रेंगाळतो आहे..
आजतोवर वाचलास तु
हा एक योगायोग आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे
भरल्यापोटीचे तुझे भुकेचे डोहाळे
काही केल्या संपत नाहीत
डोळे उघडुन बघ जरासे
गरजुंची आज दैना आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे
अपेयासाठी रांगा लावुनी
काय तु कमावतो आहेस?
आज तु वाचलास परि
तु उद्याचे बुकींग करुन ठेवतो आहेस
जीवाचा आटापिटा करत
तुझ्याच हितासाठी
देव स्वतः झुंजतो आहे
तरीही क्षुल्लक कारणे देऊन
तु रस्ते धुंडाळतो आहेस
आस
अशाच या कातरवेळी
निशब्द असावा
आसमंत सारा
त्यासमयी रवि तु
क्षितिजाच्या कुशीत निजावा
रवि तुज निजवताना
वारा ही गाई झुळझुळ गाणे
ती लुकलुकणारी कोर ही
बघ तुज कथा सांगे
अशाच एका कातरवेळी
बघ. कोण पणती
त्या तुळशीसमोर लावे
मंद अश्या त्या प्रकाशात
माझा ऊर भरुन वाहे
तेव्हा दुरवर कोठेतरी
मज ऐकु येते ती किणकिणारी घंटा
'आस' लागे मनास कान्हा
तसाच ऐकु येईल का रे मज
एक दिन तुझा मधुर पावा..
-दिप्ती भगत
(९मे, २०२०)
एक आई व्रुद्धाश्रमातून स्वतःच्या मुलाला पत्र पाठवते. फोनला उत्तर देते.
चिरंजीव,..............
कसा आहेस. कालपरवा तुझा फोन आला होता आश्रमात. मला ऑफिसमधली क्लार्क सांगत होती . आमची केअरटेकर आली होती मला बोलवायला ,पण काठी शोधून चष्मा काढून खोलीबाहेर पडेस्तोवर तू फोन ठेवलास. मला फक्त तुझा निरोप मिळाला.
ती अन् पाऊस..
खूप दिवस झाले
आता पावसात
चिंब चिंब भिजुन
भरलेल सावळ ते आभाळ
नजरेत साठवणारी ती
भिजावं का थोडंतरी?
ह्या येत्या पावसात
चिंब चिंब घेऊ न्हाऊन
असा विचार करणारी ती
गेले कित्येक दिवस
दिवस? छे! कित्येक वर्ष
रिमझिम पावसाकडे बघतीये
छत्रीबाहेर हात काढुन
भिजण्याचा प्रयत्न करतीये
हा पाऊस मात्र
द्वाडच फार
भिजवले मलाच फक्त
मन मात्र तसेच कोरडे
माझ्या अंगणातले चाफ्याचे झाड खूप काहीतरी सांगायचा प्रयत्न करते आहे. काय सांगायचं आहे ते लक्षात येत नाही पण त्याच्याशी गुजगोष्टी केल्या तर कळतं हळूहळू.
प्रकाशज्योती मम अंतरातील सदैव उजळत राहू दे,
काळोखाच्या उजळून वाटा प्रकाश मज पाहू दे
मानवतेच्या सेवेसाठी जीवन हे वाहुया,
चला मुलांनो संकटसमयी आपण एक होऊ या .
विनाशकारी विचारांचे अंकुर जाळून टाकू दे,
अद्वैताचा भाव ईश्वरा अंतरी माझ्या वाहू दे,
सज्जनतेच्या सर्व शक्तिंनो चला एक होऊया,
चला मुलांनो संकटसमयी आपण एक होऊया .
देश माझा मी देशाचा भाव अंतरी राहू दे,
जगतामध्ये शांती सदोदित नित्य नवी वाहू दे,
हे ईश्वरा विश्व अबाधित सुंदर हे राहू दे,
मानवतेचा उच्च कळस माझ्या देशाला गाठू दे .
त्या स्वप्नांना..
काय करु? समजत नाही..
मनास माझ्या मी
कसा आवर घालु?
हे मज आता उमजत नाही..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
काही श्रावणातल्या पावसाची
तर काही बहरलेल्या वसंताची..
झोपी गेलेल्या
स्वप्नांना
मी आता जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
घोटभर चहाची
अन् भरपुर गप्पांची..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..
घे भरारी..
स्वप्नसुखांचे लेवुन पंख
घे भरारी गगनात
आभाळ आहे तुझेच परि
तु तुझिया मायेला विसरु नको
श्वासांत घे भरुन तु
ती अविरत ऊर्जा त्या भानुची
घे भरारी गरुडापरी तु
असुदेत एक नजर भूवरी
नंदादीप तो जळत राहो
तुझ्या इच्छा-आकांक्षाचा
निसर्गाचे ते अनमोल देणे
तु परतवत रहा त्याला..
-Dipti Bhagat
मन वढाय वढाय...
nimita यांची 'मन वढाय वढाय' ही कथा वाचल्यावर मनात विचारांची रांग लागली होती... तेच विचार कवितेत शब्दबद्ध करायचा माझा केविलवाणा प्रयत्न... 
पसारे ते भावनांचे
आवरावे किती?
मनास माझिया मी
सावरावे किती?
ओढ तुझी, कि
धुंदी आठवांची
मनास माझिया मी
समजवावे किती?
ठेहराव मनाचा
हरपत चालला
निष्फळ उसासे
टाकावे किती?