काव्यलेखन

आमचा(बी) व्यसनी बाप

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

ही ह्या कविते(?)ची प्रेरणा!

हे हटकेश्वरा, कंपूशेठ फलकाण्या, हिरवट फोकनाडेश्वरी माते आणि
बाराहून खास भगतगणाला, उदा: डोंमकावळ्याला भेटायला आलेल्या सरकोजीदेवा...

तुम्हाला चांगलच माहिती आहे
मायबोलीवर काय चाल्लंय ते
तरीपण.....

आमचा बाप काडेल आणि मायबोलीचा व्यसनी
ID अजून शाबूत आहे.
नाहीतर कधीच 'अंतू' आणि 'हवालदार'सारखा
पार्श्वभागावर हाणल्या जाऊन गचकला असता.

बापाचा मायबोलीवर लई जीव!
इतका, की हापिसात कामचुकार्‍या करून
आणि घरी मायपासून चोरून लपून मायबोलीवर टवाळक्या कराव्या.

प्रकार: 

गोड गाणे! (तिळगुळ घ्या गोड गोड बोला)

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

तुझे गोड गाणे

मना वेड लावी तुझे गोड गाणे
खळाळून वाही तुझे गोड गाणे

कितीदा क्षणांन्ना विस्मरून जावे
मन्तरून जाई तुझे गोड गाणे

कुणा पारव्याची घुमे शीळ रानी
तरंगे मनाशी तुझे गोड गाणे

कुठे शांत माझे अबोले उसासे
गन्धाळून देही तुझे गोड गाणे

उदासीन होते किनारे दिलाचे
कशी ओढ लावी तुझे गोड गाणे

कळीबंद स्वप्ने, धुके आर्जवी ती
जशी गोड चोरी - तुझे गोड गाणे!!

प्रकार: 

भारतीय रेल्वे

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मला भारतीय रेल्वेची एक गोष्ट अगदी लहानपणापासून आवडत आलेली आहे. ती म्हणजे त्यांना दिलेली नावे. नद्यांची नावे, ग्रंथांची नावे, इतिहासातील प्रसिद्ध घटनांची नावे, ज्यांनी देशासाठी आयुष्य वेचले अशा महान नेत्यांची नावे, कवींची नावे, लेखकांची नावे. देशातील एका गावातील लोकांना दुसर्‍या गावात पोचवताना रेल्वे आपल्या सोबत भाषा, संस्कृती, माणसे, धर्म, अन्नधान्य -- काय काय वाहून नेते!

मी इथे भारतीय रेल्वेवर एक कविता लिहित आहे जी अजून पुर्ण व्हायची आहे. मला वाटतं या कवितेत कडवे जमवायला मला तुमची देखील मदत मिळू शकेल. बघा प्रयत्न करुन. धन्यवाद!

पोलादी आयुष्य माझे
फिरते भारत सारा,
वाढता वाढता वाढे

फराळ गर्भरेशमी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

(विडंबन किंग मिल्याच्या गझलेचे विडंबन करण्याचा मोह आवरला नाही.)

मलाच पेलतो सहज असून थुलथुलीत मी
उमेद एवढीच की 'बनेन स्लिम' हाच मी

कबूल कर मना कशी, नसामांसात चरबी
फितूर देह सांगतो, उभ्या जगास बातमी

जमेल का मला कधी, भयाण पत्थ पाळणे
हवीच वाटते मला, पुरी परात नेहमी

कशास वाढती सदा, तनूत रोज कॅलरी ?
'न मोजताच चेपणे', अशी न होय रे कमी?

नवेच शौक पाळतो, श्रीखंड बळे टाळतो
रसात आम्रखंडही पिऊन टाकतोच मी

मना तुलाच रमविण्या, नवेच खेळ खेळतो
वडी... वड्यास डाव हा! मलाच लागते रमी

तळेल ते... वळेल ते... नकोच ते अता पुन्हा
नकोच ते ... म्हणायचे... विचार फक्त मौसमी

प्रकार: 

(हिंमत असेल तर), डोळ्यांत वाच माझ्या..

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

काल
आपल्या फस्टम् फस्ट रात्री
हे बटबटीत गोळे तुझ्या डोळ्यांचे
रोखून बघताना माझ्याकडे........
नको म्हंटलं तरी जातंच ना लक्ष
त्यांच्याकडे...!
दिसलंच मला त्यांच्यात प्रतिबिंब
तुझ्या मनातल्या भावांचं, धाकी पाडणार्‍या जरबेचं.
पटापटा मान वळवून ती नजर
टाळण्याचा मी केलेला तो आटोकाट प्रयत्न
कोणी असं करत नाही!
पण इतक्या रागावून अर्पित केलेली ती एक्सरे व्हिजन
मला पाहवलीच नाही बघ.
आणि मग निरखू लागलो मी
भिंतीवरची किडा पकडणारी पाल, गुणगुणणारे डास.
तुझ्या आयशॅडो थापलेल्या नेत्रांचे निखारे
वर खोट्या पापण्या डकवलेले..
बचाबच आयलायनर लावून वटारलेले!
मी हळूच चोरून बघतो तर काय..

भारत एक खोज

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इन्डिया वर आधारित वैदिक काळापासून भारताचा प्रवाह दर्शविणारी 'भारत एक खोज ' नावाची एक विलक्षण मालिका १९८५ च्या दरम्यान दूरदर्शन वर येऊन गेली. ५३ भाग होते तिचे. दिग्दर्शक शाम बेनेगल. शिवकालावरही एक एपिसोड होता. दूरदर्शनच्या सर्वोत्कृष्ट मालिकापैकी ही एक. दर रविवारी सकाळी या ऋग्वेदातल्या ऋचा गम्भीरपणे सुरू होत आणि भाग सुरू होई. स्वतः नेहरू येऊन निवेदन करत. (रोशन सेठ म्हणजे अगदी नेहरूच.).
एपिसोडच्या सुरुवातीस व शेवटी या ऋचा असत. यातील शेवटचा काही भाग मालिका सम्पताना शेवटच्या म्हणजे ५३ भागातला आहे.

नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्रजो नो व्योमापरो यत |

प्रकार: 

पानझड - ना. धों. महानोर

Submitted by केदार on 17 November, 2009 - 00:13

ना. धों महानोर ह्यांचा मी वेगळा परिचय करुन द्यायची काहीच गरज नाही. Happy महानोरांच्या कविता ह्या मुख्यतः निसर्गाशी संबंधित असतात. कवि आपल्या लेखनीतून निर्सगाचे त्याला भावलेले वर्णन वाचकापर्यंत नुस्ते पोहचवतच नाही तर त्यांना आपल्या सोबत त्याचा भावविश्वात घेउन जातो. त्यांचा कविता वाचताना आपल्यातील एका वेगळ्याच "मी" ची जाणिव झाल्याशिवाय राहत नाही. हा "मी" जसा निसर्गाच्या वर्णनाने आंनदतो तसाच तो अंतर्मूख झाल्याशिवाय राहत नाही.

सामान्यत्व

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे
कान-डोळे-मुख झाकून घेतले
तरीही रहावले नाहीच म्हणून
ताठ पाठ जगापुढे फिरवली
चवथे माकड जन्माला आले!

सलसलणारे प्रश्न होते,
रात्रीचा दिवस करून
डाच डाच डाचणारे होते,
डसणार्‍या प्रत्येक स्वप्नांवर
सारखे वाहणारे अश्रू होते,
धोपटमार्ग दिसत होते
पाऊल मात्र अडखळत होते,
अवघ्या जीवनाचे काय करावे
सर्व काही संभ्रमात होते,
एकेक आदर्श नाचत होते
लढ आयुष्याशी म्हणत होते,
निर्जीव वाटणार्‍या झाडातले
नवे अंकूर टोचत होते,
टाकं कात या शरीरातली
शरीर शरिरास म्हणत होते...

विरक्तीच्या प्रदीर्घ प्रवासानंतर
एके दिवशी डोळे उघडले
मुख पुटपुटले, कान टवकारले

प्रकार: 

ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कविता

Submitted by Admin-team on 26 October, 2009 - 01:18

ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कवितांची निवड
सर्वप्रथंम ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कवितांची निवड करायला खूपच उशीर झाला त्याबद्द्ल मनापासून क्षमायाचना!कारणे वैयक्तिक व अपरिहार्य होती.पण त्याचबरोबर सर्व कविता वारंवार वाचणे
हेहि तितकेच आवश्यक तसेच दुसरे परीक्षक श्री.गिरीश कुलकर्णी हे परदेशात असल्याने संपर्कासाठीही
वेळ गेला. असो.

चाफा बोलेना

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मी हे आज वाचले.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=389...

"चाफा बोलेना" मधील चाफा म्हणजे ज्ञानदेव असा काहिसा निष्कर्श ह्यात आलेला आहे. खरा अर्थ मला माहित नाही किंवा ह्याविषयी मी फारसे वाचलेलेही नाही, पण ज्या ग्रुहितकावर हा निष्कर्श आलेला आहे ते अचूक वाटले नाहि. कोणाला ह्याबद्दल अधिक? माहिती आहे का ?

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन