भाग १- https://www.maayboli.com/node/75446
याच शाळेत १ली सुरू झाली. शाळेची वेळ ३.५ तासांची ७ तास झाली. विषय, लिखाण खूप वाढले.
आत्तापर्यंत आमच्या हे चांगलं लक्षात आलं होतं की त्याला एका जागेवर जास्त वेळ बसायला आणि लिखाण करायला आवडत नव्हतं का जमत नव्हतं(?)
Dictation tests, class tests जोरात सुरू झाल्या आणि आमची विकेट पडायला सुरूवात झाली.
आमचा मुलगा आत्ता ८ वर्षाचा आहे.
नर्सरी पासून त्याच्याबद्दल शाळेत तक्रारी येऊ लागल्या. लक्ष देत नाही, एका ठिकाणी बसत नाही वगैरे.त्या वेळी आम्ही त्याला समजावून सांगणे, शिक्षक, त्याचे बालरोगतज्ञ यांची मदत घेणे, ओरडणे , कधी दुर्लक्ष करणे असे उपाय केले.
सिनिअर केजी मध्ये शाळेची वेळ वाढली, लिखाण वाढले आणि समस्याही. लिखाण पूर्ण न होणे, एका जागी न बसणे या गोष्टींबद्दल त्याला शिक्षा व्हायला लागली आणि आम्ही काळजीत पडलो.
रोज घरी अभ्यास (शाळेतील आणि घरचा) पूर्ण करून घेणे याचा आमच्यावर खूप ताण येऊ लागला.
"निमा! तांदळाची भाकरी करते ना गं? आणि हो... थोडं सुक्या करदीच कालवण, त्याबरोबर खाऱ्या बांगड्याच तोंडीलावणं पाहिजेच. नाहीतर जेवायची नाही हो ती." आप्पांनी हसत-हसत फर्मान सोडला होता.
"होय. आप्पा सगळं करते." निमाही रोजच्याच सवयीप्रमाणे बोलून गेली.
"आणि ते ..."
"हो. हो... समजलं आप्पा. करदीच्या कालवणात कच्या कैरीच्या चार फोडी टाकायच्या, कोकम नाही. त्याने चव बिघडते. बरोबर ना?"
तिच्या या वाक्यावर दोघेही मनसोक्त हसले.
माझ्या हिट्लर आईचे घरप्रसिद्ध डायलाॅग्ज—
“हळदीचे डाग नॅपकिनला लागताच कसे“
“केसांची वाट लावलीस.. तेल घालून २ वेण्या बांधत जा“
“किती सुंदर गातेस पण आवाज बघ जरा..ओरडून ओरडून आवाजाचं खोबरं करून टाकलय“
“मुलं ऐकत नाही म्हणजे काय..पिरघळून चिमटा काढ“
“काय? मुलांना रामरक्शा येत नाही? बाईचं घरात लक्श पाहिजे“
“मुलं आईच्या डोळ्यावर असली पाहिजेत..मी बघ कसं ठेवलं तुला.. तुझी मजाल होती?”
“कांदा सांभाळून वापर..एवढ्याच कांद्यात २ भाज्या झाल्या असत्या माझ्या.. नवऱयाला रस्त्यावर आणशील“
एखाद्याला कसं खुश करावं??
... नाते...
धुंद धुंद हा
वारा जसा
स्वप्नात घाली
पिंगा जसा
बहरून आले
गीत माझे
सांगू कशी मी
तुला सख्या रे
कोमल हळुवार
नाते तुझे रे
स्मरते मनात
धन्या तुला रे
दोघे कसे हे
वेगळी रूपे
असे मनाचे
एकच नाते
हृदय हृदयाचा
एकच धागा
हृदयात नित्य
तूच स्मरावा
रेशम कि डोरी।
मी आता आई होणार हे कळलं तेंव्हा काही काळानंतर मी नोकरी सोडण्याचा विचार केला आणि मग घरी राहू लागले. ऋषिन मात्र ऑफिस मधून दर दीड दोन तासांनी फोन करायचा आणि मी कशी आहे याची विचारपूस करायचा. मी आणि ऋषीन एकाच ठिकाणी एकाच प्रोजेक्ट वरती काम करायचो. कधी तरी त्याला काही अडलं तर मला विचारायचा. तो भावनिक होता आणि समजूतदार ही होता. एकदा असंच त्यानं मला काहीतरी विचारलं आणि मी चिडले आणि फोन आपटला. माझ्या आताच्या स्थितीत मी जरा जास्तच चिडचिड करत होते.