माझी एक नातेवाईक स्त्री ब्रेस्ट कॅन्सरने पिडीत आहे.
चार केमो आणि ब्रेस्ट सर्जरी होऊन सर्जरी रिकव्हरी सुरु आहे.
अजून काही केमी आणि रेडीएशन बाकी आहे.
दरम्यान डॉ योगेश बेंडाळे यांच्या आयुर्वेदीक उपचारांची माहिती मिळाली. केमो चा त्रास टाळण्यासाठी अनेक जण या मार्गाने जातात.
आता या स्टेज ला आयुर्वेदाचे उपचार घेणे ठीक राहील का ?
कुणी असे उपचार घेतले आहेत का ?
माझी एक नातेवाईक स्त्री ब्रेस्ट कॅन्सरने पिडीत आहे.
चार केमो आणि ब्रेस्ट सर्जरी होऊन सर्जरी रिकव्हरी सुरु आहे.
अजून काही केमी आणि रेडीएशन बाकी आहे.
दरम्यान डॉ योगेश बेंडाळे यांच्या आयुर्वेदीक उपचारांची माहिती मिळाली. केमो चा त्रास टाळण्यासाठी अनेक जण या मार्गाने जातात.
आता या स्टेज ला आयुर्वेदाचे उपचार घेणे ठीक राहील का ?
कुणी असे उपचार घेतले आहेत का ?
नमस्कार...
क्रिएटिनाईन लेव्हल 1.46 आहे आणि टाईप 2 डायबिटीज.
पोटॅशियम कमी केले आहे.
मधुमेह आणि किडनी प्रॉब्लेम - चांगली डायट सुचवाल का?
आज एक धक्कादायक बातमी ऐकली.
त्याचं झालं असं की आज ट्रीपचं नियोजन करत होतो. तेव्हांच ऑफीसमधून फोन आला. ट्रीपबद्दलच होता. त्यात खाण्याचा विषय निघाला. सगळं घरून बनवून न्यायचं की भटारखाना सोबत घ्यायचा आणि रेशन बसमधे केबीन मधे टाकून जंगलात चूल पेटवून जेवण बनवायचं हा प्रश्न होता. त्यामुळे फोनवर चांगल्याच गप्पा रंगल्या.
हँगरच्या पिनेची गोष्ट
सेरा विमानात आपल्या जागेवर बसली. आता तिचे जरा वय झाले होते तरी चेहऱ्यावरचा करारीपणा, आत्मविश्वास कमी झाला नव्हता. उलट प्रत्येक जबाबदारीबरोबर तो वाढतच गेला होता. वेलकम ड्रिंक द्यायला आलेली फ्लाईट अटेंडन्ट तिच्या कोटवरची पिन बघून थबकली. कोट हँगर वर लाल काट मारलेली पिन बघून ती पोरसवदा अटेन्डन्ट म्हणाली ‘मॅडम, हँगर वर नको तर तुमचा कोट आमच्या कॅबिनेट मध्ये हूकला अडकवून ठेऊ शकते.’ सेरा हसून ‘नको, इथेच असू दे’ म्हणाली. पिनेचे कारण त्या पोरसवदा अटेन्डन्टला माहितीही नाही - ह्या समाधानाने सेराच्या चेहऱ्यावर हसू पसरले.
त्या पिनेला निमित्त ठरली होती नॉर्मा.
रवी व्हावं पण कवी होऊ नये म्हणतात.
रवी आनि कवी नेहमी जळत असतात. पण कवीला मन असतं. भावना असतात.
दोघेही स्वत: जळून दुसर्यांना प्रकाश देतात.
एक हार्डकोअर प्रकाश देतो तर दुसरा काव्यानंदाचा प्रकाश देतो.
मात्र कवीला काय काय सहन करावं लागतं याची वाचकांना कल्पना येणे शक्य नाही.
कवीचं मनच नाही तर पावलं सुद्धा नाजूक. नाजूकशा खड्यांनीही त्याला ठेस लागते तर मनाचं काय !
ती जर दोन तास दिसली नाही तर कवी कासावीस होतो.
काही स्वयंसेवी (हौशी) लोकांच्या ग्रूप सोबत आदिवासी एरियात जाण्याचे योजले आहे. एक प्रयोग म्हणून आणि एक इच्छा म्हणूनही. अजून बरेच हेतू आहेत जे मलाही माहीत नाही. पण मला जायचे आहे म्हणून केवळ मी जाणार आहे.
तर... तिथल्या आदिवासी बायकांनी मला जे काही शिकवायचे आहे ते त्या शिकवतीलच... आणि माझ्या अल्प बुद्धिला ते झेपावे अशी अपेक्षा आहेच. पण एवढ्या लांब जाऊन आपणही त्यांना काही बुद्धिचातुर्याच्या गोष्टी सांगून ’प्रवाहात’ वगैरे आणायचे करावे अशी त्या ग्रूपची इच्छा दिसते आहे. त्या दिशेने विचार करता फार गहन प्रश्न समोर ठाकले. त्यांची उत्तरे तुम्हा सर्वांच्या मदतीने मिळाली तर बरे होईल.
पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक घटक. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. पृथ्वीवर सर्वत्र एकसारखे हवामान नाही. त्यानुसार माणसाची पाणी पिण्याची गरज वेगवेगळी राहते. अलीकडे काही वृत्तमाध्यमांतून रोज किती पाणी प्यावे यासंदर्भात काही विधाने वाचण्यात आली. वास्तविक निरोगी व्यक्तीने रोज किती पाणी प्यावे याची ठोस शास्त्रीय शिफारस नाही. तरीसुद्धा काही लोक, अमुक इतक्या प्रमाणाच्या वर पाणी पिऊ नका, त्याने मूत्रपिंडावर ताण येईल किंवा अजून अमुक-तमुक होईल, अशा स्वरूपाची विधाने माध्यमांमधून करीत असतात. त्यामध्ये शास्त्रीय तथ्य किती याचा आढावा या लेखात घेत आहे.