हा कधी मला फावला वेळ मिळत असे कागदावर रेघोट्या मारतांना सहजच माझ्या हातून चित्र उमटे .एक नदी, काठावर एक देऊळ हेमाडपंथी घाटाचे , देवळामागे उंच झाड , देवळावरचा ध्वज, दगडी पायर्या , आणि बाकीचा अख्खा परिसर मोकळा .
अलिकडेच एके दिवशी पाचगणीला गेलो होतो. बऱ्याच वर्षांनी पाचगणी, वाईला भेट देत असल्यामुळं गेल्या वेळेपेक्षा आता तिथं बदललेलं बरंच काही दिसत होतं. पाचगणीची भेट आटपून पुण्याला परत येण्यासाठी सकाळी निघालो. पाचगणीच्या एसटी स्थानकात पोहचल्यावर पुण्याच्या बसला वेळ आहे समजलं. त्यामुळं समोर उभ्या असलेल्या वाईच्या बसमध्ये आम्ही बसलो. वाईला पोहचल्यावर काही वेळानं पोलादपूर-स्वारगेट बस आम्हाला मिळाली.
भिंत
घर प्रत्येकाचं . घराच्या भिंती आपल्या . भिंतींशी ओळख, भिंतींशी जवळीक आणि रोजची सुरू असलेले व्यवहार .आपल्या घराच्या भिंती आपल्या किती जवळच्या असतात . त्या चार भिंतीच्या आत स्वतःला सुरक्षित ठेवून , स्वतःला झोकून देऊन आपण आत गुंततो . भिंतीला कधी जवळून आत्मीयतेने बघणे वगैरे आपण काही करत नाही . भिंतीचे निरीक्षण भिंतीचा आपलेपणा वगैरे साठी आपल्याला निवांत वेळच नसतो मुळी . पण आपल्याला सर्वात सुरक्षित वाटतं असलेली जागा कुठली आहे तर आपलं घर . घराच्या भिंती भिंतीला असलेले दार दारावरची कडी , कडी लावून अडकवलेले कुलूप आणि किल्ली सुरक्षित ठिकाणी ठेवून आपण निर्धास्त असतो .

यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं. त्यामुळं सकाळची शेवटची लोकल पकडली आणि लोणावळ्याकडे निघालो.
येत्या 8 ऑक्टोबरला भारतीय हवाईदलाच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्तानं.
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) म्हणजे कृत्रिम पद्धतीने विकसित करण्यात आलेली बौद्धिक क्षमता. अलीकडील काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जात आहे. या बुद्धिमत्तेवर आधारलेलं यंत्र मानवाप्रमाणं स्वत: विचारही करू शकतं आणि परिस्थितीनुरुप निर्णयही घेऊ शकतं.