एकविसाव्या शतकाची सुरुवात आमच्यासाठी
साधारण अशी झाली..
संवाद-१ :
"आपल्या ग्रामपंचायतीला आता इंटरनेटनं
जोडनारायत बरं गा..!''
<<< व्होय काय? ते काय आस्तंय ? >>>
"मला बी नीट काय कळलं नाय..! पन कसलीतरी
वायर टाकलीय म्हन्तेत..! फोनसारखंच आसंल..!
सगळ्या जगातनं वायरी टाकत आलेत..! आता
सोलापुरापास्नं गावागावात टाकतेल..!"
{सूचना :- लिखाण थोडं असभ्य वाटण्याची शक्यता
आहे. तसे काही आवडत नसल्यास पुढे वाचू नये, ही विनंती.}
नावात घंटा काही नसलं तरीही नाव सांगावं लागेल,
म्हणून मी सुदर्शन लिगाडे.
फार पूर्वी कै. धोंडीसाहेब देशमुख शिक्षण संस्थेचे आदर्श मराठी विद्यालय, असे नाव असलेल्या शाळेत आम्ही शिकत होतो.
माझ्या एका मोठ्या मित्राकडे पूजा होती. तेव्हां तो यजमान होता आणि त्याची कायद्याने असलेली धर्मपत्नी नुसते हाताला हात लाऊन मम म्हणत होती. हे चित्र खूप ठिकाणी पाहिले आहे. आमच्या घरावर त्यामुळेच मी हट्टाने आईच्या नावाची पाटी लावून घेतली होती.
माझ्या त्या मित्रानेही आरतीचे ताट न फिरवता त्याच्या पत्नीला सांगितले की तूच कर पुढचे सगळे. मी मम म्हणतो. मला त्याचा अभिमान वाटला. स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा मारण्यापेक्षा करून दाखवण्यात माझ्यासारखाच त्याचाही विश्वास आहे.
आपण सर्व जण कसे आहात? सर्व जण ठीक असाल अशी आशा करतो. नुकतंच स्नेहालय संस्थेच्या कामाबद्दलचं 'अंधाराशी दोन हात' हे पुस्तक वाचण्यात आलं. हे पुस्तक अक्षरश: आपल्याला हादरवून सोडतं. थरकाप उडतो हे पुस्तक वाचताना. भारतामध्येही नाझी किंवा तालिबानी मानसिकतेचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत हे कळून अनेक धक्के बसतात. ते पुस्तक वाचल्यानंतरची प्रतिक्रिया ह्या लेखामधून व्यक्त करत आहे.
बऱ्याच वेळा असा अनुभव आलाय की, खरं तर भविष्यात येणाऱ्या खऱ्या खुऱ्या कठीण किंवा दुःखद परिस्थिती पेक्षा ती येणार, कशी असणार ह्याची कल्पना केल्याने जास्त त्रास होतो. वास्तविक पाहता तेवढं भीषण घडत नसतं जेवढं आपलं मन आपल्याला आधीच दाखवतं. मनाला सवयच असते काहिबाही कल्पून त्याची साखळी बनवत जायची. सगळीकडे नुसता अतिरेक करतं हे मन!
......
.
...
नमस्कार
माझी मुलगी मघा १२ वी त शिकत आहे. ती सहाव्या वर्षापासून सौ. शुभांगी शिरापूरकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकत आहे. बॉलीवूड किंवा तत्शाम संगीताचे शिक्षण घेतलेले नाही. तिला एका म्युझिक अल्बमसाठी संधी मिळाली आहे. मेकिंग आणि फायनल असे दोन्ही व्हिडीओ रिलीज झाले. आपण सर्वांनी या नव्या गाण्याला आशिर्वाद द्यावा तसेच सूचना असलया तर कळवावे ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=ooGKFG9w8Pw&ab_channel=DhamaalHitsMusic
आपल्यातील काही जणांवर आपले व्यवसाय वगळता सार्वजनिक मंचावर छोटेमोठे भाषण देण्याचा प्रसंग कधीतरी येतो. अशा प्रसंगांमध्ये कौटुंबिक मेळावा, मित्रांचे संमेलन, सामाजिक उत्सव आणि विविध विशेष दिनांचे कार्यक्रम इत्यादींचा समावेश होतो. माझ्यावर अशी वेळ आतापर्यंत बरेचदा आलेली आहे. तेव्हा आपल्यासमोर उपस्थित असणारा श्रोतृवर्ग हा विविध वयोगटांतील आणि विभिन्न प्रकृतींचा असतो. अशा प्रसंगी थोड्या वेळात प्रभावी बोलणे ही एक कला आहे. ही कला मी प्रयत्नपूर्वक विकसित करीत राहिलो. त्यासाठी काही थोरामोठ्यांच्या भाषणांचा व त्यांच्या मेहनतीचा अभ्यास केला.
सरकार मुलींचे लग्नासाठी अधिकृत वय अठरा वरून एकवीस वर नेण्यासाठी कायदा आणायच्या विचारात आहे.
ह्यामुळे बालविवाहांचे प्रमाण कमी होईल. मुलींच्या आरोग्या कडे जास्त लक्ष राहील तरूण वयात बाळंतपणे अंगावर पडणार् नाहीत. त्यांना शिक्ष ण पूर्ण कर ता येइल व रोजगाराच्या सन्माननीय संधी शोधून आर्थिक स्वा तंत्र्याकडे वा टचाल करणे सोपे जाईल. अशी विचार धारा आहे.
अनुसूचित जाती जमाती, आदिवासी ह्यांचे ह्या कायद्याचा वापर करून शोषण होईल. असाही एक विचार प्रवाह आहे.
आपणास काय वाट्ते.?
दहा वर्षे झाली गृहिणी बनून.
लग्नाआधी तीन आणि लग्नानंतर चार असा सात वर्षे जॉब करत होते.मग पहिलं मुल प्लस नवर्याची ट्रान्सफर यात करिअर मागे पडले.पहिले मुल तीन वर्षाचे झाले पुन्हा जॉब शोधायला सुरू केले, इंटरव्ह्यू दिले पण परत दुसऱ्या मुलाची तयारी आणि आगमन यात राहून गेले.
दुसरं मुल दोन वर्षाचे झाल्यावर पुन्हा एके ठिकाणी इंटरव्ह्यू दिला,अपॉइंटमेंट लेटर घेतले आणि कपाटात ठेवले आणि पुन्हा घरीच.
आता पुन्हा वाटु लागलेय कि वेळ वाया घालवता कामा नये.