जीएस्टी चे २ च स्लॅब करून टॅक्स कमी केले आहेत हे दाखवण्याचा आव आणण्यात आलेला आहे असे दिसते.
मला फारसं कळत नाही यातलं. जाणकारांनी कृपया समजवून सांगावे.
जे दिसतंय त्यावरून, हातचलाखी करुन उदा. कार वरचा २८% चा १५% टॅक्स केला तरी १३% कंपनीला अॅडिशनल अन १५% तुम्हाला लावण्यात आला आहे. कंपनी हे १३% तुमच्याच गळ्यात मारणार हे नक्की.
५% जीएस्टीचे इन्पुट क्रेडिट मिळणार नाही, सो पुन्हा तीच गम्मत.
इतिहासाच्या अभ्यासकांची किंवा विद्यार्थ्यांची भूमिका नेहमी खेळातल्या पंचाप्रमाणे असावी. जेव्हा पंच मैदानात असतात, तेव्हा आपल्या देशाच्या खेळाडूने षटकार मारला तरी ते आनंद व्यक्त करत नाहीत आणि आउट झाल्यावर दु:खही व्यक्त करत नाहीत.
तरीही, जेव्हा सामना भारत-पाकिस्तान दरम्यान असतो, तेव्हा दोन्ही देशांचे पंचही तटस्थ राहू शकत नाहीत. बिशन सिंह बेदी आपल्या संघाला पाकिस्तानमधून परत घेऊन आले होते कारण पाकिस्तानी पंच अन्याय करत होते. तसेच, भारतीय पंच दारा धोतीवाला भारताच्या बाजूने कायम उभे दिसले.
शिवचरण ने मुलाकडे एकदा कौतुकाने पाहिलं.
तो आढ्याला चेंडू बांधून त्याला नवीन बॅटने फटके मारत होता. त्याचं पदलालित मोहवून टाकणारं होतं.
रामलाल ने ओसरीवर चाललेला खेळ पाहिला आणि रस्त्यावरूनच हाळी दिला
"अरे भई शिवचरण, तेरा बेटा तो हिरा है हिरा. देखना ये दूसरा कोली बनेगा"
शिवचरणच्या अंगावर मूठभर मांस चढलं.
मुलाला घट्ट मिठी मारावी आणि त्याचे हजार पापे घ्यावेत असं त्याला होऊन गेलं.
पण दुसर्याच क्षणी तो भानावर आला.
एव्हढ्या छोट्याशा गावाला क्रिकेटचं स्टेडीयम सोडाच, मैदान देखील नव्हतं.
ना कोच होता.
परवा आमच्या अड्ड्यावर "लाकडं गेली वढ्याला, आन उठीव माझ्या घोड्याला" अशी म्हण वाचली.
आत्ताच चक्क पाककृतींच्या धाग्यात 'कणसाची आमटी' पहात होतो, तिथे डीजे नी लिहिलेली 'खेकडा बसला नटून अन् पाणी गेलं आटून' अशी म्हण वाचली. बहुतेक पहिली पण डीजेनीच लिहिलेली होती.
मजा आली!
ह्या म्हणी अन वाक्प्रचार हे खरं तर भाषेचे दागिने. आजकाल लुप्त होत चाललेत. कधी कुण्या वयस्क माणसाकडून कानावर पडलेत तर पडले. पण खूप काही सांगून जातात हे नक्की.
हा धागा मी उघडेन असे कधी वाटले नव्हते. मी टिटोटलर झालो आणि बरेच दिवस काहीच घेतले नाही .
अजूनही दारू घेणार नाही यावर ठाम आहे. लॉकडाउन मध्ये घरी तुम्ही कोणकोणती मॉकटेल्स बनवताय यावर चर्चा करायला हा धागा.
मॉकटेल म्हणजे कॉकटेल नव्हे, त्यामुळे फक्त नॉन अल्कोहोलिक मॉकटेल्स बद्धल शेयर करूया |
गेले काही दिवस मी उष्णतेच्या आजाराने त्रस्त आहे. उष्णतेचा दाह फक्त तळपायांना जास्त जाणवतो. डॊक्टरना विचारले पण दरवेळी डॊकटर गोळ्या देऊन परत पाठवतात. पण त्याने तितका फरक नाही पडत. पायात दिवसभर शुज असतात. तळपायाची जळजळ होत असली की तात्पुरता हापिसाच्या पार्किंग मधे जाऊन पाय धुवुन येतो. असे दिवसातुन तीन चार वेळा तरी. रस्त्यातुन चालताना अचानक पायाची जळजळ चालु होते. आणि चालणे मुश्कील होते. कधीकधी अनवाणी पायांनी चालाव अस वाटत. इतका त्रास होतो. मध्यंतरी कोल्हापुरी चप्पल घेतलेली. पण हापिसात घालुन जाणं ऒकवर्ड वाटत.
नोटबंदीबद्दलची चपराक अजूनही हुळहुळत असतानाच पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने हायवेवरील दारूबंदीसंदर्भात नवी चपराक दिलेली आहे
(कुणाला, ते विचारू नका.)
हायवेपासून ५०० मीटरपर्यंतच्या अंतरापर्यंद दारू दुकाने नकोत, असा आदेश दिल्यानंतर देशातील जनादेशप्राप्त पापिलवार भगव्या सरकारांनी ताबडतोब शहरातले महामार्ग मुन्शिपाल्ट्यांकडे हस्तांतरीत केले. हे करताना कुणी किती मलिदा कसा खाल्ला, याच्या चर्चा फारच चविष्ट आहेत.
दादर माटुंगा बांद्रा माहिम या परिसरातील समुपदेशकांबद्दल माहिती हवी आहे. जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला डिप्रेशन सिंड्रोम्स दिसत आहेत. कृपया कोणाला एखाद्या चांगल्या समुपदेशकाबद्दल माहिती असल्यास सांगा. धन्यवाद.