सुसान केन या क्वाएट या पुस्तकाच्या लेखिका असून हे पुस्तक संडे टाइम्स आणि न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर आहे. या पुस्तकाचा तीसहून अधिक भाषांत अनुवाद झाला आहे. त्यांचे TED वरील व्याख्यान ऑन-लाइन उपलब्ध झाल्यापासून ते तीस लाखाहून अधिक दर्शकाकडून पाहिले गेले आहे.
आज प्रत्येकाला सत्ता हवी आहे, मग तो महासत्ता होऊ पाहणारा एखादा देश असो,वा आपल्याच विचारांचं घोडं नाचवणारा तालिबान सारखा दहशतवादी गट.सत्तेची भूक प्रत्येकाच्याच उदरात उसळलेली आहे.पण क्षणभूंगुर असणारी ही सत्ता सहसा मिळत नाहीच मुळी.ज्यांच्या हाती ती सत्ता आहे त्यांच्याकडून ती हिसकावून घ्यावी लागते.तिच्यासाठी रक्तार्पणाचा महायज्ञ करावा लागतो. या सत्ता ग्रहाणासाठी मग एकच मार्ग उरतो... युद्ध...ज्यामध्ये लाखो निरपराधी लोक हकनाक मारले जातात.युद्ध... जिथे सारं काही माफ असतं, अगदी सामान्य जणांच्या मुंडक्यांचा थर रचण्यापासून ते एखाद्या सात वर्षाच्या कोवळ्या मुलीचं शरीर ओरबडण्यापर्यंत.
प्रवीण दवणे हे ललित लेखक, गीतकार, कवी म्हणून परिचित आहेतच. पण माझ्या दृष्टीन हि व्यक्ती माणसानं कस जगावं यावर खूप छान भाष्य करते. त्यांची शेकडो व्याख्यान , त्यांनी लिहिलेली पुस्तक सर्वच प्रेरणादायी असतंच . अंतर्मुख करणार असत . मी त्यांच्या पुस्तकांचा 'वाचन वेडा ' म्हणा हवं तर , पण वाचक आहेच. 'सावर रे ',' रे जीवना ' सारखी पुस्तक मनावर एक गारुड उभं करतात. त्यांचं म्हणणं मात्र नीट समजून आलं पाहिजे इतकंच .
आटपाट नगर होत. आपल्या घरट्यात सर्वाना खाऊ पिऊ घालण्यासाठी ती वणवण भटकायची. पण सर्वच जीवांना सुखी जगता यावं यासाठी तिची धडपड सुरु असायची. दुखणी खुपणी , राग लोभ , स्वभाव विशेष, आवडी निवडी सगळंच जपता जपता स्वतः एक जीव आहोत हेच कधी कधी विसरून जायची . काळ पुढे जात होता. मनातील एक पोकळी मात्र कायम असायची . हे सार कुणासाठी . जाणीव नसलेल्यांसाठी? म्हणतात ना जी नाती सहज उपलब्ध होतात ती हळू हळू बोथट होत जातात. त्याची जाणीवच नाही राहत . आणि एक भीतीही असायचीच. आपल्या माघारी यांचं काय होईल . मग तीन ठरवलं घरटं सोडायचं .. हो सोडायचं .. आणि काही काळ का होईना इतरांना स्वावलंबी बनायला शिकवायचं ..
तो गरजला, ती मौन राहिली
तिचं मौन, तो समजू शकला?
विचारले त्याने काय झाले
मौन तिचा तसाच राहिला
मर्यादा आणि आत्मसन्मान
या प्रगल्भ विचारांचा
तर्क जिंकण्यापेक्षा, तिला
अधिक नाही का महत्त्वाचा?
..
मुलं जास्त स्वच्छ असतात कि मुली हा संशोधनाचा विषय आहे.
शाळेत असताना एक मुलगी आम्हाला म्हणाली होती " बॉईज आर डर्टी" . मुलांचे मैदानी खेळ मातीत असतात. आत्ताच्या शाळात सिमेंट असेल असले तर. पण आम्ही तर मातीतच खेळायचो. त्यात युनिफॉर्म पांढरा स्वच्छ शर्ट आणि करडा टाय होता. करड्या निळ्या रंगाची हाफ / फुल पँट असायची. मातीने कपडे भरून जायचे. मुलींचा युनिफॉर्म काळपट निळा होता. त्याच्यावर धूळ समजून यायची नाही. हे कारण असेल.
पण नंतर पण मुलींचं हे मत नेहमी ऐकू यायचं. मी तर रोज स्नान करायचो. अजून करतो. रोज केस पण धुतो.
उलट मुली आठवड्यातून एकदाच केस धुतात.
लहानपणीचा काळ त्या वेळी जरा सुद्धा सुखाचा वाटत नाही. पण आता ते दिवस आठवले की पुन्हा एकदा नव्याने बालपण यावे असे वाटते.
ट्विटर वर एका सहा वर्ष वयाच्या मुलाचे टाईम टेबल प्रचंड व्हायरल झाले आहे. ते वाचून लोकांना हसू आवरत नसले तरी त्या मुलाने ते सिरीयसली बनवले आहे.

तुम्ही असे टाईम टेबल बनवले होते का? त्या वेळी कुणी बनवले असेल तर अभिनंदन!!
पण जर नसेल बनवले तर त्या वेळी तुमचा दिनक्रम ( अलिखित टाईम टेबल) काय असायचा हे आठवते का?
आठवून पहा.
काही लोक वाचनाची अजिबात आवड नसलेले तर काही वाचनाशिवाय जगूच न शकणारे. पैकी मी या स्पेक्ट्रममध्ये कुठे तरी पडते. पुस्तकवेडी आहे मी. लहानपणीच्या माझ्या आठवणी म्हणजे - वाचनात गढलेल्या, आई किंवा बाबांच्या शेजारी पडून त्यांचे नीरीक्षण करणे. मासिकांत तर चित्र नाहीत मग ही मोठी मंडळी पान का उलटत नाहीत - हा प्रश्न मला पडलेला लख्ख आठवतो. पुढे अक्षरांशी ओळख झाल्यानंतर, अक्षरक्षः दुकानावरच्या पाट्यांपासून ते भेळेच्या कागदापर्यंत सर्वाहारी वाचक अशी मी अमेरीकेत येउन हरवुन गेले होते. काही काळ मराठी वाचनापासून वंचित राहील्याने कठीण गेला. त्यातून मग मराठी संस्थळे सापडत गेली.