रीत स्वागताची ही न्यारी बघुनी हासत आहे मी
खड्डे दिसती जिकडेतिकडे रस्ता शोधत आहे मी ..
कोसळला ना कधीच धो धो लहरी तो पाऊस जरी
भरून वाटी चिमणीपुरते पाणी ठेवत आहे मी ..
करतो उत्साहाने प्रयत्न धडपडून मी जगण्याचा
ससा नि कासव कथा तीच ती अजून ऐकत आहे मी ..
लागुन ठेचा होतो जखमी प्रेमाच्या खेळात जरी
असते आशा अमर जाणुनी तसाच खेळत आहे मी ..
कर्जातुन घेतल्या घराचे दार बंद ठेवतो सदा
"अतिथी देवो भव" म्हणण्याला किती घाबरत आहे मी ..
शिते जिथे ती भुतेहि जमती शिकलो ज्ञानातून असे
माया पोटापुरती जमवत नाती टाळत आहे मी ..
.
गुलाम अली
गुलाम अली या नावाने सुरु केलेल्या धाग्याला प्रस्तावनेची गरजच नाही. :-)
गुलाम अली यांनी गायलेल्या गझला आणि त्याचा संग्रह माबो वर सापडला नाही. सगळ्या गझला आणि त्यांच्या लिंक एका जागी असल्यास शोधायला आणि ऐकायला बरे पडते. शिवाय आपल्याला कधी कधी त्यांच्या सर्वच गझला माहित नसतात, त्या माहित व्हाव्या म्हणून हा धागा.
माझी गुलाम अली प्लेलिस्ट :-
१. चुपके चुपके
२. आवारगी
३. हम को किस के गम ने मारा
४. दिलमें ईक लहर सी उठी है अभी
५. अपनी धुन में रहता हूँ
६. रास्ते याद नहीं
७. हम तेरे शहर में आए है
८. इतनी मुद्दत बाद मिले हो
असे वाटते मैफिल काही जमून आली नाही
जिथून होती दाद पाहिजे .. तिथून आली नाही
सहजच होता पाण्याला मी स्पर्श एकदा केला
एक लाट जी गेली मागे फिरुन आली नाही
आयुष्याने मारून ठोकर केले खरे शहाणे
सारी अक्कल काही शाळा शिकून आली नाही
तिला बहूधा खूप आठवण येत असावी आता
याच्या आधी कोरी चिठ्ठी चुकून आली नाही
इकडे चुकतो ठोका तिकडे उचकी लागत असते
प्रेमाची ही भाषा तेंव्हा कळून आली नाही
त्या मातीला तसा देखणा स्पर्श मिळाला होता
उगाच काही तिथे अबोली उगून आली नाही
सणासुदीला लेकीवाचुन सुने वाटते अंगण
निरोप येतो ‘‘निरोप नव्हता’’ म्हणून आली नाही
जरी नोकरी संसाराचे अवघड गणित जुळवते
आत आत खोल खोल थेट वार झाले
एक एक होत होत फार फार झाले
श्वास थांबतो उगाच नजरभेट घडता
नजरकैद प्रेमवीर बेसुमार झाले
भास व्हायचा तुझा चराचरात तेंव्हा
सत्य भास होत जात आरपार झाले
वाटते कसे बसे तुझ्या मिठीत येता
प्रेम बीम आजकाल थंडगार झाले
पाळ दुःख नेटके हिशोब मांडताना
पारखे सुखास सर्व कारभार झाले
रंगवू कसे घरात चित्र उंबऱ्याचे
नेमके बरेच रंग हद्दपार झाले
एक देह एक प्राण एकसंध नाते
मर्मबंध तोडताच दोन चार झाले
श्वेता द्रविड
झोपडपट्टी पाडुन ते उंची महाल बांधत होते
खुजेपणाने बुलडोझर माणुसकीवर फिरवत होते
करतच होतो ओरड मी पाण्यामध्ये बुडतानाही
काढण्यास माझा फोटो सगळे संधी शोधत होते
माझे माझे ठरवुनिया कवटाळत होतो मी ज्यांना
अडचणीत मी दिसताना दुरून मजला टाळत होते
जसा बावरा कृष्णसखा जवळी नसता बासरीच ती
तू नसताना प्राण सखे तसेच माझे हरवत होते
फूल तोडता जराजरा थरथर हाता जाणवली ती
घेता कानोसा कळले किंचित काटे विव्हळत होते
जाळुन मज सरणावरती घसे मोकळे झाले सगळे
माझे निवांत का आता सद्गुण दुर्गुण चघळत होते
घटकेत ऊन पोळे घटकेत चांदणे मज
आयुष्यमार्ग अवघड समजे न चालणे मज
विश्वात जीव इतके मी एक बिंदु साधा
विश्वास ओळखाया किति जन्म जन्मणे मज
बागेतल्या फुलांची गणती उगाच केली
येता सुगंध नाकी का वेड मोजणे मज
तो सूत्रधार वरचा कळसूत्र हाति त्याच्या
हातातले बनवले त्यानेच खेळणे मज
हातावरील रेषा सुखदु:ख सांगती जर
पुसणार कोण आहे आलेच शोधणे मज ..
.
गरजेपुरते चाळत गेले
गरज न उरली टाळत गेले
पोलिस दिसता त्यांना पाठी
नियमाला ते पाळत गेले
होता व्याकुळ चिखल दिसे तो
गाळातुन ते गाळत गेले
फोटो काढत असता नेते
राखेलाही जाळत गेले
जीवन असते पानालाही
जीवन न मिळे वाळत गेले ..
.
डोळे मिटले तरिही तो असतो जागा टक्क
जो असतो अपुल्यामध्ये ना दाखवता हक्क
ज्ञानेशाच्या ओव्या , की शतजन्मांची कोडी
अजुनी ती ना सुटली ... विद्वत्ता झाली थक्क
रानात उमलले जरि ते गंध लपेना त्याचा
हे शहरी अत्तरवाले शोधत आले चक्क
बिब्बा घालावा म्हणुनी यत्न कितींनी केले
तुटणारच नाही मैत्री .. नातंच आहे पक्कं
अंधार जवळचा वाटे माझ्या एकांताला
थोडा उजेड सुद्धा मग वाटत जातो भक्क
लाटांनी या गिळल्या किंकाळ्या तरुणाईच्या
आठवण जरी आली तर काळिज होते लक्क
कविता क्षीरसागर
उपभोगाया मजला आता सुख हे फुरसत नाही
देवा राहू दे दु:खातच त्याविण करमत नाही
आवड मजला ना पुष्पांची का पसरवली अफवा
होती ती काट्यांची सवयच फूलहि धरवत नाही
हसतो बघुनी परका कोणी स्नेही जणु समजोनी
रस्त्यावर सामोरी दिसता अपुला फिरकत नाही
आवडतो मज माळायाला गजरा ग सखे तुजला
नाही बघवत तो सुकल्यावर यास्तव माळत नाही
रंगत चढते भान विसरुनी लोकांना हसवाया
आनंदी खोटाच मुखवटा कोणा समजत नाही
पथ काटेरी पायाखाली मज सवयीचा आहे
हिरवळ सुखदच बागेमधली मजला वाटत नाही ..
.
........... विजयकुमार देशपांडे
भेटायाचे नाही आता ....
काहुर उठले मन कातरले जेव्हा गगनी झांजरले
परतीच्या त्या वाटेवरती सखया काळिज अंथरले
भेटायाचे नाही आता ठणकावुन मी सांगितले
जाई ना पण दुःखच लोचट वेडच त्याने पांघरले
मुरलीच्या त्या धुंद सुरांनी भान हरपले गोपींचे
ठाउक त्यांना की कृष्णाने राधेला होते स्मरले
डबडबले सर्वांचे डोळे करुण कहाणी ऐकुन ती
पाहुन माझे डोळे कोरे मीच स्वतःला घाबरले
आयुष्याचा गुंता झाला प्रारंभ नव्याने केला
देते उत्तर दैवाला "बघ अजुनी नाही रे हरले"
कविता क्षीरसागर