ही गझल !!
---------
किती वाटते हो शिकावी ही गझल
नाही सोपी एव्हढी मराठी ही गझल
**
प्रथम लागतो पट्टीचा कवी तो
तयास थोडी समजेल ही गझल
**
तुझ्या त्या ईशा-यास कोणते नांव देऊ ?
बाजूस उभे रहाण्या तुझ्या थरथरते ही गझल
**
बाद्शहाच होता तो या गझलांचा
सुरेश भटांना च पावली ही गझल
**
रदीफ, काफीया, परिभाषा गझलेची
वृत्त अलामत यमकांनी नटते ही गझल
**
तोंड वेंगाडून कशी हासते ही गझल
घ्या जाणत्यांनो सांभाळून ही गझल
**
प्रकाश साळवी
१६-०४-२०१७
०९१५८२ ५६०५४
मी तुझ्या नभातले तारे...
-----------------
मी तुझ्या नभातले तारे मोजले काही
यात मी काय शोधिले मला समजले नाही
**
सुखाच्या वेलीवर होती चार फूले दू:खाची
सुख - दू:खाच्या साथीने जिवन समजले नाही
**
मी जागलो शब्दांना तुझ्या, शब्द फुले होवून गेली
कोमेजली फुले परंतु शब्द कोमेजले नाही
**
स्वर हे साथ देतील, तू गावू नको वीराणी
जीवनाचे खरे गाणे अजून ऊमजले नाही
**
प्रकाश साळवी
११-०५-२०१७
०९१५८२५६०५४
विस्मृतीत माझ्या ...
***
विस्मृतीत माझ्या ...
----------------
विस्मृतीत माझ्या तुझाच ध्यास आहे
गंधाळलेल्या फुलांना तुझाच वास आहे
**
बोलावण्यास तुजला वापरु शब्द कोणते?
तु ना येण्याची खंत मृगजळास आहे
**
आठवती सरी ज्या भिजवून रात्र गेल्या
वीरहात तुझ्याही मजला मधुमास आहे
**
विसरलास जरी तु त्या दिल्या वचनांना
तो चंद्रही साक्ष त्याची आज खास आहे
**
नसण्याने तुझ्या लागले जिवनाला ग्रहण
ठाऊक आहे मला ते ग्रहण खग्रास आहे
**
थोडे ऊन थोडा पाऊस हे काय आहे?
'हो-नको' च्या जेवढे वादात जाते..
तेवढे आयुष्य सावरण्यात जाते..!!
डांबरी सडकेत ती हरवून गेली..
एक गाडीवाट जी गावात जाते...!!
एेवढ्या जोरात भांडे बोलते की..
बातमी मग नेमकी चौकात जाते...!!
'फोडुनी' घर चांगले गावातले मग..
ती 'त्सुनामी' शेवटी शहरात जाते..!!
पावसाला वेळ लागू लागला की ..
स्वप्न हिरवेगार मग सरणात जाते..!!
एक नाते ओघळाया लागल्यावर..
तावदानी मन जुन्या काळात जाते..!!
गणेश शिंदे दुसरबीडकर
जिक्र तेरा निकले, तो नाम हमारा मशहूर बहुत होता है
दवा दो , दुआ दो....
अब तो तेरा जाना भी बेअसर होता है
छलकती आशिकी अब भी ये पैमाने से है, ऐ साकी
तुने पलट के देखा भी तो 'अब' देखा
अधिक तो हम तेरे, कई जमाने से है |
कर्जमुक्त श्वासांची जेंव्हा तयारी होते.
दुप्पट अलगद दु:खाची ही उधारी होते.
त्या गरुडांचे भाग्य किती निष्ठुर म्हणावे,
अखंड तडफड हीच जयांची भरारी होते.
आग्रह सहवासाचा मी ही केला नव्हता,
दु:खच रमले. सुख नेमके फरारी होते.
संवादाचे सूर समजले निघण्यापूर्वी,
शब्द रेशमी सारे, संदर्भ विषारी होते.
लाख तडाखे लाटांचे सोसूनी परतलो.
नेम साधुनी लपले मित्र किनारी होते.
पुन्हा कशाला नियतीशी तो वाद नकोसा?
विजय शेलका होतो, मात्र हार करारी होते.
मिसरा त्यावर कमाल झाला ...
प्रश्न भुकेचा जहाल झाला
बेबस आत्मा हलाल झाला
ओठ रंगवुन खिडकी बसली
रस्ता जेव्हा दलाल झाला
फ्लॅट असू दे छोटासा पण
मजसाठी तो महाल झाला
एकेकाळी गजबजलेला
हा वाडा का बकाल झाला
ओलांडताच तिने उंबरा
नात्यांमध्ये बवाल झाला
जीव पोखरी प्रेमभंग पण
मिसरा त्यावर कमाल झाला
कविता क्षीरसागर
होऊन आज सूर्य अंधार प्यायलो मी
आभुषणे आगीची देहास ल्यायलो मी
माझ्या पराभवाची चिंता तुला कशाला
झेलुन वार सारे मस्तीत गायलो मी
केला किती तयांनी जन्मांतरी दगा तो
त्यांनाच गोडव्याचे हे दान द्यायलो मी
युद्धात दुःखितांच्या योद्धा कठोर होतो
भेटुन सज्जनांना अश्रुंत न्हायलो मी
बांधुन ठोकताळे जोखु नको मला तू
ते घास विस्तवाचे आजन्म घ्यायलो मी
पर्वा जरी नसे ती उन्मत्त भामट्यांची
बोलास लाघवाच्या किंचित भ्यायलो मी
जातो आहे किनारा तो गूढ लांब आता
नौकेत या कळेणा नि काय न्यायलो मी?
- शार्दुल हातोळकर
हळव्या ह्या जखमांना ...
हळव्या ह्या जखमांना फसवत नाही आता
स्वप्नांचा दरवाजा उघडत नाही आता
हलके हलके माझे यंत्रच होते आहे
जगते त्याला जीवन म्हणवत नाही आता
मेंदीमागे लपल्या तळहाताच्या रेषा
नशिबा जा सामोरी हरकत नाही आता
लाचार भुकेने ती खिडकीपाशी बसली
वाघीण हारलेली बघवत नाही आता
धूसर धूसर झाल्या आठवणी छळणाऱ्या
का हे तरिही सलते उमगत नाही आता
चमडी निब्बर झाली वखवखल्या नजरांनी
निर्मळ साधी दृष्टी पोचत नाही आता
हिरवळ सुंंदर दिसते मळलेल्या वाटेवर
मार्ग नवे कोणीही शोधत नाही आता