आमचे एकत्र कुटूंब आहे. म्हणजे होते. मी मोठा, लहान भाऊ. दोन महिन्यापूर्वी मालमत्तेची विभागणी झाली. वडिलांनी जे कमावले त्यापेक्षा जास्त मी एकत्र कुटूंब असताना कमाविले. पण वाटताना मात्र भावाने ती एकत्र संपत्ती धरली, मी तश्या रिसीट दाखवल्या पण एकुणच नाराजीचा सूरच निघाला. विभाजन झाल्यावर असे ठरले की मी जे कमाविले त्याचा पण काही हिस्सा द्यायचा, मी ही लहान भाऊ असल्याने मान्य केले. व ती रक्कम अर्धी दिली. ठरल्याप्रमाणे अर्धी पुढील मार्च मध्ये व्याजासह देणार होतो.
वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....
आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?
आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे
आटपाट नगरातील ही सत्यकहाणी.
गावातील कोर्टात एक जज मॅडम होत्या. त्यांचा नवरा गेल्यामुळे त्या एकट्याच होत्या. साधारण ४० एक वय असावं.
कोर्टाशेजारीच पोलिस स्टेशनची इमारत. तिथल्या चुलबुल पाम्डेवर त्यांचं मन फिदा झालं आणि त्या दोघानी लग्न केलं.
लग्न केलं आणि गोंधळ झाला. कारण चुलबुल आधी विवाहीत असून दोन मुलांचा बाप आहे. त्याचं म्हणणं, मी दोन्ही बायकाना व्यवस्थीत करीन.
आणखी एक तिढा. बाई मुसलमान, तर बुवा हिंदु. बाईनी हिंदु धर्मानुसार कुंकू बांगड्या वापरायला सुरुवात केली.
*अति* अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति असे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे .
खरतर भरपुर विचार करुन काही न सुचल्याने इथे लिहितेय.
गेले काही आठवडे लेक खुप जास्त चिडचिड करतेय. आधी आम्हाला वाटलं कि असेच मुलांचा स्वभाव बदलतो किंवा मधे मधे एक एक फेजेस येतात तशी हि नविन फेज असेल. म्हणुन दुर्लक्ष केले.
पण अगदी मला मारायला येणे टोचणे असे प्रकारही अलिकडे सुरु झालेत. हे सहसा मुलं दुसर्या वर्षी करतात पण तीने हे कधीच केलं नव्हतं. त्याशिवाय ती तीच्या वयापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आणि मॅचुअर आहे असे नेहेमीच आम्हाला वाटते दिसते. मग हा बदल का ते लक्षात येत नव्हते.
सत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ.
अशातच एक मुलाखत पाहिली, त्यात मुलाखत देणारा गे होता. याला व त्याच्या पार्टनरला दोन मुलं आहेत, जुळी आहेत जी त्याने एका किरायाच्या गर्भाशया मध्ये मध्ये प्रत्येकी एकाचे स्पर्म डोनेट करून जन्माला घातली. (फॅटर्नल जुळी असा नवीन शब्द त्याने योजला)
मला गे व्यक्तींचे स्वातंत्र्य मान्य आहे, त्यामुळे तो गे वगैरे असला तरी कुठलाही सांस्कृतीक त्रास वगैरे मला नाही. रादर जेंव्हा असे विषय निघतात तेंव्हा मी प्रत्येक जण प्रत्येकाचे सेक्स ओरियंटेशन स्वतः ठरवू शकते, त्यांचे स्वातंत्र्य वगैरे असे बोलतो. त्यामुळे गे असणे हा मुद्दा नाही.
मुद्दा असा आहे की
माझ बाळाला आता ९ महिने पुर्ण झाले, पण अजुनहि तो बसत नाहि किवा रान्गत हि नाहि. पन तो पोटावर मागे मागे सरकतो. डॉ ने सान्गितले आहे कि जर का १५-२० दिवसात त्यात प्रोग्रेस् झाला नाहि तर physiotherapy करावि लागेल. डॉ म्हणतात कि तुम्हि त्याला स्वत बसवु नका, तर आइ म्हनते कि आपन त्याला आधार देउन बसवल्याशिवाय तो कसा शिकनार?
डॉ ने सान्गितले आहे कि रोज त्याला कोवळ्या उन्हात ठेवा, पन आमच्या घरात उन येतच नाहि, तरि रोज १५-२० मि. अम्हि त्याला उन्हात घेउन जातो, आता पावसाळ्यात ते सुद्धा नाहि मिळ्नार.
तरी मुल कितव्या माहिन्यात आधारा शिवाय बसु लागतात?? याबद्दल कोनि मार्ग्दर्शन करु शकेल का?
काल स्टॅनले का डब्बा पाहिला. खूप सुंदर सिनेमा आहे.
अवघ्या पावणेदोन तासांचा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाद्वारे अमोल गुप्तेने समाजातील एका मोठ्या प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधलं आहे. चित्रपट पडद्यावर उलगडत असताना आपलं मनोरंजन होतच असतं पण आपल्याही नकळत आपण ज्याचा शोध घेत असतो ते वास्तव अचानकपणे चित्रपट संपतासंपता आपल्यासमोर येऊन उभं ठाकतं आणि आपण सुन्न होऊन जातो.
चित्रपटातून मांडलेल्या प्रश्नावर आपण ह्याआधी इतक्या गंभीरपणे विचार केलाही नसेल कदाचित, पण हा चित्रपट त्या सामाजिक प्रश्नाची दखल घ्यायला भाग पाडतो.
नमस्कार,
महिला दिन २०११ निमीत्ताने आपण खेळूया एक खोखो !
कधी कधी एखादा शब्द स्वतःभोवती अनेकपेडी अर्थांचे, अनुभवांचे, जाणिवा आणि समजांचे, क्वचित गैरसमजांचेही पदर घेऊन येतो. असा शब्द ऐकला, वाचला आणि काहीच फरक न पडता, तिथेच सोडून पुढे गेलं असं घडत नाही. अगदी उघडपणे नाही तरी मनातल्या मनात का होईना आणि अख्खं मन व्यापून नसेल तरी मनाच्या एखाद्या कोपर्यात, काही क्षणांपुरती का होईना, बरीवाईट प्रतिक्रिया उमटतेच.
असाच एक शब्द म्हणजे 'स्त्रीमुक्ती'.